शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

वेदांताकडून २१ हजार कोटी लूट वसूल करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 23:10 IST

वेदांता कंपनीने बेसुमार उत्खनन केले असून अवघ्या ५ वर्षांत ३१ टक्के खनिज उत्खनन केले आहे.

पणजी: खाण घोटाळा प्रकरणात बेकायदेशीरपणे बेसुमार उत्खनन केल्याबद्द  वेदांता खाण कंपनीला २१ हजार कोटी सरकारला फेडण्याचा आदेश द्यावा अशी मागणी करणारी याचिका गोवा फाउंडेशनतर्फे मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात केली आहे.

 वेदांता कंपनीने बेसुमार उत्खनन केले असून अवघ्या ५ वर्षांत ३१ टक्के खनिज उत्खनन केले आहे. हे पूर्णपणे बेकायदेशीर उत्खनन असल्यामुळे या लुटीची भरपाई कंपनीकडून सरकारला करणे आवश्यक आहे. ही रक्कम वसूल करून घेण्यासाठी न्यायालयाने सरकारला आदेश द्यावा, असे याचिकेत म्हटले आहे. 

वर्ष २००७ ते २०१२ या काळातील सर्व खनिज उद्योग हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बेकायदेशीर ठरत असल्यामुळे कंपनीने केलेल्या या बेकायदेशीर उद्योगाबद्दल कारवाई व्हावी. तसेच नुकसानीची रक्कम २१ हजार कोटी रुपये वसूल करून घ्यावी, असे याचिकेत म्हटले आहे. 

वेदांता कंपनीला दोन दिवसांपूर्वीच ९४ कोटी रुपये थकबाकी फेडण्यासाठी खाण खात्याकडून नोटीस पाठविली होती. कंपनीकडून ती अद्याप फेडण्यात आलेली नाही. बेकायदेशीर उत्खननासाठी अद्याप एकाही कंपनीला खाण खात्याकडून भरपाईची नोटीस दिलेली नाही. त्यामुळेच गोवा फाउंडेशनने न्यायालयात याचिका सादर केली आहे. एकूण ६५.५८ हजार कोटी रुपयांची लूट खाण घोटाळ्याद्वारे करण्यात आली आहे. सर्व १२७ कंपन्यांचा त्यात सहभाग आहे, परंतु सर्वात अधिक लूट ही वेदांता कंपनीकडून करण्यात आली असल्याचा दावा करण्यात आला आहे.

टॅग्स :goaगोवाMining Scamखाण घोटाळाHigh Courtउच्च न्यायालय