शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

गोव्यात लागू झालेले कलम 144 मागे घेऊ-  प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 16:35 IST

कार्निव्हल व शिगमो साजरा करण्यावर कलम 144 चा काहीही परिणाम होणार नाही.

पणजी : राज्यात लागू करण्यात आलेले कलम 144 मागे घेण्याचा सरकारचा विचार आहे. आपण सध्या स्थितीचा आढावा घेत आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शनिवारी येथे पत्रकारांना सांगितले.

उत्तर व दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून दरवेळी कलम 144 लागू करण्याविषयीची अधिसूचना जारी केली जात होती पण त्यामुळे कधीच गोंधळ झाला नव्हता. यावेळी अधिसूचनेला जास्तच प्रसिद्धी मिळाल्याने गोंधळ झाला. काहीजणांचा गैरसमजही झाला. त्यामुळे आपण त्या अधिसूचनेचा फेरआढावा घेईन. आपण दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे. कलम 144 मागे घेण्याचाही मी विचार करीन, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

कार्निव्हल व शिगमो साजरा करण्यावर कलम 144 चा काहीही परिणाम होणार नाही. दहशतवादी हल्ल्याची शक्यताच नाही. नियमितपणो प्रशासकीय प्रक्रीयेचा एक भाग म्हणून दोन्ही जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू करण्याचे काम दरवेळी केले गेले. यावेळीच त्यावरून गैरसमज निर्माण झाल्याने ते कलम मागे घेण्यासाठीही सरकार पाऊले उचलील, असे मुख्यमंत्री म्हणाले. पर्यटकांनी घाबरू नये. पर्यटन व्यवसायाचा व कलम 144 चा काही संबंध नाही असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

दरम्यान, राज्यात येत्या 22 मार्च रोजी जिल्हा पंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी मतदारसंघांचे आरक्षणही सरकारने अजून लागू केलेले नाही. यामुळे विरोधी काँग्रेस व मगो पक्षाने सरकारवर टीका केली आहे. निवडणुकाच पुढे ढकला अशीही मागणी विरोधक करू लागले आहेत. निवडणुकीची आचारसंहिता कधी लागू होईल असे पत्रकारांनी विचारले असता, एकदा निवडणुकीचा पूर्ण कार्यक्रम जाहीर होताच, त्याचक्षणी आचारसंहिताही लागू होईल एवढेच मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंतgoaगोवा