शहरं
Join us  
Trending Stories
1
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
2
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
3
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
4
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
5
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
6
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो
7
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
8
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
9
Video: लायब्ररीतून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झाडल्या गोळ्या, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
11
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
12
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
13
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
14
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
15
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
16
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
17
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
18
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
19
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
20
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!

वधू एक, नवरे अनेक; लोकसभा तिकिटासाठी भाजपमध्येच चुरस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 12:45 IST

उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघ सर्व राजकारण्यांसाठी प्रचंड उत्सुकतेचा विषय बनला आहे.

उत्तर गोवालोकसभा मतदारसंघ सर्व राजकारण्यांसाठी प्रचंड उत्सुकतेचा विषय बनला आहे. विशेषतः भाजपमध्ये भंडारी समाजातील जे जे कुणी नेते आहेत, त्या सर्वांनाच वाटते की, आपण खासदार होऊ शकतो. तिकीटरुपी वधू जर प्रसन्न झाली तर, आपले काम झालेच म्हणून समजा, असे काही नेते सांगू लागले आहेत. वधू एक आणि नवरे अनेक अशी स्थिती उत्तरेत आहे. म्हणजे भाजपचे तिकीट एकच आहे, इच्छुक मात्र पाचजण आहेत. 'नवरे' हा शब्द केंद्रीय मंत्री तथा उत्तरेचे खासदार श्रीपाद नाईक यांनी चपखलपणे वापरला आहे. तुळशीचे लग्न झाल्यानंतर अनेक नवरे तयार झाले, असे भाष्य करून श्रीपादभाऊंनी अनेकांच्या हृदयाच्या तारा छेडल्या. 

माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, दिलीप परुळेकर, जयेश साळगावकर, दयानंद सोपटे यांनी तिकीटावर दावा केला आहे. या चौघांपैकी तिघाजणांनी तर गर्जनाच चालविल्या आहेत. श्रीपादभाऊंना तिकीट दिले नाही तर, आम्हाला तिकीट द्या असे हे नेते सूचवतात. परुळेकर व मांद्रेकर आपण खूप ज्येष्ठ आहोत असेही वारंवार सांगत आहेत. सोपटे यांनी श्रीपाद नाईक यांना थोडा वेगळा सल्ला दिल्यानंतर भाजपमध्ये खळबळ उडाली, मात्र भाऊ यांना 'जाण्टो' म्हणणे म्हणजे 'ज्येष्ठ' असा अर्थ अपेक्षित आहे, असा खुलासा काल सोपटे यांनी केला. अनेकजण तिकीटावर दावा करत असल्याने श्रीपादभाऊ मनातून थोडे विचलित झाले असतील, पण त्यांनी संयम ठेवला आहे. त्यांनी सोपटे किंवा परुळेकर किंवा मांद्रेकर यापैकी कुणालाच दुरुत्तर दिलेले नाही. शेवटी पक्षाने तिकीट कुणाला द्यावे ते पक्षाकडूनच दिल्लीत ठरविले जाईल. आपण त्याविषयी जास्त भाष्य करणार नाही, पण तिकीटाचा दावा इच्छुकांनी योग्य त्या व्यासपीठावर करावा असा सल्ला काल नाईक यांनी दिला.

श्रीपादभाऊ सातत्याने उत्तर गोवा मतदारसंघातून निवडून आले आहेत. बहुतांश काळ त्यांनी सत्ता पाहिली. १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत श्रीपाद नाईक जर मडकई मतदारसंघात पराभूत झाले नसते तर कदाचित ते खासदार व केंद्रीय मंत्री होऊ शकले नसते. ९९ साली सुदिन ढवळीकर यांनी भाऊंना पराभूत केले होते. सुदिनचेही नशीब असे की आमदार झाल्यानंतर सुदिन ढवळीकर यांनीही बहुतांश काळ सत्ता अनुभवली. गोव्यात अनेक वर्षे मंत्रिपदाचा मुकुट ढवळीकर यांच्या डोक्यावर राहिला. तसाच मुकुट केंद्रात श्रीपादभाऊंच्या डोक्यावर राहिला. मडकई मतदारसंघात जन्मलेले हे दोन्ही नेते याबाबत नशीबवान ठरले आहेत.

भाजपमधील जास्त नेते दक्षिण गोवा मतदारसंघातून तिकीट मागत नाहीत. कारण तिथे अग्नीदिव्याला सामोरे जावे लागेल. बाबू कवळेकर हे तिकीट मागतात, कारण ते विधानसभा निवडणूक हरले आहेत. नरेंद्र सावईकर तिकीट मागतात, कारण ते लोकसभा निवडणुकीत यापूर्वी पराभूत झालेले आहेत. दामू नाईक यांच्याही मनात तिकीटाची इच्छा आहे, कारण त्यांनीही फातोड्र्थात पराभवाचा अनुभव घेतलेला आहे. जे आमदार किंवा खासदार नाहीत, असे नेते तिकीट मागतात. उत्तर गोव्यात मात्र खरोखर नवऱ्यांचीच रांग आहे. काहींनी बाशिंग तयार ठेवलेय व नवे कपडेही शिवलेत. काहीजणांनी नवऱ्याप्रमाणे मेकअपही केला आहे. भंडारी समाजातूनच उत्तरेत अधिक नवरे तयार झाले आहेत. 

श्रीपाद नाईक यांना भाजपने तिकीट नाकारण्यासारखे सबळ कारण सध्या तरी दिसत नाही. वय झाले तरी, ते अजून सक्रिय आहेत. पूर्ण उत्तर गोवा मतदारसंघात फिरू शकतात. ते फिरतच असतात हे मान्य करावे लागेल. अर्थात भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या मनात काय येईल ते सांगता येत नाही. कारण कर्नाटकसह विविध ठिकाणच्या विधानसभा निवडणुकांवेळी काही ज्येष्ठांचे पत्ते भाजपने कट केले आहेत. तरी देखील उत्तर गोव्यात श्रीपाद नाईक यांनाच भाजपचे तिकीट मिळू शकते, असे मुख्यमंत्री सावंत किंवा सदानंद तानावडे हे कुणालाही खासगीत सांगतील. मुख्यमंत्री सावंत यांनी तर एकदा साखळीत व एकदा रायबंदर येथे भाऊंच्या वाढदिनी बोलताना त्याविषयी सूतोवाच केलेच आहे. एक स्वामीदेखील भाजपच्या तिकीटावर दावा करतात अशी चर्चा होती. त्यामुळे मुख्यमंत्री सावंत यांनी श्रीपाद हेच आमच्यासाठी भाजपमध्ये स्वामी आहेत, असे जाहीर करून बरेच काही सूचित केले आहे.

 

टॅग्स :goaगोवाlok sabhaलोकसभा