शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पोर्तुगीज नागरिकत्व हवे की भारतीय?. गोव्यातील प्रश्नासंबंधी सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 15:24 IST

गोव्यातील ज्या नागरिकांनी आपल्या जन्माची नोंद पोर्तुगालमधील लिस्बनच्या रजिस्ट्रीमध्ये केली आहे, अशा सर्व गोमंतकीयांच्या नागरिकत्वाबाबतचा वाद निकालात काढण्याची प्रक्रिया आता सुरू होत आहे.

पणजी - गोव्यातील ज्या नागरिकांनी आपल्या जन्माची नोंद पोर्तुगालमधील लिस्बनच्या रजिस्ट्रीमध्ये केली आहे, अशा सर्व गोमंतकीयांच्या नागरिकत्वाबाबतचा वाद निकालात काढण्याची प्रक्रिया आता सुरू होत आहे. यासाठी संबंधितांकडून अर्ज व आक्षेप सादर करून घेऊन त्याबाबत सुनावण्या घेण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा मार्ग आता गोवा सरकारने मोकळा केला आहे. उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी निला मोहनन यांनी या वृत्तास दुजोरा दिला. गृह खाते व कायदा खात्याने सार्वजनिक नोटीशीचा मसुदा आता मंजुर केला आहे. त्यामुळे पुढील आठवडाभरात आम्ही नोटीस जारी करू आणि मग अर्जावर आणि आक्षेपांवर सुनावणी घेऊ असे जिल्हाधिकारी मोहनन यानी लोकमतला सांगितले.

19 डिसेंबर 1961 पूर्वी जन्मलेल्या गोमंतकीयांना व त्यांच्या मुलांना पोर्तुगालमध्ये जन्मनोंदणी करण्याची मुभा आहे. पोर्तुगीज कायद्यात तशी तरतुद आहे. गोव्यात डिसेंबर 1961 पर्यंत पोर्तुगीजांची राजवट होती. सुमारे 40 हजार गोमंतकीयांनी पोर्तुगालमध्ये जन्मनोंदणी केलेली आहे. अनेकानी पोर्तुगालचे नागरिकत्वही घेतले. सर्वांनीच नागरिकत्व घेतले नाही पण पोर्तुगालमध्ये ज्या गोमंतकीयांची जन्मनोंदणी झाली त्यांच्याही नागरित्वाबाबत वाद आहे. काही आजी-माजी आमदारांसह गोव्यातील हजारो ख्रिस्ती धर्मियांना या  वादाची आतापर्यंत झळ बसलेली आहे.

पोर्तुगालमध्ये जन्मनोंदणी केली की युरोपियन राष्ट्रांमध्ये सहज प्रवेश मिळतो व नोकरी-धंदा  आणि शिक्षण यासाठी ही सोय उपयुक्त ठरते. एवढाच हेतू यामागे आहे पण अशा गोमंतकीयांच्या नागरिकत्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने  केंद्र सरकारने गेल्यावर्षी वाद निकालात काढण्यासाठी गोव्याच्या दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती केली.