शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
3
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
4
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
5
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
6
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
7
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
8
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
9
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
10
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
11
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
12
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
13
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
14
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
15
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
16
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
17
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
18
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
19
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
20
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
Daily Top 2Weekly Top 5

दाबोळी विमानतळावरून नाहक ओरड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2024 10:26 IST

आता काही विमान कंपन्यांनी मोपाचाच विमानतळ वाहतुकीसाठी निवडला असेल, तर त्यावरून थयथयाट करायची गरज नसावी.

वामन प्रभू, ज्येष्ठ पत्रकार

दाबोळी विमानतळावरून विरोधकांचा सध्या सुरू असलेला थयथयाट पाहाता कोणाही त्रयस्थाला वाटावे की या विमानतळाला आता कधीही टाळे लागेल. वस्तुस्थिती मात्र पूर्णपणे वेगळी आहे. मोपा येथील नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे दाबोळीवरचा ताण बराच कमी झाला आहे. तो पाहता ते घडणे अपेक्षितच होते. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना चघळायला एखादा दुसरा मुद्दा हवाय है मान्य असले तरी दाबोळी विमानतळावरून विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणा वा गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई आदी नेते सध्या बेताल होऊन जे बरळत आहेत ते मुद्दयाला धरून आहे, असे वाटत नाही.

अलीकडेच वास्को येथे स्थानिक आमदाराने द्विवर्षपूर्तीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, दाबोळीचे आमदार आणि मंत्री माविन गुदिनो आदिंनी दाबोळी विमानतळ कायमचा बंद करण्याचा सरकारचा विचार असल्याचा सातत्याने जो आरोप होत आहे, तो खोडून काढताना हा विमानतळ कोणत्याही परिस्थितीत बंद केला जाणार नसल्याचा पुनरुच्चार करून गोवा लहान असला तरी दोन विमानतळांची गरज आहे, असे निःसंदिग्धपणे जाहीर केले होते. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांनीही याआधी याबाबत केंद्राची भूमिका स्पष्ट केली असतानाही काही ना काही निमित्ताने विरोधक या आरोपांचा पुनरुच्चार करत वेगळेच चित्र लोकांपुढे ठेवण्याचा प्रयन करताना दिसतात.

दाबोळीचा विमानतळ बंद करण्याच्या हालचाली राज्य आणि केंद्रीय स्तरावर सुरू आहेत, हा जो आरोप मागील पाच-सहा महिन्यांपासून विरोधक करत आहेत त्यास नेमका कोणता आधार आहे हे कळायला मार्ग नाही. राज्य विधानसभेतही एक दोनवेळा हा विषय चर्चेला आला आणि सरकारची भूमिकाही स्पष्टपणे समोर आली. आता अजून एक दोन विमान कंपन्यांनी आपला मोर्चा मोपाच्या नव्या विमानतळाकडे वळवला असेलही.

गोव्यासाठी पूर्ण स्वतंत्र आणि भव्य असा आंतरराष्ट्रीय विमानतळ उभा राहिल्यानंतर या गोष्टी घडून येणे अपेक्षित आहेच, पण त्याच आधारावर ओरड करण्याएवढी परिस्थिती हाताबाहेर गेली का हाच खरा प्रश्न आहे आणि वस्तुस्थिती तपासून पाहिल्यास तसे वाटतही नाही. आजच्या परिस्थितीत सरकारलाही दाबोळी विमानतळ बंद करण्याचा विचारही मनात आणता येणार नाही. त्यामागे अनेक कारणेही आहेत पण नजीकच्या काळात दाबोळी विमानतळ नागरी वाहतुकीस बंद होण्याच्या ज्या भीतीने विरोधकांना पछाडले आहे, ती भीती अनाठायी म्हणता येईल. आजही या विमानतळावर उतरणा-या प्रवाशांची संख्या आधीच्या तुलनेत अगदीच कमी झाली आहे असे म्हणण्यासारखी निश्चितच नाही, तरीही विरोधक त्याचा एवढा बाऊ का करतात हे कळत नाही.

