शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

म्हादईप्रश्नी दोन्ही राज्यांत राजकारण, गोव्याचे बरेच पाणी वळवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2018 12:43 IST

म्हादई पाणीप्रश्नी गोवा व कर्नाटक अशा दोन्ही राज्यांमध्ये विविध राजकीय पक्ष आणि विविध पक्षांचे नेते, आमदार वगैरे सध्या जोरदार राजकारण खेळत आहेत

पणजी : म्हादई पाणीप्रश्नी गोवा व कर्नाटक अशा दोन्ही राज्यांमध्ये विविध राजकीय पक्ष आणि विविध पक्षांचे नेते, आमदार वगैरे सध्या जोरदार राजकारण खेळत आहेत. कर्नाटकच्या विधानसभा निवडणुका जवळ पोहचल्यामुळे म्हादईप्रश्नी दोन्ही राज्यांमधील नेत्यांकडून उलटसुलट विधाने येऊ लागली आहेत. तथापि, कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी गोवा सरकारने त्वरित सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर करावी, अशी मागणी केली आहे. कर्नाटकने गोव्याकडे येणारे बरेच पाणी अगोदरच वळविल्याचा दावा लोबो यांनी केला आहे.

आपण रविवारी म्हादईच्या कळसा-भंडुरा प्रवाहाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केल्यामुळे आपण बोलत आहे. गेली चार-पाच वर्षे कर्नाटकचे म्हादईच्या प्रवाहावर काम सुरू होते हे कळून येते. म्हादईच्या एका प्रवाहावर कर्नाटकने लोखंडी गेट बसवली आहे. ही गेट पाणी नियंत्रणासाठी आहे. म्हादईच्या प्रवाहावर फक्त स्लॅब तेवढा घालणो बाकी आहे. लोखंडी काम सगळे पूर्ण झाले आहे. काँक्रिट टाकण्यासाठी एक दिवस देखील नको. ते काम कर्नाटक कधीही करू शकते,असे लोबो म्हणाले. म्हादई पाणी तंटा लवादाचे कर्नाटक ऐकत नाही. कर्नाटकने म्हादईच्या प्रवाहांवर जे काय चालवले आहे, ते सगळे सर्वोच्च न्यायालयाच्या नजरेस सरकारने आणून द्यायला हवे. त्यासाठी त्वरित गोवा सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेणो योग्य ठरेल, असे लोबो म्हणाले.

विधानसभेच्या येत्या अधिवेशनात आपण म्हादईप्रश्नी ठराव सादर करणार आहे. प्रसंगी आपण स्वत: सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर करू शकतो, असेही लोबो म्हणाले. सभापती डॉ. प्रमोद सावंत हेही रविवारी कळसा-भंडुरा प्रवाहाला भेट देऊन आले आहेत. सभापतींनी आपण सरकारला अहवाल सादर करणार असल्याचे जाहीर केले आहे.

दरम्यान, कर्नाटकमध्ये सध्या भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांचे नेते म्हादईप्रश्नी विविध विधाने करून वातावरण तापवत आहेत, अशी माहिती मिळाली. आम्ही गोव्याशी चर्चा करण्यास अजुनही तयार आहोत, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांनी म्हादईप्रश्नात लक्ष घालावे अशी मागणी त्यांनी केली आहे. कर्नाटकमधील भाजपच्या नेत्यांनी मात्र सिद्धरामय्या हे म्हादईप्रश्न सोडविण्यास गंभीर नाहीत अशी टीका केली आहे. आम्ही गोवा व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना चर्चेसाठी कधीही बोलावू शकतो, असे भाजपच्या नेत्यांनी म्हटले आहे.