शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

गोव्यासाठी नैसर्गिक स्रोत धोरण हवे; नोबेल विजेते प्रफुल्ल समंतरा यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2019 08:14 IST

समतोल दूर करायचा असेल तर कृषी विकास आणि पारंपरिक पद्धती हातात हात घालून पुढे गेल्या पाहिजेत तसेच जबाबदार औद्योगिकीकरण आणि सावध विकास अपेक्षित आहे, असे प्रतिपादन हरित नोबेल विजेते प्रफुल्ल समंतरा यांनी केले.

ठळक मुद्देसमतोल दूर करायचा असेल तर कृषी विकास आणि पारंपरिक पद्धती हातात हात घालून पुढे गेल्या पाहिजेत तसेच जबाबदार औद्योगिकीकरण आणि सावध विकास अपेक्षित आहे.ओडिशातील डोंगरिया कोंढ समाजासाठी त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. हरित चळवळीत मोठा वाटा असलेले समंतरा यांनी स्वयंपोषकता आणि विकास यावरही भाष्य केले.

पणजी - समतोल दूर करायचा असेल तर कृषी विकास आणि पारंपरिक पद्धती हातात हात घालून पुढे गेल्या पाहिजेत तसेच जबाबदार औद्योगिकीकरण आणि सावध विकास अपेक्षित आहे, असे प्रतिपादन हरित नोबेल विजेते प्रफुल्ल समंतरा यांनी केले. गोव्यासाठी नैसर्गिक स्रोत धोरणाची गरजीही त्यांनी व्यक्त केली आहे.

कला अकादमी संकुलात गोवा लाइव्हलीवूड फोरमने आयोजित केलेल्या उदरनिर्वाह या विषयावर चर्चासत्रात ते बोलत होते. प्रफुल्ल समंतरा यांनी ओडिशात वनक्षेत्रात खाणींविरोधात तब्बल १२ वर्षे लढा दिला तसेच नियामगिरी डोंगरकपारीत खाणींसाठी घरे गमावलेल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य केले. ओडिशातील डोंगरिया कोंढ समाजासाठी त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. 

हरित चळवळीत मोठा वाटा असलेले समंतरा यांनी स्वयंपोषकता आणि विकास यावरही भाष्य केले. वित्त खात्याचे सचिव दौलत हवालदार, आघाडीचे उद्योजक तथा ‘मेट’चे अध्यक्ष नितीन कुंकळ्येंकर हे याप्रसंगी उपस्थित होते. गोवा लाइव्हलीवूड फोरमने अध्यक्ष चारुदत्त पाणीग्रही यांनी उद्देश स्पष्ट केला. हवालदार म्हणाले की, आज जगभरात असमानता आहे. शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाच्या साधनाला धोका पोचला आहे.

टॅग्स :goaगोवा