शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

प्रमोद सावंत सरकारची वर्षपूर्ती अपयशाने भरलीय, सुदिन ढवळीकरांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 23:23 IST

अर्थसंकल्पात विविध खात्यांसाठी 2019 साली जो निधी दाखविण्यात आला होता, तो निधी अर्थ खात्याने अन्य खात्यांना दिलेलाच नाही. यामुळे कामे अर्धवट स्थितीत आहेत.

पणजी : प्रमोद सावंतसरकारची वर्षपूर्ती अपयशांनीच भरलेली आहे. प्रशासकीय व आर्थिक व्यवस्थापनाच्या स्तरावर विद्यमान सरकारला पूर्ण अपयश आले, अशी टीका मगोपचे नेते व आमदार सुदिन ढवळीकर यांनी गुरुवारी येथे केली.ढवळीकर यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, की प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघात वीस ते पंचवीस कोटी रुपयांची कामे केली जातील, असे मनोहर पर्रिकर सरकार असताना जाहीर केले गेले होते. मात्र अजुनही विद्यमान सरकारने आमदारांना वीस पंचवीस कोटी रुपयांचा विकास निधी दिलेला नाही. अर्थसंकल्पात विविध खात्यांसाठी 2019 साली जो निधी दाखविण्यात आला होता, तो निधी अर्थ खात्याने अन्य खात्यांना दिलेलाच नाही. यामुळे कामे अर्धवट स्थितीत आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या अतिरिक्त कामांसाठी जे भूसंपादन व्हायला हवे होते, ते झाले नाही. सरकारकडे पैसेच नसल्याने कंत्रटदारांचीही बिले अडली आहेत.वाहतूक खाते महसुल वाढवू शकले नाही. केंद्रीय मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी करण्यातही सरकारला अपयश आले. परिणामी वाहन अपघात वाढत आहेत. किनारे स्वच्छ ठेवण्यातही सरकारला अपयश आले आहे. कच:याची समस्या सरकार अनेक भागांत सोडवू शकले नाही. रस्त्यांवरील खड्डे लवकरच बुजविले जातील असे आम्हाला गेल्यावर्षी विधानसभेत सांगितले गेले होते. मी परवाच मुख्यमंत्र्यांच्या साखळी मतदारसंघातील आमोणो ते साखळी या रस्त्यावरून प्रवास केला. तिथे 28 मोठे खड्डे दिसले. कोरोनाविरोधी उपाययोजना करण्यात सरकारला अपयश आले, तुम्ही सभा घेऊ नका असे लोकांना सांगता व मुख्यमंत्री व सरकारमधील मंत्रीच सभा, बैठका घेऊन स्वत:च्याच सूचनांचे उल्लंघन करत आहेत, असे ढवळीकर म्हणाले.म्हादईप्रश्नी पंतप्रधानांना पत्र दरम्यान, म्हादई पाणीप्रश्नी सर्वपक्षीय शिष्टमंडळच दिल्लीला न्यायला हवे. आपण त्यासाठी पंतप्रधानांना कालच सविस्तर पत्र पाठवले आहे व सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या भेटीसाठी पंतप्रधानांकडे वेळ मागितली आहे. मुख्यमंत्र्यांच्याच नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ जाईल. म्हादई पाणीप्रश्न नेमका काय आहे व त्याचे परिणाम गोव्याला कसे भोगावे लागतात हे मी पत्रत मांडले आहेच. कर्नाटकमधील सुपा धरणाची उंची वाढवा किंवा तिथे नवे धरण बांधा व त्याद्वारे हुबळी धारवाडला पाणी द्या, असे पत्रतून आपण सूचविले असल्याचे ढवळीकर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :goaगोवाGovernmentसरकारPramod Sawantप्रमोद सावंत