शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पावसाची दांडी, शेतीचे कसे होणार? शेतकऱ्यांमध्ये चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 08:43 IST

पाण्याअभावी डोंगरी, मरड भात पिक करपण्याची भीती.

लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : काही दिवसांपासून राज्यात पावसाने दांडी मारली असून, नागरिकांना सध्या कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या भात शेतीचे तसेच अन्य पीक पावसाअभावी करपून जाण्याची भीती वाढत आहे. पावसाने पाठ फिरवली तर शेतीचे पुढे काय होईल, अशी चिंता शेतकऱ्यांमध्ये आहे.

दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात येणाऱ्या पावसाचे यंदा उशिरा आगमन झाले. त्यामुळे काही शेतकऱ्यांना उशिरा भात शेतीची लागवड करावी लागली होती. जून महिन्यामध्ये दांडी मारलेल्या पावसाने जुलै महिन्यामध्ये झोडपून काढले होते. जोरदार पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी भात लागवडीला तयारी केली होती. गेल्या काही दिवसांपासून पाऊस पुन्हा गायब झाल्यामुळे सध्या लागवड केलेल्या शेतजमिनीवर भेगा पडलेल्या आहेत. विशेष करून डोंगरी व मरड शेतीमधील पिके करपून जाण्याच्या मार्गावर आहेत. लागवड केलेल्या पिकाला सध्या पावसाची अत्यंत गरज आहे; परंतु सध्या कडक ऊन पडत आहे. अचानक पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकऱ्यांनी घेतलेले कष्ट वाया जाण्याची शक्यता आहे.

फोंडा तालुक्यामध्ये अनेक डोंगरी भागामध्ये काकडे, गोसावी अन्य पिकांची लागवड केलेली आहे. सध्या या पिकांच्या वेली करपून जाण्याच्या मार्गावर आहेत. कडक ऊन अनेक पिकांसाठी मारक ठरत आहे. असेच तापमान आणखी काही दिवस राहिल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

गणेश चतुर्थी सण काहीच दिवसांवर आला आहे. या दिवसात काकडी, दोडगी तसेच अन्य भाज्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. आणखी काही दिवस असेच ऊन पडत राहिल्यास वेली सुकून जातील व गणेश चतुर्थीला पीक मिळणे अशक्य होईल.

याविषयी शिरोडा येथील 'पार्वती नाईक यांनी सांगितले की, आपली शेती डोंगराच्या खालच्या भागात असूनही कडक उन्हामुळे जमिनीला भेगा पडलेल्या आहेत. पाऊस नसल्याने डोंगराळ भागांमध्ये लागवड करण्यात येत असलेली शेती पूर्णपणे सुकून जाईल. या दिवसात पिकाची कणसं बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरु होते. या दिवसात शेतीला पावसाची अत्यंत आवश्यकता असते. अन्यथा पीक नष्ट होण्याची शक्यता असते.

याविषयी बेतोडा येतील शेतकरी मंगलदास गावकर यांनी सांगितले की, यंदा जून महिन्यात पावसाने सुमारे २२ दिवस विलंब केल्यामुळे लागवड करण्यात आलेली दोडगे, भेंडी, काकडी तसेच अन्य पिके टिकून ठेवण्यासाठी बरीच कसरत करावी लागली. जून महिन्यात शेवटच्या आठवड्यात व जुलै महिन्यात सतत पडलेल्या पावसामुळे शेतकयांना पुन्हा नुकसान सहन करावे लागले. त्यात आता मागील काही दिवसांपासून राज्यात कडक ऊन पडत असल्यामुळे वेली सुकण्याच्या मार्गावर आहेत. दिवसा कडक ऊन असले तरी रात्रीही पाऊस पडत नसल्यामुळे चिंता आणखी वाढली आहे. - मंगलदास गावकर. 

टॅग्स :goaगोवाAgriculture Sectorशेती क्षेत्र