शहरं
Join us  
Trending Stories
1
'जात नाही, तर आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण हवे', सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
2
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
3
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
4
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
5
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
6
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
7
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
8
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
9
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
10
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
11
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
12
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
13
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
14
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
15
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
16
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
18
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
19
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
20
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान

म्हादईप्रश्नी दोन्ही राज्यांत राजकारण, गोव्याचे बरेच पाणी वळवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2018 12:43 IST

म्हादई पाणीप्रश्नी गोवा व कर्नाटक अशा दोन्ही राज्यांमध्ये विविध राजकीय पक्ष आणि विविध पक्षांचे नेते, आमदार वगैरे सध्या जोरदार राजकारण खेळत आहेत

पणजी : म्हादई पाणीप्रश्नी गोवा व कर्नाटक अशा दोन्ही राज्यांमध्ये विविध राजकीय पक्ष आणि विविध पक्षांचे नेते, आमदार वगैरे सध्या जोरदार राजकारण खेळत आहेत. कर्नाटकच्या विधानसभा निवडणुका जवळ पोहचल्यामुळे म्हादईप्रश्नी दोन्ही राज्यांमधील नेत्यांकडून उलटसुलट विधाने येऊ लागली आहेत. तथापि, कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी गोवा सरकारने त्वरित सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर करावी, अशी मागणी केली आहे. कर्नाटकने गोव्याकडे येणारे बरेच पाणी अगोदरच वळविल्याचा दावा लोबो यांनी केला आहे.

आपण रविवारी म्हादईच्या कळसा-भंडुरा प्रवाहाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केल्यामुळे आपण बोलत आहे. गेली चार-पाच वर्षे कर्नाटकचे म्हादईच्या प्रवाहावर काम सुरू होते हे कळून येते. म्हादईच्या एका प्रवाहावर कर्नाटकने लोखंडी गेट बसवली आहे. ही गेट पाणी नियंत्रणासाठी आहे. म्हादईच्या प्रवाहावर फक्त स्लॅब तेवढा घालणो बाकी आहे. लोखंडी काम सगळे पूर्ण झाले आहे. काँक्रिट टाकण्यासाठी एक दिवस देखील नको. ते काम कर्नाटक कधीही करू शकते,असे लोबो म्हणाले. म्हादई पाणी तंटा लवादाचे कर्नाटक ऐकत नाही. कर्नाटकने म्हादईच्या प्रवाहांवर जे काय चालवले आहे, ते सगळे सर्वोच्च न्यायालयाच्या नजरेस सरकारने आणून द्यायला हवे. त्यासाठी त्वरित गोवा सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेणो योग्य ठरेल, असे लोबो म्हणाले.

विधानसभेच्या येत्या अधिवेशनात आपण म्हादईप्रश्नी ठराव सादर करणार आहे. प्रसंगी आपण स्वत: सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर करू शकतो, असेही लोबो म्हणाले. सभापती डॉ. प्रमोद सावंत हेही रविवारी कळसा-भंडुरा प्रवाहाला भेट देऊन आले आहेत. सभापतींनी आपण सरकारला अहवाल सादर करणार असल्याचे जाहीर केले आहे.

दरम्यान, कर्नाटकमध्ये सध्या भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांचे नेते म्हादईप्रश्नी विविध विधाने करून वातावरण तापवत आहेत, अशी माहिती मिळाली. आम्ही गोव्याशी चर्चा करण्यास अजुनही तयार आहोत, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांनी म्हादईप्रश्नात लक्ष घालावे अशी मागणी त्यांनी केली आहे. कर्नाटकमधील भाजपच्या नेत्यांनी मात्र सिद्धरामय्या हे म्हादईप्रश्न सोडविण्यास गंभीर नाहीत अशी टीका केली आहे. आम्ही गोवा व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना चर्चेसाठी कधीही बोलावू शकतो, असे भाजपच्या नेत्यांनी म्हटले आहे.