शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

ब्लू इकॉनॉमीला चालना: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेत 'ऑसिकॉन २५'चे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2025 13:41 IST

ही राष्ट्रीय परिषद गोव्यात होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील 'विकसित भारत २०४७' साठी वैज्ञानिकांचे योगदान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेमध्ये आयोजित केलेल्या ऑसियन सोसायटी ऑफ इंडियाच्या ९ व्या राष्ट्रीय परिषदेत 'ऑसिकॉन २५'च्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनीलकुमार सिंग आणि इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी विविध राज्यातून मोठ्या प्रमाणात वैज्ञानिक सहभागी झाले आहेत.

ही राष्ट्रीय परिषद गोव्यात होत आहे. जगभरातील समुद्र विज्ञान आणि संशोधनावर यामध्ये चर्चा होणार आहे. राष्ट्रीय समुद्र संस्था ही गोव्याची खास ओळख आहे. ऑसिकॉन २५ ही संशोधन कार्यशाळेत देशभरातील ८० संशोधन केंद्रातून ही सहभागी झाले आहेत. 'बदलते हवामानावर' चर्चा आणि मार्गदर्शन होणार आहे. या चर्चासत्रात पर्यावरण, इतर विषयांवर संशोधनाचे सादरीकरण होईल. ६०० हून अधिक प्रतिनिधी

विज्ञानाला अधिक महत्त्व

मुख्यमंत्री सावंत म्हणाले, राज्य सरकार हे विज्ञानाला अधिक महत्त्व देत आहे. गोवा सरकार ब्लू इकॉनॉमी पुढे नेऊ पाहत आहे. त्यासाठी एनआयओचा पाठिंबा मिळत आहे. केंद्र सरकारने यासाठी योग्य ते आर्थिक नियोजन केले आहे.

समुद्र संशोधनाची माहिती

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेअंतर्गत राज्यात समुद्र संशोधनाविषयी मोठी माहिती मिळते. या समुद्र विज्ञान संस्थेतर्फे राज्यात मासळी तसेच इतर विविध विषयांचे मार्गदर्शन मिळत असते. जरी ही संस्था केंद्र सरकारची असली तरी राज्य सरकारकडून या संस्थेला योग्य ते सहकार्य मिळत आहे.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतscienceविज्ञान