शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

वधू एक, नवरे अनेक; लोकसभा तिकिटासाठी भाजपमध्येच चुरस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 12:45 IST

उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघ सर्व राजकारण्यांसाठी प्रचंड उत्सुकतेचा विषय बनला आहे.

उत्तर गोवालोकसभा मतदारसंघ सर्व राजकारण्यांसाठी प्रचंड उत्सुकतेचा विषय बनला आहे. विशेषतः भाजपमध्ये भंडारी समाजातील जे जे कुणी नेते आहेत, त्या सर्वांनाच वाटते की, आपण खासदार होऊ शकतो. तिकीटरुपी वधू जर प्रसन्न झाली तर, आपले काम झालेच म्हणून समजा, असे काही नेते सांगू लागले आहेत. वधू एक आणि नवरे अनेक अशी स्थिती उत्तरेत आहे. म्हणजे भाजपचे तिकीट एकच आहे, इच्छुक मात्र पाचजण आहेत. 'नवरे' हा शब्द केंद्रीय मंत्री तथा उत्तरेचे खासदार श्रीपाद नाईक यांनी चपखलपणे वापरला आहे. तुळशीचे लग्न झाल्यानंतर अनेक नवरे तयार झाले, असे भाष्य करून श्रीपादभाऊंनी अनेकांच्या हृदयाच्या तारा छेडल्या. 

माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, दिलीप परुळेकर, जयेश साळगावकर, दयानंद सोपटे यांनी तिकीटावर दावा केला आहे. या चौघांपैकी तिघाजणांनी तर गर्जनाच चालविल्या आहेत. श्रीपादभाऊंना तिकीट दिले नाही तर, आम्हाला तिकीट द्या असे हे नेते सूचवतात. परुळेकर व मांद्रेकर आपण खूप ज्येष्ठ आहोत असेही वारंवार सांगत आहेत. सोपटे यांनी श्रीपाद नाईक यांना थोडा वेगळा सल्ला दिल्यानंतर भाजपमध्ये खळबळ उडाली, मात्र भाऊ यांना 'जाण्टो' म्हणणे म्हणजे 'ज्येष्ठ' असा अर्थ अपेक्षित आहे, असा खुलासा काल सोपटे यांनी केला. अनेकजण तिकीटावर दावा करत असल्याने श्रीपादभाऊ मनातून थोडे विचलित झाले असतील, पण त्यांनी संयम ठेवला आहे. त्यांनी सोपटे किंवा परुळेकर किंवा मांद्रेकर यापैकी कुणालाच दुरुत्तर दिलेले नाही. शेवटी पक्षाने तिकीट कुणाला द्यावे ते पक्षाकडूनच दिल्लीत ठरविले जाईल. आपण त्याविषयी जास्त भाष्य करणार नाही, पण तिकीटाचा दावा इच्छुकांनी योग्य त्या व्यासपीठावर करावा असा सल्ला काल नाईक यांनी दिला.

श्रीपादभाऊ सातत्याने उत्तर गोवा मतदारसंघातून निवडून आले आहेत. बहुतांश काळ त्यांनी सत्ता पाहिली. १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत श्रीपाद नाईक जर मडकई मतदारसंघात पराभूत झाले नसते तर कदाचित ते खासदार व केंद्रीय मंत्री होऊ शकले नसते. ९९ साली सुदिन ढवळीकर यांनी भाऊंना पराभूत केले होते. सुदिनचेही नशीब असे की आमदार झाल्यानंतर सुदिन ढवळीकर यांनीही बहुतांश काळ सत्ता अनुभवली. गोव्यात अनेक वर्षे मंत्रिपदाचा मुकुट ढवळीकर यांच्या डोक्यावर राहिला. तसाच मुकुट केंद्रात श्रीपादभाऊंच्या डोक्यावर राहिला. मडकई मतदारसंघात जन्मलेले हे दोन्ही नेते याबाबत नशीबवान ठरले आहेत.

भाजपमधील जास्त नेते दक्षिण गोवा मतदारसंघातून तिकीट मागत नाहीत. कारण तिथे अग्नीदिव्याला सामोरे जावे लागेल. बाबू कवळेकर हे तिकीट मागतात, कारण ते विधानसभा निवडणूक हरले आहेत. नरेंद्र सावईकर तिकीट मागतात, कारण ते लोकसभा निवडणुकीत यापूर्वी पराभूत झालेले आहेत. दामू नाईक यांच्याही मनात तिकीटाची इच्छा आहे, कारण त्यांनीही फातोड्र्थात पराभवाचा अनुभव घेतलेला आहे. जे आमदार किंवा खासदार नाहीत, असे नेते तिकीट मागतात. उत्तर गोव्यात मात्र खरोखर नवऱ्यांचीच रांग आहे. काहींनी बाशिंग तयार ठेवलेय व नवे कपडेही शिवलेत. काहीजणांनी नवऱ्याप्रमाणे मेकअपही केला आहे. भंडारी समाजातूनच उत्तरेत अधिक नवरे तयार झाले आहेत. 

श्रीपाद नाईक यांना भाजपने तिकीट नाकारण्यासारखे सबळ कारण सध्या तरी दिसत नाही. वय झाले तरी, ते अजून सक्रिय आहेत. पूर्ण उत्तर गोवा मतदारसंघात फिरू शकतात. ते फिरतच असतात हे मान्य करावे लागेल. अर्थात भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या मनात काय येईल ते सांगता येत नाही. कारण कर्नाटकसह विविध ठिकाणच्या विधानसभा निवडणुकांवेळी काही ज्येष्ठांचे पत्ते भाजपने कट केले आहेत. तरी देखील उत्तर गोव्यात श्रीपाद नाईक यांनाच भाजपचे तिकीट मिळू शकते, असे मुख्यमंत्री सावंत किंवा सदानंद तानावडे हे कुणालाही खासगीत सांगतील. मुख्यमंत्री सावंत यांनी तर एकदा साखळीत व एकदा रायबंदर येथे भाऊंच्या वाढदिनी बोलताना त्याविषयी सूतोवाच केलेच आहे. एक स्वामीदेखील भाजपच्या तिकीटावर दावा करतात अशी चर्चा होती. त्यामुळे मुख्यमंत्री सावंत यांनी श्रीपाद हेच आमच्यासाठी भाजपमध्ये स्वामी आहेत, असे जाहीर करून बरेच काही सूचित केले आहे.

 

टॅग्स :goaगोवाlok sabhaलोकसभा