शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजनाथ सिंग व श्रीपाद नाईकांनी राजीनामा द्यावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 14:02 IST

गोवा काँग्रेसची मागणी: रक्षा मंत्रालय झोपा काढत असल्याचे सिद्ध

मडगाव : चीनने भारतावर केलेला हल्ला हा पुर्वनियोजीत होता असे वक्तव्य करुन केंद्रीय रक्षा राज्य मंत्री श्रीपाद नाईक यानी केंद्रातील मोदी सरकार व रक्षा मंत्रालय एवढे दिवस झोपा काढत होते हे मान्य केले आहे. या आक्रमणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून रक्षामंत्री राजनाथ सिंह आणि रक्षा राज्य मंत्री श्रीपाद नाईक यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे.

भाजपला देशाच्या सुरक्षेचे काहिच पडलेले नसुन, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे व्यक्तीगत प्रसिद्धीचे चोचले पुरवीण्यासाठी भाजप सरकार केवळ स्टंटबाजी करण्यात धन्यता मानत आहे हे आता उघड झाले आहे अशी टीका  चोडणकर यांनी केली आहे. 

भाजप सरकार सत्तेवर आल्यापासुन केवळ मोदींची व्यक्तिपूजा करण्यात सर्वच्या सर्व केंद्रीय मंत्री व भाजपचे पदाधिकारी गुंतले असुन, विदेश नीतीचे  कोणतेही ठोस धोरण आज भाजप सरकारकडे नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. 

"लाल आंख" दाखवण्याची भाषा करणाऱ्या नरेंद्र मोदींवर आज नेपाळ सारखा छोटा देश डोळे वटारत आहे ही धक्कादायक बाब आहे. 

चीनचे अध्यक्ष शी जिनपींग यांच्या बरोबर गुजरातेत झोपाळ्यावर बसुन झुलणे व  महाबलीपूरम येथे त्यांच्या बरोबर दाक्षिण्यात वेशभूषा करुन स्वताचे फोटो काढुन प्रसिद्धी मिळवीणे या व्यतिरीक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशहितासाठी कोणतीच पाऊले उचलली नाहीत हे आता स्पष्ट झाले आहे असे चोडणकर यांनी म्हटले आहे.

 

चीनने हल्ल्याची पुर्वतयारी केली होती तर त्याची माहिती भारताला कशी मिळाली नाही हे श्रीपाद नाईक यांनी सांगावे. आज सॅटलायट यंत्रणेने जगाच्या पाठीवर कोठे  काय चालले आहे याची इत्यंभूत माहिती मिळू शकते. सरकारला याची जाणीव झाली नाही याचा सरळ अर्थ सरकार मोदींच्या दुसऱ्या पर्वातील वर्षपुर्तीचे सोहळे आयोजित करण्यात व्यग्र होती हे सिद्ध झाले आहे असे ते म्हणाले.

भाजपचे बेगडी देशप्रेम व निवडणुकीसाठी सैन्याचा वापर या जुमल्यांना आता जनता पुर्णपणे ओळखली असुन, भारतीयांच्या देशप्रेमाचा आपल्या राजकीय स्वार्थासाठी फायदा करुन घेण्याचा भाजपचा कुटील डाव आता जनतेला कळुन चुकला आहे. 

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे शोभेचे बाहुले म्हणुन मोदी मंत्रीमंडळात असुन, आज त्यांच्याकडे कसलेच अधिकार नाहीत. आयुर्वेदीक औषधाने इंग्लंडचे राजपुत्र प्रिन्स चार्लस कोविड आजारातुन बरे झाल्याचा दावा करुन तोंडघशी पडलेल्या उत्तर गोव्याच्या खासदारानी चीन हल्ल्यावर केलेल्या वक्तव्याने गोव्याला लाजेने मान खाली घालायला भाग पाडले आहे अशी टीका  चोडणकर यांनी केली आहे.

 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहchinaचीनIndian Armyभारतीय जवान