शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
4
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
5
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
6
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
7
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
8
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
9
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
10
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
11
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
12
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
13
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
14
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
15
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
16
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
17
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
18
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
19
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
20
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!

मृत शरीर निर्वस्त्र करून जाळण्याची प्रथा गोव्यात खंडीत होण्याची चिन्हं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2017 20:20 IST

एखादी व्यक्ती मृत झाल्यानंतर त्या व्यक्तीचे शरीर अंत्यसंस्कारावेळी निर्वस्त्र न करण्याबाबत गोव्यात आता प्रथमच जागृती वाढू लागली आहे.

ठळक मुद्दे एखादी व्यक्ती मृत झाल्यानंतर त्या व्यक्तीचे शरीर अंत्यसंस्कारावेळी निर्वस्त्र न करण्याबाबत गोव्यात आता प्रथमच जागृती वाढू लागली आहे.विविध गावांतील पंचायती, संघटनांकडून या प्रथेविषयी महत्त्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत.

पणजी - एखादी व्यक्ती मृत झाल्यानंतर त्या व्यक्तीचे शरीर अंत्यसंस्कारावेळी निर्वस्त्र न करण्याबाबत गोव्यात आता प्रथमच जागृती वाढू लागली आहे. विविध गावांतील पंचायती, संघटनांकडून या प्रथेविषयी महत्त्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत. साळगाव मुक्तीधाम समितीच्याही नुकत्याच झालेल्या बैठकीत यापुढे कुणाचंही निधन झाल्यावर अंत्यसंस्कारावेळी मयताच्या शरीरावरील सगळे कपडे काढायचे नाहीत, असा निर्णय घेण्यात आला.

रमेश घाडी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीला समिती सदस्यांव्यतिरिक्त गावातील काही प्रतिष्ठीत नागरिकांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावेळी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. शिरगाव ग्रामपंचायतीच्याही नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत एक निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे गावात कुठल्याही महिलेचं निधन झाल्यानंतर तिच्या शरीरावरील कपड्यांसह मृतदेहाचं दहन करण्यात येईल, अशा प्रकारचा निर्णय ग्रामसभेत झाला आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी सोशल मिडियावरून या निर्णयाचे स्वागत केलं आहे.

यामुळे गोव्यातील मानवी हक्क आयोगानेही अंत्यसंस्कारावेळी महिलांच्या शरीरावरील कपडे काढले जाऊ नयेत, अशा अर्थाची सूचना केलेली आहे. विविध ग्रामसभांमध्ये तसेच विविध सामाजिक संस्थांच्या व्यासपीठावरून आता गोव्यात याविषयी चर्चा होऊ लागली आहे व निर्णयही घेतले जाऊ लागले आहेत. मयतांचे सगळे कपडे अंत्यसंस्कारावेळी काढण्याची प्रथा गोव्यात नजिकच्या काळात पूर्णपणो थांबेल, असे संकेत या घटनांमधून मिळू लागले आहेत.

दरम्यान, साळगाव येथे झालेल्या मुक्तीधाम समितीच बैठकीत इतरही काही निर्णय घेण्यात आले. स्मशानभूमी परिसर स्वच्छ व सुशोभित करण्याचे ठरले. सध्याचे प्रवेशद्वार मोडून नवे बांधले जाईल, अशी माहिती सरचिटणीस प्रदीप पाडगावकर यांनी दिली. पूर्ण गावासाठी एकच स्मशानभूमी असून तिचा विस्तार केला जावा याबाबतही बैठकीत चर्चा झाली. नामदेव हुम्रसकर, प्रमोद परुळेकर, वासूदेव शिरोडकर, तानाजी वेळगेकर, अजरुन हरमलकर यांनी बैठकीतील चर्चेत भाग घेतला. काहीजणांनी विविध कामांचा खर्च करण्यास मदतीचे आश्वासन दिले. खजिनदार मनोज बोरकर यांनी खर्चाचा तपशील सांगितला.   हल्लीच मरण पावलेले समितीचे सदस्य नागेश नाईक, तसेच स्मशानभूमीप्रश्नी वर्षाआधी झालेल्या वादात मदत केलेले तातू मांद्रेकर व इतरांना बैठकीवेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.