स्पायजेट कंपनीनेही आता आपली सर्व वाहतूक मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून करण्याचा निर्णय घेतल्याने विरोधक बिथरले असावेत हे समजू शकते. पण दाबोळीचा विमानतळ बंद करण्याच्या विरोधात गोवा उभा ठाकला आहे याचीही दखल येथील डबल इंजिन सरकारला घ्यावीच लागणार आहे. दाबोळी विमानतळावरून होणारी वाहतूक जवळपास थांबली असल्याचा जो दावा केला जातो तो मात्र खरा नाही. आजही दाबोळी विमानतळावर दर दिवशी साधारणपणे ५५ ते ५६ विमाने उतरतात आणि आठेक हजार प्रवासी गोव्यात दाखल होतात. या विमानतळावरून रोज वेगवेगळ्या ठिकाणी उड्डाण करत असलेल्या प्रवाशांची संख्या नऊ हजारांवर जात असल्याचे सांगितले जाते आणि हे जर खरे असेल तर दाबोळी विमानतळाकडे सरकारचा सवतासुभा असल्याचे कोणत्या निकषावर म्हणता येईल? 

मोपाच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सध्या दर दिवशी उतरणा-या विमानांची संख्या ४५ ४६ च्या पुढे जात नाही आणि दाबोळी विमानतळाच्या तुलनेत या विमानतळावर उतरणा-या आणि येथून उड्डाण करणा-या प्रवाशांची संख्याही अजून एवढी वाढलेली नाही की कोणी त्याचा धसका घ्यावा. प्रत्येक विमानामागे सरासरी दोनशे प्रवासी धरले तरी दाबोळी आणि मोपा विमानतळावर प्रवाशांची होणारी वर्दळ जवळपास समान असताना विरोधक नेमके कशाच्या आधारावर दाबोळी विमानतळ बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र निर्माण करतात, हेही त्यांनी एकदाचे सांगायला हवे.

मोपाचा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प हा साधारण तीन हजार कोटींचा असून अजून दुस-या टप्प्याचे काम व्हायचे असले तरी या विमानतळावरूनही वाहतूक सुरू होऊन तो मार्गी लागायला हवा, याबाबत कोणाचा आक्षेप असेल असे वाटत नाही. आता काही विमान कंपन्यांनी मोपाचाच विमानतळ वाहतुकीसाठी निवडला तर त्यावरून थयथयाट करायची गरज नसावी. दाबोळीवरून इंडिगो, विस्तारा, एअर इंडियाची प्रवासी वाहतूक सुरूच असून आंतरराष्ट्रीय मार्गावरही कटार एअरवेज, गल्फवेज आणि एअर इंडिया यांची सेवा येथून चालू असताना सगळीच विमानवाहतूक जणू काही मोपावरूनच होऊ लागल्याचा जो आभास केला जातो तो मात्र चुकीचा आहे.

मोपा विमानतळ सुरू होण्याआधीचा विचार केल्यास दाबोळी विमानतळावरून दररोज सुमारे ८० ते १० विमाने उतरायची आणि रविवारी कदाचित ही संख्या १०० वरही जायची. प्रवाशांची संख्या आताच्या तुलनेत दीडपट होती, याचाच अर्थ असा काढता येईल की दाबोळी विमानतळावरची वाहतूक आजही ब-यापैकी सुरू आहे. दाबोळी विमानतळ बंद करायचाच असता तर आज हे चित्र दिसले नसते असे त्याहीपुढे जाऊन म्हणता येईल. दाबोळी विमानतळ दक्षिण गोव्यासाठी खूप महत्त्वाचा असून आजही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मार्गावरील प्रवासी दाबोळीलाच प्राधान्य देतात ही वस्तुस्थिती आहे. अशा परिस्थितीत सरकारला हा विमानतळ बंद करणे परवडणारे नाही याचेही भान ठेवण्याची गरज आहे. नाहक ओरड केल्याने काहीही साध्य होणार नाही.

 

टॅग्स :goaगोवा