शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

पावसाची दांडी, शेतीचे कसे होणार? शेतकऱ्यांमध्ये चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 08:43 IST

पाण्याअभावी डोंगरी, मरड भात पिक करपण्याची भीती.

लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : काही दिवसांपासून राज्यात पावसाने दांडी मारली असून, नागरिकांना सध्या कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या भात शेतीचे तसेच अन्य पीक पावसाअभावी करपून जाण्याची भीती वाढत आहे. पावसाने पाठ फिरवली तर शेतीचे पुढे काय होईल, अशी चिंता शेतकऱ्यांमध्ये आहे.

दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात येणाऱ्या पावसाचे यंदा उशिरा आगमन झाले. त्यामुळे काही शेतकऱ्यांना उशिरा भात शेतीची लागवड करावी लागली होती. जून महिन्यामध्ये दांडी मारलेल्या पावसाने जुलै महिन्यामध्ये झोडपून काढले होते. जोरदार पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी भात लागवडीला तयारी केली होती. गेल्या काही दिवसांपासून पाऊस पुन्हा गायब झाल्यामुळे सध्या लागवड केलेल्या शेतजमिनीवर भेगा पडलेल्या आहेत. विशेष करून डोंगरी व मरड शेतीमधील पिके करपून जाण्याच्या मार्गावर आहेत. लागवड केलेल्या पिकाला सध्या पावसाची अत्यंत गरज आहे; परंतु सध्या कडक ऊन पडत आहे. अचानक पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकऱ्यांनी घेतलेले कष्ट वाया जाण्याची शक्यता आहे.

फोंडा तालुक्यामध्ये अनेक डोंगरी भागामध्ये काकडे, गोसावी अन्य पिकांची लागवड केलेली आहे. सध्या या पिकांच्या वेली करपून जाण्याच्या मार्गावर आहेत. कडक ऊन अनेक पिकांसाठी मारक ठरत आहे. असेच तापमान आणखी काही दिवस राहिल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

गणेश चतुर्थी सण काहीच दिवसांवर आला आहे. या दिवसात काकडी, दोडगी तसेच अन्य भाज्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. आणखी काही दिवस असेच ऊन पडत राहिल्यास वेली सुकून जातील व गणेश चतुर्थीला पीक मिळणे अशक्य होईल.

याविषयी शिरोडा येथील 'पार्वती नाईक यांनी सांगितले की, आपली शेती डोंगराच्या खालच्या भागात असूनही कडक उन्हामुळे जमिनीला भेगा पडलेल्या आहेत. पाऊस नसल्याने डोंगराळ भागांमध्ये लागवड करण्यात येत असलेली शेती पूर्णपणे सुकून जाईल. या दिवसात पिकाची कणसं बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरु होते. या दिवसात शेतीला पावसाची अत्यंत आवश्यकता असते. अन्यथा पीक नष्ट होण्याची शक्यता असते.

याविषयी बेतोडा येतील शेतकरी मंगलदास गावकर यांनी सांगितले की, यंदा जून महिन्यात पावसाने सुमारे २२ दिवस विलंब केल्यामुळे लागवड करण्यात आलेली दोडगे, भेंडी, काकडी तसेच अन्य पिके टिकून ठेवण्यासाठी बरीच कसरत करावी लागली. जून महिन्यात शेवटच्या आठवड्यात व जुलै महिन्यात सतत पडलेल्या पावसामुळे शेतकयांना पुन्हा नुकसान सहन करावे लागले. त्यात आता मागील काही दिवसांपासून राज्यात कडक ऊन पडत असल्यामुळे वेली सुकण्याच्या मार्गावर आहेत. दिवसा कडक ऊन असले तरी रात्रीही पाऊस पडत नसल्यामुळे चिंता आणखी वाढली आहे. - मंगलदास गावकर. 

टॅग्स :goaगोवाAgriculture Sectorशेती क्षेत्र