शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
3
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
4
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
5
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
6
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
7
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
8
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
9
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
10
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
11
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
12
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
13
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
14
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
15
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
16
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
17
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
18
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
20
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?

पावसाची दांडी, शेतीचे कसे होणार? शेतकऱ्यांमध्ये चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 08:43 IST

पाण्याअभावी डोंगरी, मरड भात पिक करपण्याची भीती.

लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : काही दिवसांपासून राज्यात पावसाने दांडी मारली असून, नागरिकांना सध्या कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या भात शेतीचे तसेच अन्य पीक पावसाअभावी करपून जाण्याची भीती वाढत आहे. पावसाने पाठ फिरवली तर शेतीचे पुढे काय होईल, अशी चिंता शेतकऱ्यांमध्ये आहे.

दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात येणाऱ्या पावसाचे यंदा उशिरा आगमन झाले. त्यामुळे काही शेतकऱ्यांना उशिरा भात शेतीची लागवड करावी लागली होती. जून महिन्यामध्ये दांडी मारलेल्या पावसाने जुलै महिन्यामध्ये झोडपून काढले होते. जोरदार पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी भात लागवडीला तयारी केली होती. गेल्या काही दिवसांपासून पाऊस पुन्हा गायब झाल्यामुळे सध्या लागवड केलेल्या शेतजमिनीवर भेगा पडलेल्या आहेत. विशेष करून डोंगरी व मरड शेतीमधील पिके करपून जाण्याच्या मार्गावर आहेत. लागवड केलेल्या पिकाला सध्या पावसाची अत्यंत गरज आहे; परंतु सध्या कडक ऊन पडत आहे. अचानक पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकऱ्यांनी घेतलेले कष्ट वाया जाण्याची शक्यता आहे.

फोंडा तालुक्यामध्ये अनेक डोंगरी भागामध्ये काकडे, गोसावी अन्य पिकांची लागवड केलेली आहे. सध्या या पिकांच्या वेली करपून जाण्याच्या मार्गावर आहेत. कडक ऊन अनेक पिकांसाठी मारक ठरत आहे. असेच तापमान आणखी काही दिवस राहिल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

गणेश चतुर्थी सण काहीच दिवसांवर आला आहे. या दिवसात काकडी, दोडगी तसेच अन्य भाज्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. आणखी काही दिवस असेच ऊन पडत राहिल्यास वेली सुकून जातील व गणेश चतुर्थीला पीक मिळणे अशक्य होईल.

याविषयी शिरोडा येथील 'पार्वती नाईक यांनी सांगितले की, आपली शेती डोंगराच्या खालच्या भागात असूनही कडक उन्हामुळे जमिनीला भेगा पडलेल्या आहेत. पाऊस नसल्याने डोंगराळ भागांमध्ये लागवड करण्यात येत असलेली शेती पूर्णपणे सुकून जाईल. या दिवसात पिकाची कणसं बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरु होते. या दिवसात शेतीला पावसाची अत्यंत आवश्यकता असते. अन्यथा पीक नष्ट होण्याची शक्यता असते.

याविषयी बेतोडा येतील शेतकरी मंगलदास गावकर यांनी सांगितले की, यंदा जून महिन्यात पावसाने सुमारे २२ दिवस विलंब केल्यामुळे लागवड करण्यात आलेली दोडगे, भेंडी, काकडी तसेच अन्य पिके टिकून ठेवण्यासाठी बरीच कसरत करावी लागली. जून महिन्यात शेवटच्या आठवड्यात व जुलै महिन्यात सतत पडलेल्या पावसामुळे शेतकयांना पुन्हा नुकसान सहन करावे लागले. त्यात आता मागील काही दिवसांपासून राज्यात कडक ऊन पडत असल्यामुळे वेली सुकण्याच्या मार्गावर आहेत. दिवसा कडक ऊन असले तरी रात्रीही पाऊस पडत नसल्यामुळे चिंता आणखी वाढली आहे. - मंगलदास गावकर. 

टॅग्स :goaगोवाAgriculture Sectorशेती क्षेत्र