शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

म्हादईप्रश्नी दोन्ही राज्यांत राजकारण, गोव्याचे बरेच पाणी वळवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2018 12:43 IST

म्हादई पाणीप्रश्नी गोवा व कर्नाटक अशा दोन्ही राज्यांमध्ये विविध राजकीय पक्ष आणि विविध पक्षांचे नेते, आमदार वगैरे सध्या जोरदार राजकारण खेळत आहेत

पणजी : म्हादई पाणीप्रश्नी गोवा व कर्नाटक अशा दोन्ही राज्यांमध्ये विविध राजकीय पक्ष आणि विविध पक्षांचे नेते, आमदार वगैरे सध्या जोरदार राजकारण खेळत आहेत. कर्नाटकच्या विधानसभा निवडणुका जवळ पोहचल्यामुळे म्हादईप्रश्नी दोन्ही राज्यांमधील नेत्यांकडून उलटसुलट विधाने येऊ लागली आहेत. तथापि, कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी गोवा सरकारने त्वरित सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर करावी, अशी मागणी केली आहे. कर्नाटकने गोव्याकडे येणारे बरेच पाणी अगोदरच वळविल्याचा दावा लोबो यांनी केला आहे.

आपण रविवारी म्हादईच्या कळसा-भंडुरा प्रवाहाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केल्यामुळे आपण बोलत आहे. गेली चार-पाच वर्षे कर्नाटकचे म्हादईच्या प्रवाहावर काम सुरू होते हे कळून येते. म्हादईच्या एका प्रवाहावर कर्नाटकने लोखंडी गेट बसवली आहे. ही गेट पाणी नियंत्रणासाठी आहे. म्हादईच्या प्रवाहावर फक्त स्लॅब तेवढा घालणो बाकी आहे. लोखंडी काम सगळे पूर्ण झाले आहे. काँक्रिट टाकण्यासाठी एक दिवस देखील नको. ते काम कर्नाटक कधीही करू शकते,असे लोबो म्हणाले. म्हादई पाणी तंटा लवादाचे कर्नाटक ऐकत नाही. कर्नाटकने म्हादईच्या प्रवाहांवर जे काय चालवले आहे, ते सगळे सर्वोच्च न्यायालयाच्या नजरेस सरकारने आणून द्यायला हवे. त्यासाठी त्वरित गोवा सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेणो योग्य ठरेल, असे लोबो म्हणाले.

विधानसभेच्या येत्या अधिवेशनात आपण म्हादईप्रश्नी ठराव सादर करणार आहे. प्रसंगी आपण स्वत: सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर करू शकतो, असेही लोबो म्हणाले. सभापती डॉ. प्रमोद सावंत हेही रविवारी कळसा-भंडुरा प्रवाहाला भेट देऊन आले आहेत. सभापतींनी आपण सरकारला अहवाल सादर करणार असल्याचे जाहीर केले आहे.

दरम्यान, कर्नाटकमध्ये सध्या भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांचे नेते म्हादईप्रश्नी विविध विधाने करून वातावरण तापवत आहेत, अशी माहिती मिळाली. आम्ही गोव्याशी चर्चा करण्यास अजुनही तयार आहोत, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांनी म्हादईप्रश्नात लक्ष घालावे अशी मागणी त्यांनी केली आहे. कर्नाटकमधील भाजपच्या नेत्यांनी मात्र सिद्धरामय्या हे म्हादईप्रश्न सोडविण्यास गंभीर नाहीत अशी टीका केली आहे. आम्ही गोवा व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना चर्चेसाठी कधीही बोलावू शकतो, असे भाजपच्या नेत्यांनी म्हटले आहे.