शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

रेल्वेसेवेतील गुंतवणूक हाच पर्याय!

By admin | Updated: June 1, 2017 02:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : भारतीय अर्थव्यवस्थेचा जलद विकास हा रेल्वेतील गुंतवणुकीच्या मार्गानेच शक्य असल्याचा दावा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी येथे

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : भारतीय अर्थव्यवस्थेचा जलद विकास हा रेल्वेतील गुंतवणुकीच्या मार्गानेच शक्य असल्याचा दावा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी येथे बुधवारी केला. जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनचा विकास त्यासाठी आदर्श असल्याचे त्यांनी सांगितले. दोनापावल-पणजी येथील इंटरनॅशनल सेंटरमध्ये भारतीय रेल्वेसंबंधित आयोजित कार्यक्रमात रेल्वेमंत्र्यांनी सुरुवातीला ज्या मार्गाने आर्थिक विकास साधला त्याची माहिती दिली. सर्व ठिकाणी एकाच बरोबर विकास साधणे अशक्य आहे, ही गोष्ट चीनने जाणून घेऊन देशभरातील काही शहरांचा विकास केला. त्यानंतर ती शहरे उत्कृष्ट दर्जाची रेल्वेसेवा देऊन जोडली गेली. अशा पद्धतीने टप्प्या-टप्प्याने संपूर्ण देश विकसित केला. भौगोलिक आणि लोकसंख्येच्या दृष्टीने भारत आणि चीनमध्ये साम्य आहे. रेल्वे क्षेत्रात साधनसुविधांचा विकास हा देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. त्यासाठी चांगली सुरुवातही केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयाचा ताबा घेतल्यानंतर परिस्थिती समजून घेण्यासाठी श्वेतपत्रिका काढण्यात आली आणि त्यात नमूद केलेल्या सर्व गोष्टींची आपण सादर केलेल्या दोन्ही रेल्वे अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली. त्यामुळे अडीच वर्षांत रेल्वेत भरपूर सुधारणा झाल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय अर्थव्यवस्थेची १० टक्क्यांनी वाढ करण्याची क्षमता आहे; परंतु त्यासाठी नियोजनबद्ध गुंतवणूक आणि कार्यवाही पाहिजे, असे ते म्हणाले. चांगले परिणाम देण्यासाठी चांगली गुंतवणूक आवश्यक असते. रेल्वेच्या बाबतीत ती सुरू करण्यात आली आहे. भारतीय रेल्वे सेवा ही जलद गतीची वाय-फाय नेटवर्क असलेली जगातील सर्वात जास्त लांबीची रेल्वे सेवा असल्याची माहिती खुद्द गुगलने दिल्याचे त्यांनी सांगितले. कोकण रेल्वेतही वाय-फाय देण्याचे काम सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली. चेंबर आॅफ कॉमर्स आणि इंटरनॅशनल सेंटरतर्फे प्रभू यांचा सत्कार करण्यात आला.