शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मृत शरीर निर्वस्त्र करून जाळण्याची प्रथा गोव्यात खंडीत होण्याची चिन्हं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2017 20:20 IST

एखादी व्यक्ती मृत झाल्यानंतर त्या व्यक्तीचे शरीर अंत्यसंस्कारावेळी निर्वस्त्र न करण्याबाबत गोव्यात आता प्रथमच जागृती वाढू लागली आहे.

ठळक मुद्दे एखादी व्यक्ती मृत झाल्यानंतर त्या व्यक्तीचे शरीर अंत्यसंस्कारावेळी निर्वस्त्र न करण्याबाबत गोव्यात आता प्रथमच जागृती वाढू लागली आहे.विविध गावांतील पंचायती, संघटनांकडून या प्रथेविषयी महत्त्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत.

पणजी - एखादी व्यक्ती मृत झाल्यानंतर त्या व्यक्तीचे शरीर अंत्यसंस्कारावेळी निर्वस्त्र न करण्याबाबत गोव्यात आता प्रथमच जागृती वाढू लागली आहे. विविध गावांतील पंचायती, संघटनांकडून या प्रथेविषयी महत्त्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत. साळगाव मुक्तीधाम समितीच्याही नुकत्याच झालेल्या बैठकीत यापुढे कुणाचंही निधन झाल्यावर अंत्यसंस्कारावेळी मयताच्या शरीरावरील सगळे कपडे काढायचे नाहीत, असा निर्णय घेण्यात आला.

रमेश घाडी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीला समिती सदस्यांव्यतिरिक्त गावातील काही प्रतिष्ठीत नागरिकांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावेळी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. शिरगाव ग्रामपंचायतीच्याही नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत एक निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे गावात कुठल्याही महिलेचं निधन झाल्यानंतर तिच्या शरीरावरील कपड्यांसह मृतदेहाचं दहन करण्यात येईल, अशा प्रकारचा निर्णय ग्रामसभेत झाला आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी सोशल मिडियावरून या निर्णयाचे स्वागत केलं आहे.

यामुळे गोव्यातील मानवी हक्क आयोगानेही अंत्यसंस्कारावेळी महिलांच्या शरीरावरील कपडे काढले जाऊ नयेत, अशा अर्थाची सूचना केलेली आहे. विविध ग्रामसभांमध्ये तसेच विविध सामाजिक संस्थांच्या व्यासपीठावरून आता गोव्यात याविषयी चर्चा होऊ लागली आहे व निर्णयही घेतले जाऊ लागले आहेत. मयतांचे सगळे कपडे अंत्यसंस्कारावेळी काढण्याची प्रथा गोव्यात नजिकच्या काळात पूर्णपणो थांबेल, असे संकेत या घटनांमधून मिळू लागले आहेत.

दरम्यान, साळगाव येथे झालेल्या मुक्तीधाम समितीच बैठकीत इतरही काही निर्णय घेण्यात आले. स्मशानभूमी परिसर स्वच्छ व सुशोभित करण्याचे ठरले. सध्याचे प्रवेशद्वार मोडून नवे बांधले जाईल, अशी माहिती सरचिटणीस प्रदीप पाडगावकर यांनी दिली. पूर्ण गावासाठी एकच स्मशानभूमी असून तिचा विस्तार केला जावा याबाबतही बैठकीत चर्चा झाली. नामदेव हुम्रसकर, प्रमोद परुळेकर, वासूदेव शिरोडकर, तानाजी वेळगेकर, अजरुन हरमलकर यांनी बैठकीतील चर्चेत भाग घेतला. काहीजणांनी विविध कामांचा खर्च करण्यास मदतीचे आश्वासन दिले. खजिनदार मनोज बोरकर यांनी खर्चाचा तपशील सांगितला.   हल्लीच मरण पावलेले समितीचे सदस्य नागेश नाईक, तसेच स्मशानभूमीप्रश्नी वर्षाआधी झालेल्या वादात मदत केलेले तातू मांद्रेकर व इतरांना बैठकीवेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.