शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

मासळीच्या आयातीवर बंदीचा फेरविचार करा - मायकल लोबो 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 16:55 IST

सरकारच्या ब-याच निर्णयावर उघडपणे नाराजी व्यक्त करणारे उपसभापती मायकल लोबो यांनी फॉर्मेलिनच्या प्रश्नावरुन मासळीच्या आयातीवर लागू केलेली बंदीवर फेरविचार करुन त्वरित हटवण्याची मागणी केली आहे.

म्हापसा - सरकारच्या ब-याच निर्णयावर उघडपणे नाराजी व्यक्त करणारे उपसभापती मायकल लोबो यांनी फॉर्मेलिनच्या प्रश्नावरुन मासळीच्या आयातीवर लागू केलेली बंदीवर फेरविचार करुन त्वरित हटवण्याची मागणी केली आहे. तशी मागणी लोबो यांनी आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांना पाठवलेल्या पत्राद्वारे केली असल्याची माहिती लोबो यांनी पत्रकारांना दिली. 

राज्यात  फॉर्मेलिन असलेल्या मासळीची आयात होवू नये यासाठी आरोग्य मंत्र्यांनी घेतलेला हा निर्णय योग्य असून अशा प्रकारच्या मासळीतून लोकांच्या आरोग्याची असलेली चिंता त्यांना दिसून येत असल्याचे म्हणाले, मात्र आयातीवर लागू केलेल्या बंदीमुळे लोकांवर तसेच व्यवसायिकांवर त्याचे विपरीत परिणाम होणार असल्याचे लोबो म्हणाले. पत्रातून केलेल्या मागणी बरोबर त्यांच्याशी आपण स्वत: फोनवर चर्चा केली असून त्यांची भेट घेवून त्यांच्या सोबत चर्चा करणार असल्याचे तसेच मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या सोबत सुद्धा चर्चा करणार असल्याची माहिती लोबो यांनी यावेळी दिली. 

मासळीच्या आयातीवर बंदी लागू करण्यापेक्षा गोव्यातील शेजारील राज्य महाराष्ट्र तसेच कर्नाटकातून येणाºया मासळीवर बंदी उठवावी. या भागातून मासळीची आयात करणारे वाहने फक्त दोन तासाच्या अंतरात गोव्यात दाखल होवू शकतात. त्यामुळे मासळीची वाहतूक करण्यासाठी इन्सुलेटेड वाहनाची गरज नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. तामिळनाडू तसेच आंध्र प्रदेशातून येणाºया मासळीवर मात्र बंदी हवी असेही ते ठामपणे म्हणाले. बंदी लागू करण्यापेक्षा अन्न व औषधी प्रशासनाच्या वतिने ठोस उपाय योजना हाती घेणे मासळीची तपासणी करणे गरजेचे आहे. त्या करीता यंत्रणेचा वापर करुन उत्तरेत एक तर दक्षिणेत एका वाहनाचा वापर करुन मासळीची तपासणी करावी. त्यात फॉर्मेलिनची मासळी आढळून आल्यास त्यांना कठोर शासन करावे गरज पडल्यास पोलीस कारवाई सुद्धा करण्यात यावी अशीही मागणी लोबो यांनी केली. तसेच वेळ पडल्यास कायद्यात योग्य तो बदल करण्यासाठी पावले उचलण्याची सुचनाही लोबो यांनी केली. 

गोव्यात येणा-या पर्यटकाची किमान ८० टक्के पर्यटक मासळीचे सेवन करण्यासाठी येत असतात. त्यांना चांगली मासळी खाण्यासाठी हवी असते. आयातीवर बंदी लागू केली असल्याने किनारी भागातील हॉटेल्स तसेच शॅक व्यवसायिकांवर त्याचे प्रचंड परिणाम होत असल्याचे तसेच राज्याच्या अर्थव्यवस्थेवर त्याचे परिणाम होणार असल्याचे सांगितले. त्यांच्यावर व्यवसाय बंद करण्याची पाळी येणार असल्याचे सांगितले. गोव्यात मिळणारी मासळी लहान असल्याने लोकांना व्यवसायिकांना चालत नसल्याची माहिती दिली. 

मासळीच्या आयातीवर लागू केलेल्या बंदीमुळे पापलेट, इसवण, सुरमई तसेच इतर मोठ्या प्रकारची मासळी दुर्मीळ होत चालली आहेत. गोव्यातील समुद्रात अशा प्रकारची मासळी मिळणे कठीण असल्याने त्यांची आयात करण्यापेक्षा दुसरा पर्याय नसल्याचे ते म्हणाले. तसेच सध्या मिळत असलेली मासळी गोवेकरांना विकत घेणे परवडण्यासारखी नसल्याची माहिती मायकल लोबो यांनी पत्रकारांना दिली. 

टॅग्स :goaगोवा