शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

पावसाळ्यात समुद्रातील घाण गोव्याच्या किनाऱ्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2018 15:06 IST

पणजी : गोव्यात मान्सूनचे आगमन झाले असून विविध भागात पाऊस पडू लागला आहे. पावसाळ्यात समुद्रातील कचरा व अन्य बरीच घाण किनाऱ्यावर वाहून येते. यावेळीही हळूहळू ही घाण किनारपट्टीवर येऊ लागली आहे. पावसाचे प्रमाण जसजसे वाढेल तसतशी जास्त घाण दिसून येईल असे जाणकारांचे म्हणणे आहे. पाऊस सुरू होताच गोव्याच्या समुद्राचे निळे ...

पणजी : गोव्यात मान्सूनचे आगमन झाले असून विविध भागात पाऊस पडू लागला आहे. पावसाळ्यात समुद्रातील कचरा व अन्य बरीच घाण किनाऱ्यावर वाहून येते. यावेळीही हळूहळू ही घाण किनारपट्टीवर येऊ लागली आहे. पावसाचे प्रमाण जसजसे वाढेल तसतशी जास्त घाण दिसून येईल असे जाणकारांचे म्हणणे आहे. पाऊस सुरू होताच गोव्याच्या समुद्राचे निळे आकर्षक पाणी काही ठिकाणी लाल झाल्याचे शुक्रवारी दिसून आले.गोव्याला 105 किलोमीटरची किनारपट्टी लाभली आहे. पावसाळा सुरू होताच देश-विदेशी पर्यटकांनी गोव्याचा निरोप घेतला आहे. गोव्याच्या किनाऱ्यांवर पावसाळ्य़ात जास्त संख्येने पर्यटक फिरत नाहीत. समुद्रही खवळलेला असतो. काही दिवसांपूर्वी कोलवा येथे समुद्रातील बरीच घाण बाहेर आलेली लोकांनी पाहिली. किनारपट्टीतील अनेक हॉटेल्स आपले सांडपाणी व अन्य घाण समुद्रात सोडपात. अशा प्रकारे सागरी प्रदूषण करण्याची हॉटेलांना मान्यता नसते पण त्यांच्याकडून हे प्रकार केले जातात. पाऊस पडू लागला की, ही घाण किनाऱ्यांवर येऊन पसरते. बरेच प्लॅस्टीक पिशव्या व प्लॅस्टीक बाटल्या, टायरचे मोठे तुकडे, ओंडके, थर्माकोल, पालापाचोळा, मच्छीमारांची तुटलेली जाळी हे सगळे किना:यांवर वाहून येते. आताही काही किनाऱ्यांवर असा कचरा येणे सुरू झाले आहे. तूर्त प्रमाण मर्यादित आहे. मात्र या कच:यामुळे किनारे बकाल बनतात. जे किनारे पर्यटनासाठी खूप प्रसिद्ध आहे, तेथील स्वच्छता लवकर होते पण काही किनारे दुर्लक्षित राहिलेले आहेत. काही ठिकाणी पर्यटक चिप्स वगैरे खाऊन प्लॅस्टीकच्या छोटय़ा पिशव्या तिथेच टाकतात. काही किनाऱ्यांवर पावसाळ्य़ात तेलतवंग व्यापून राहतात. तेलाचे गोळे पसरतात.संस्थेचे निरीक्षण भारतातील सर्व किनाऱ्यांची पाहणी केल्यानंतर गोव्यातील किनाऱ्यांवर प्लॅस्टीकचा कचरा जास्त आढळून येतो, असे निरीक्षण कोची येथील सेंट्रल मरिन फिशरीज रिसर्च संस्थेने (सीएमएफआरआय) नोंदविले आहे. देशातील अकरा राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील एकूण 255 किनाऱ्यांचा ह्या संस्थेच्या पथकाने अभ्यास केला. यात गोव्यातील बारा किनाऱ्यांचा समावेश आहे. प्रत्येक मीटरवर किना:यावरील वाळूमध्ये 25.47 ग्रॅम प्लॅस्टीक आढळते, असा दावा ह्या संस्थेने केला आहे. गोव्यानंतर कर्नाटकमध्ये किना:यांवर प्लॅस्टीकचे प्रदूषण जास्त आढळून आले. त्यानंतर गुजरातमध्येही किना:यांवर प्लॅस्टीक प्रदूषण आढळून आले. दरम्यान, गोव्यात साळगाव येथे आधुनिक असा कचरा प्रक्रिया प्रकल्प आहे. किनाऱ्यांवरील कचरा ह्या प्रकल्पात आणून प्रक्रिया केली जाते. काहीवेळा तुटलेले सोफा, गाद्या, खाटा व अन्य तत्सम कचराही व्यवसायिक किना:यांवर टाकून देतात व अशा प्रकारचा कचरा देखील ह्या प्रकल्पात येतो, असे सरकारच्या कचरा व्यवस्थापन महामंडळाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.