शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

मृत्युशय्येवर गोवा!... तमाम गोवेकरांचा सामूहिक आत्मघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2018 17:09 IST

एक मरणासन्न, अखेरचे आचके देणारे राज्य असलेले गोवा आणि गोमंतकीय स्वत:चे आणखी अध:पतन करून घेतील आणि देशभरात विनोदाचा विषय बनतील, असे कधी वाटले नव्हते.

- डॉ. ऑस्कर रिबेलो

एक मरणासन्न, अखेरचे आचके देणारे राज्य असलेले गोवा आणि गोमंतकीय स्वत:चे आणखी अध:पतन करून घेतील आणि देशभरात विनोदाचा विषय बनतील, असे कधी वाटले नव्हते. मात्र, अहो आश्चर्यम्! या राज्याने अशक्य ते शक्य करून दाखवले आहे. कौतुकास्पद अशीच ही कामगिरी!!

तशी इथली जनता नैतिक दिवाळखोरी जाहीर केलेली. २०१७च्या निवडणुकीत आम्ही स्वत:चीच विक्री करून बसलो. आणि आता लाज-भीड न ठेवता सध्याच्या तथाकथित गंभीर राजकीय परिस्थितीचे विच्छेदन उसन्या गांभीर्याने करत आपल्याच पेंगलेल्या नजरेसमोर चाललेल्या तमाशाला सहन करतो आहोत. यातूनही काही चांगले निघेल, हा आपला आशावाद! याला विनोद म्हणायचे नाही तर काय?

आमच्या समोर जो तमाशा चालला आहे, त्याचे संक्षिप्त वर्णन असे करता येईल:

एक राजा व्याधीने ग्रस्त आणि त्रस्त आहे, तरीही त्याला सत्तेचा मोह सुटत नाही. त्याचे रंध्रन् रंध्र स्वार्थी राजकारणाने लडबडलेले आहे, तिथे मुत्सद्देगिरीचा लवलेशही नाही. त्याच्याप्रमाणेच व्याधीग्रस्त असलेल्या दोन मंत्र्यांच्या हाती नारळ दिलाय (याला भूतदया म्हणायचे का?) त्यामुळे सहकारी पक्ष आणि स्वकीयांतली गिधाडे जागी होऊन घिरट्या घालायला लागली आहेत. ‘दैवी’ अधिष्ठान असलेल्या या पक्षाच्या उभारणीसाठी सर्वस्व देणाऱ्या कार्यकर्त्यांना आपल्या जखमांवर पर्यायी औषधांसह स्व-उपचार करण्यासाठी तसेच सोडून देण्यात आले आहे. काही सन्माननीय अपवाद वगळता प्रसारमाध्यमेही ही नौटंकी आणि तिच्यायोगे आपले संविधान व लोकशाहीची चाललेली विटंबना मुक्याने पाहताहेत.

नौटंकी जोशात चालू आहे आणि आपण तोंड आ वासून पाहातो आहोत; इतकेच नव्हे तर एखादा परिचयाचा चेहरा रंगमंचाच्या मध्यावर आला तर त्याचा टाळ्यांनी जयजयकारही करतो आहोत!!

आमच्या समस्यांचाही आम्हाला विसर पडलाय, कचरा, पाणीटंचाईची समस्या दृष्टीआड गेलीय. पर्यावरणाचा विध्वंस किंवा भ्रष्टाचाराचा वडवानल आम्हाला विचलित नाही करू शकत. अर्थव्यवस्थेला मारू दे झक... आमच्या सांस्कृतिक वारशाला क्षद्मराष्ट्रीयत्व आणि जागतिकीकरणाने गुंडाळले तरीही हरकत नाही! आमच्या अस्तित्वाशी संबंध असलेल्या विषयांच्या बाबतीतही आम्ही अनासक्त आहोत. आम्हाला स्वारस्य आहे ते राजकीय पटलावर चाललेल्या शर्मनाक नौटंकीत. केवळ स्वत:च्या समाजातल्या सत्ताकांक्षी नेत्यांच्या लालसेचे इंगळे फुलते राहावेत यासाठी टाळ्या पिटणे आणि इतर समाजातल्या नेत्यांची पीछेहाट पाहून त्यांची टर उडवणे यावरच आम्ही समाधानी आहोत. अन्य राजकीय संघटनांच्या सच्छील नेत्यांची आणि निर्लस कार्यकर्त्यांची केवळ टर उडवणे आणि निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव करण्यात समाधान मानणे, हीच आमची राजकीय पोच. तसे करून झाल्यावर मात्र आम्ही थोडा पश्चात्ताप करतो, एखादे भावनिक आवाहन असलेले गीत ऐकून गोव्यासाठी दोन अश्रू ढाळतो किंवा मद्याचा प्याला रिता करत आपले राज्यावर अजूनही प्रेम असल्याचे स्वत:लाच बजावत बसतो.

नौटंकीतल्या तमाम जोकर्सना आम्हीच स्वेच्छेने, विचारपूर्वक निवडून दिलेय आणि त्यायोगे आमच्या राज्याला मृत्युशय्येवर ढकललेय, हे जोपर्यंत आम्ही कबूल करणार नाही, तोपर्यंत परिस्थिती बदलणार नाही. ते कदापि शक्य नाही!

पण, मुळात गोव्याला वाचवायचे प्रयोजन आहे का? की आपण स्वत:चीच तशी समजूत करून घेतली आहे? गोव्याचे बंगळुरू किंवा पुणे किंवा सिंगापूर-दुबई व्हावे आणि पैशांच्या प्रपातात संस्कृती-वारशाने वाहून जावे, असेच तर गोमंतकीयांना वाटत नाही ना?

मात्र, एक गोष्ट लक्षात ठेवा, मित्रांनो! राजकारण्यांना दोष देणे सोपे असते; पण आज जो मरणासन्न गोवा दिसतोय ना, तो केवळ त्यांच्यामुळे झालेला नाही. हा एकेकाळी जगाच्या अप्रुपाचा विषय असलेल्या; पण कालौघात पूर्वग्रहांच्या अतिरेकामुळे आपले मानसिक संतुलन गमावून बसलेल्या आणि आत्मग्लानीप्रत आलेल्या तमाम गोवेकरांचा सामूहिक आत्मघात आहे!

(लेखक गोव्यातील सामाजिक आंदोलनाचे नेते आहेत.) 

टॅग्स :goaगोवा