शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
2
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
5
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
6
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
7
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
8
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
9
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
10
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
11
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
12
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
13
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
14
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
15
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
16
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
17
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
18
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
19
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
20
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
Daily Top 2Weekly Top 5

भाजी, फळे, माशांची नियमित तपासणी करणार, सरकारची विधानसभेत ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2018 19:45 IST

बाजारपेठांमध्ये येणा-या भाज्या, फळे, मासे यांची सरकारच्या अन्न व औषध प्रशासन खात्याकडून नियमितपणे तपासणी केली जाईल, अशी ग्वाही सरकारकडून शुक्रवारी विधानसभेत देण्यात आली.

पणजी : बाजारपेठांमध्ये येणा-या भाज्या, फळे, मासे यांची सरकारच्या अन्न व औषध प्रशासन खात्याकडून नियमितपणे तपासणी केली जाईल, अशी ग्वाही सरकारकडून शुक्रवारी विधानसभेत देण्यात आली. तसेच गेले अनेक दिवस माशांची तपासणी करून पाहिली गेली, पण कुठच्याच मासळीत फॉर्मेलिन सापडले नाही, असे आरोग्य खात्याचे मंत्री विश्वजित राणे यांनी जाहीर केले.काँग्रेसचे आमदार लुईझिन फालेरो यांनी ठराव मांडला होता. रसायनांचा वापर करून फळे, भाज्या, मासे, मांस, मसाले दूषित केले जात असल्याने चौकशीसाठी न्यायालयीन आयोगाची नियुक्ती केली जावी, अशी मागणी फालेरो यांनी ठरावाद्वारे केली होती. सरकारने अशा आयोगाची गरज नाही, असे फालेरो यांना सांगितले. सरकारकडे अन्न सुरक्षा आयुक्त आहेत. माशांच्या आयातीवरील बंदीचा आदेशही आयुक्तांनीच जारी केला, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी नमूद केले.सरकारचे अन्न व औषध प्रशासन खाते नियमितपणे फळे, भाज्या, मासे यांचे नमुने घेऊन तपासणी करत आहे. एफडीएची प्रयोगशाळा ही अत्यंत चांगल्या दर्जाची आहे. 162 पेक्षा जास्त मासळीचे नमुने गेल्या अनेक दिवसांत तापसण्यात आले. फॉर्मेलिन आढळले नाही. फळे, भाज्या यांच्यावर रसायनांचा वापर केला जातो, अशा तक्रारी आल्यानंतर लगेच एफडीएचे अधिकारी जाऊन तपासणी करतात. यापुढेही तपासणी सुरूच राहील. एफडीएने एखाद्या ठिकाणी छापा टाकला म्हणून कुणीच आमदारांनी गडबडून जाऊ नये. एफडीएला स्वत:चे काम करू द्या. एफडीएवर विश्वास ठेवा, असे मंत्री राणे म्हणाले. एफडीएकडून आणखी 200 किट्स खरेदी केली जातील. एका किटचा वापर पंचवीस तपासण्यांवेळी करता येतो. गेल्या काही वर्षात अनेक विक्रेत्यांना एकूण चौदा-पंधरा लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचे राणो यांनी स्पष्ट केले.मासे विक्री घटली दरम्यान, कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी मासळी विक्री घटल्याबाबत चिंता व्यक्त केली. अकारण कुणी भीती निर्माण करू नये. मासे, मांस, अंडी वगैरे सगळेच खाणो धोकादायक आहे असे चित्र कुणी निर्माण केले तर पर्यटनाला फार मोठा फटका बसेल. पर्यटन व्यवसायच नष्ट होईल. सध्या कळंगुट व अन्य किनारी भागातील हॉटेलांमध्ये चांगले गरवणीचे मासे आणून दिले तरी, कुणीच ते खात नाहीत. यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे, असे लोबो म्हणाले.

टॅग्स :goaगोवा