शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेसेवेतील गुंतवणूक हाच पर्याय!

By admin | Updated: June 1, 2017 02:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : भारतीय अर्थव्यवस्थेचा जलद विकास हा रेल्वेतील गुंतवणुकीच्या मार्गानेच शक्य असल्याचा दावा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी येथे

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : भारतीय अर्थव्यवस्थेचा जलद विकास हा रेल्वेतील गुंतवणुकीच्या मार्गानेच शक्य असल्याचा दावा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी येथे बुधवारी केला. जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनचा विकास त्यासाठी आदर्श असल्याचे त्यांनी सांगितले. दोनापावल-पणजी येथील इंटरनॅशनल सेंटरमध्ये भारतीय रेल्वेसंबंधित आयोजित कार्यक्रमात रेल्वेमंत्र्यांनी सुरुवातीला ज्या मार्गाने आर्थिक विकास साधला त्याची माहिती दिली. सर्व ठिकाणी एकाच बरोबर विकास साधणे अशक्य आहे, ही गोष्ट चीनने जाणून घेऊन देशभरातील काही शहरांचा विकास केला. त्यानंतर ती शहरे उत्कृष्ट दर्जाची रेल्वेसेवा देऊन जोडली गेली. अशा पद्धतीने टप्प्या-टप्प्याने संपूर्ण देश विकसित केला. भौगोलिक आणि लोकसंख्येच्या दृष्टीने भारत आणि चीनमध्ये साम्य आहे. रेल्वे क्षेत्रात साधनसुविधांचा विकास हा देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. त्यासाठी चांगली सुरुवातही केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयाचा ताबा घेतल्यानंतर परिस्थिती समजून घेण्यासाठी श्वेतपत्रिका काढण्यात आली आणि त्यात नमूद केलेल्या सर्व गोष्टींची आपण सादर केलेल्या दोन्ही रेल्वे अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली. त्यामुळे अडीच वर्षांत रेल्वेत भरपूर सुधारणा झाल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय अर्थव्यवस्थेची १० टक्क्यांनी वाढ करण्याची क्षमता आहे; परंतु त्यासाठी नियोजनबद्ध गुंतवणूक आणि कार्यवाही पाहिजे, असे ते म्हणाले. चांगले परिणाम देण्यासाठी चांगली गुंतवणूक आवश्यक असते. रेल्वेच्या बाबतीत ती सुरू करण्यात आली आहे. भारतीय रेल्वे सेवा ही जलद गतीची वाय-फाय नेटवर्क असलेली जगातील सर्वात जास्त लांबीची रेल्वे सेवा असल्याची माहिती खुद्द गुगलने दिल्याचे त्यांनी सांगितले. कोकण रेल्वेतही वाय-फाय देण्याचे काम सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली. चेंबर आॅफ कॉमर्स आणि इंटरनॅशनल सेंटरतर्फे प्रभू यांचा सत्कार करण्यात आला.