शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

ब्लू इकॉनॉमीला चालना: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेत 'ऑसिकॉन २५'चे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2025 13:41 IST

ही राष्ट्रीय परिषद गोव्यात होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील 'विकसित भारत २०४७' साठी वैज्ञानिकांचे योगदान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेमध्ये आयोजित केलेल्या ऑसियन सोसायटी ऑफ इंडियाच्या ९ व्या राष्ट्रीय परिषदेत 'ऑसिकॉन २५'च्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनीलकुमार सिंग आणि इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी विविध राज्यातून मोठ्या प्रमाणात वैज्ञानिक सहभागी झाले आहेत.

ही राष्ट्रीय परिषद गोव्यात होत आहे. जगभरातील समुद्र विज्ञान आणि संशोधनावर यामध्ये चर्चा होणार आहे. राष्ट्रीय समुद्र संस्था ही गोव्याची खास ओळख आहे. ऑसिकॉन २५ ही संशोधन कार्यशाळेत देशभरातील ८० संशोधन केंद्रातून ही सहभागी झाले आहेत. 'बदलते हवामानावर' चर्चा आणि मार्गदर्शन होणार आहे. या चर्चासत्रात पर्यावरण, इतर विषयांवर संशोधनाचे सादरीकरण होईल. ६०० हून अधिक प्रतिनिधी

विज्ञानाला अधिक महत्त्व

मुख्यमंत्री सावंत म्हणाले, राज्य सरकार हे विज्ञानाला अधिक महत्त्व देत आहे. गोवा सरकार ब्लू इकॉनॉमी पुढे नेऊ पाहत आहे. त्यासाठी एनआयओचा पाठिंबा मिळत आहे. केंद्र सरकारने यासाठी योग्य ते आर्थिक नियोजन केले आहे.

समुद्र संशोधनाची माहिती

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेअंतर्गत राज्यात समुद्र संशोधनाविषयी मोठी माहिती मिळते. या समुद्र विज्ञान संस्थेतर्फे राज्यात मासळी तसेच इतर विविध विषयांचे मार्गदर्शन मिळत असते. जरी ही संस्था केंद्र सरकारची असली तरी राज्य सरकारकडून या संस्थेला योग्य ते सहकार्य मिळत आहे.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतscienceविज्ञान