शहरं
Join us  
Trending Stories
1
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
2
नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला केंद्राचा हिरवा कंदील; प्रवास वेळेत 17 तासांची बचत होणार
3
गुंतवणूकदारांची 'चांदी'! वर्षाच्या शेवटच्या दिवशी ४ लाख कोटींची कमाई; मेटल आणि रिलायन्स शेअर्समध्ये धूम
4
Municipal Election 2026: कल्याण, पनवेल, धुळ्यात भाजपाचा 'विजयारंभ'! सहा उमेदवार बनले बिनविरोध 'नगसेवक'
5
गुंतवणूक सोन्यात की शेअर बाजारात? ३ लाखांच्या सोन्यावर पुढील वर्षी किती नफा मिळेल? सोपं गणित
6
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
7
नशीब असावं तर असं! राष्ट्रवादीतून भाजपात आल्या आणि २४ तासांत झाल्या नगरसेविका, धुळ्यात उज्वला भोसले बिनविरोध
8
कोट्यवधीची रोकड, सोने हिऱ्यांनी भरलेली बॅग अन् बरेच काही...; ED च्या हाती कुणाचं लागलं 'घबाड'?
9
'ऑपरेशन सिंदूर'वर लष्कर-ए-तैयबा प्रमुख हाफिज सईदचे मोठे वक्तव्य; म्हणाला- 'भारत पुढील 50 वर्षे...'
10
Happy New Year 2026 Wishes: नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Quotes, Messages, WhatsApp Status शेअर करत स्वागत करा नव्या वर्षाचं!
11
Nimesulide Banned: निमसुलाइड औषधावर सरकारनं घातली बंदी, किडनीसाठी अत्यंत धोकादायक!
12
मुंबई महापालिकेसाठी भाजपाची १३७ उमेदवारांची यादी जाहीर; किती अमराठी उमेदवारांना दिली संधी?
13
शिंदेसेनेचे स्वबळावर ७४ उमेदवार! महायुतीचे जागावाटप बारगळले; निवडणूक होणार चुरशीची
14
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं कमळ, भाजपाचे ३ नगरसेवक बिनविरोध 
15
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
16
धनंजय मुंडे यांना दिलासा! करुणा मुंडे यांची याचिका कोर्टाने फेटाळली, काय होतं प्रकरण?
17
भांडवलशाहीचा 'भीष्म पितामह' निवृत्त! दिवाळखोर कंपनीतून वॉरेन बफेंनी कसे उभारले अब्जावधींचे साम्राज्य?
18
अभिषेक बच्चनचं पत्नीसोबत 'न्यू इयर सेलिब्रेशन', चाहतीसोबत फोटो; ऐश्वर्याच्या सौंदर्यावर सगळेच फिदा
19
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
20
कानात ब्लूटूथ इयरफोन लावल्याने कॅन्सरचा मोठा धोका? एक्सपर्ट्सनी सांगितलं 'सत्य'
Daily Top 2Weekly Top 5

नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजनाथ सिंग व श्रीपाद नाईकांनी राजीनामा द्यावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 14:02 IST

गोवा काँग्रेसची मागणी: रक्षा मंत्रालय झोपा काढत असल्याचे सिद्ध

मडगाव : चीनने भारतावर केलेला हल्ला हा पुर्वनियोजीत होता असे वक्तव्य करुन केंद्रीय रक्षा राज्य मंत्री श्रीपाद नाईक यानी केंद्रातील मोदी सरकार व रक्षा मंत्रालय एवढे दिवस झोपा काढत होते हे मान्य केले आहे. या आक्रमणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून रक्षामंत्री राजनाथ सिंह आणि रक्षा राज्य मंत्री श्रीपाद नाईक यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे.

भाजपला देशाच्या सुरक्षेचे काहिच पडलेले नसुन, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे व्यक्तीगत प्रसिद्धीचे चोचले पुरवीण्यासाठी भाजप सरकार केवळ स्टंटबाजी करण्यात धन्यता मानत आहे हे आता उघड झाले आहे अशी टीका  चोडणकर यांनी केली आहे. 

भाजप सरकार सत्तेवर आल्यापासुन केवळ मोदींची व्यक्तिपूजा करण्यात सर्वच्या सर्व केंद्रीय मंत्री व भाजपचे पदाधिकारी गुंतले असुन, विदेश नीतीचे  कोणतेही ठोस धोरण आज भाजप सरकारकडे नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. 

"लाल आंख" दाखवण्याची भाषा करणाऱ्या नरेंद्र मोदींवर आज नेपाळ सारखा छोटा देश डोळे वटारत आहे ही धक्कादायक बाब आहे. 

चीनचे अध्यक्ष शी जिनपींग यांच्या बरोबर गुजरातेत झोपाळ्यावर बसुन झुलणे व  महाबलीपूरम येथे त्यांच्या बरोबर दाक्षिण्यात वेशभूषा करुन स्वताचे फोटो काढुन प्रसिद्धी मिळवीणे या व्यतिरीक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशहितासाठी कोणतीच पाऊले उचलली नाहीत हे आता स्पष्ट झाले आहे असे चोडणकर यांनी म्हटले आहे.

 

चीनने हल्ल्याची पुर्वतयारी केली होती तर त्याची माहिती भारताला कशी मिळाली नाही हे श्रीपाद नाईक यांनी सांगावे. आज सॅटलायट यंत्रणेने जगाच्या पाठीवर कोठे  काय चालले आहे याची इत्यंभूत माहिती मिळू शकते. सरकारला याची जाणीव झाली नाही याचा सरळ अर्थ सरकार मोदींच्या दुसऱ्या पर्वातील वर्षपुर्तीचे सोहळे आयोजित करण्यात व्यग्र होती हे सिद्ध झाले आहे असे ते म्हणाले.

भाजपचे बेगडी देशप्रेम व निवडणुकीसाठी सैन्याचा वापर या जुमल्यांना आता जनता पुर्णपणे ओळखली असुन, भारतीयांच्या देशप्रेमाचा आपल्या राजकीय स्वार्थासाठी फायदा करुन घेण्याचा भाजपचा कुटील डाव आता जनतेला कळुन चुकला आहे. 

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे शोभेचे बाहुले म्हणुन मोदी मंत्रीमंडळात असुन, आज त्यांच्याकडे कसलेच अधिकार नाहीत. आयुर्वेदीक औषधाने इंग्लंडचे राजपुत्र प्रिन्स चार्लस कोविड आजारातुन बरे झाल्याचा दावा करुन तोंडघशी पडलेल्या उत्तर गोव्याच्या खासदारानी चीन हल्ल्यावर केलेल्या वक्तव्याने गोव्याला लाजेने मान खाली घालायला भाग पाडले आहे अशी टीका  चोडणकर यांनी केली आहे.

 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहchinaचीनIndian Armyभारतीय जवान