शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

गेल्या दोन वर्षांपासून गोव्यात 'रामराज्य'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 16:11 IST

एसीबीकडून ३ मार्च २०२१ नंतर भ्रष्टाचाराचा एकही एफआयआर नाही

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : लाचखोरीच्या तक्रारी कमी येत असल्यामुळे गोव्यात रामराज्य नांदत असावे, असे उद्गार एका सीबीआय अधीक्षकाने काढले होते. ते उद्गार सार्थ ठरविणारी आकडेवारी दक्षता खात्याने सादर केली आहे.

वर्ष २०२१ मध्ये मार्च महिन्यात भ्रष्टाचार विरोधी पथकाकडून एक गुन्हा नोंदविण्यात आला. जलस्रोत खात्यातील भ्रष्टाचार प्रकरणाचा हा गुन्हा दक्षता खात्याकडून नोंदवलेला शेवटचा गुन्हा ठरला. नंतर आतापर्यंत एकही गुन्हा नोंदलेला नाही. २०२१ मध्ये मार्चनंतर एकही गुन्हा नोंदविला नाही. २०२२ वर्षही गुन्हे न नोंदविता कोरडे गेले आणि वर्ष २०२३ मध्येही ४ जुलैपर्यंत एकही गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता. म्हणजेच जवळजवळ २ वर्षे एकही गुन्हा नोंदविला नसल्याची माहिती गोवा विधानसभेत सादर झाली आहे. 

आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी हा प्रश्न विचारला होता. त्यांच्या प्रश्नाला दिलेल्या उत्तरातील ही माहिती आहे. एसीबीकडून २०१८ मध्ये ११ प्रकरणात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. २०१९ मध्ये ९ प्रकरणात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत, २०२० मध्ये ५ तर २०२१ मध्ये ३ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

फाईल बंद करणे शेकले अंगावर

एसीबीकडे तक्रारींचा डोंगर पडतो, परंतु मोजक्याच तक्रारींची दखल घेऊन गुन्हे नोंदविले जातात. नोंदवलेल्या गुन्ह्यातून फार निष्पन्न होत नाही. बहुतेक प्रकरणात फाईल बंद केली जाते. अशीच एक फाईल बंद करणे एसीबीला महागात पडले. न्यायालयाने हे प्रकरण पुन्हा खुले करून नव्याने तपास करण्याचा आदेश दिला.

 

टॅग्स :goaगोवाState Governmentराज्य सरकार