शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

मेरशी हल्ल्यामागे पोलीस निष्क्रियता

By admin | Updated: June 16, 2017 02:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : मुंबईतील पर्यटकांवर जीवघेण्या हल्ल्याच्या थरारानंतर मेरशी गाव दहशतीखाली वावरत आहे. चारपैकी तिघा हल्लेखोरांचा

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : मुंबईतील पर्यटकांवर जीवघेण्या हल्ल्याच्या थरारानंतर मेरशी गाव दहशतीखाली वावरत आहे. चारपैकी तिघा हल्लेखोरांचा गुंडगिरी हाच व्यवसाय असून चौथा हल्लीच त्यांच्या चमूत सामील झाला आहे. हे लोक कुणाचा तरी घात केल्याशिवाय राहणार नाहीत, अशी या भागात चर्चा आहे; परंतु दहशतीमुळे उघडपणे बोलण्यास कुणीही धजत नाही. मुंबईतील पर्यटकांपैकी एका प्रौढ गृहस्थाचा हात चुकून लॉरेन्स डायस याला लागला. तेव्हा ‘तू मला हात लावलासच कसा?’ असे म्हणत त्या प्रौढ गृहस्थाच्या थोबाडीत लगावून भांडण करणारा लॉरेन्स हाच या हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे. बिचाऱ्या त्या पर्यटकाने मार खाऊन देखील हे प्रकरण हॉटेलमध्येच मिटविण्यासाठी लॉरेन्ससमोर हातही जोडले होते. मात्र, लॉरेन्स काहीच न बोलता शांत राहिला, त्यामुळे हे प्रकरण मिटले समजून पर्यटक निघून गेले. परंतु ते पर्यटक निघताच लॉरेन्सने तिथूनच आपल्या साथीदारांना फोन केला व त्या पर्यटकांवर सशस्त्र हल्ला चढविण्याचा बेत आखला आणि तो अमलातही आणला. सीसीटीव्ही फोडण्याची धमकीज्या हॉटेलमध्ये मुंबईतील पर्यटक चहा आणि नाश्ता करण्यासाठी थांबले होते त्या हॉटेलमध्ये लॉरेन्स याने केलेला सर्व हंगामा तेथील सीसीटीव्हीत टिपला गेला आहे. भांडणानंतर सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्यासाठी लॉरेन्सकडून हॉटेलवाल्यांना सुनावले होते. ते फुटेज पोलिसांकडे पोहोचल्यास सीसीटीव्हीसह हॉटेलही फोडून टाकू, अशी धमकीही तो देऊन गेला होता. एक माणूस भर दिवसा सार्वजनिक ठिकाणी येतो आणि धमकी देऊन जातो असे प्रकार बऱ्याच काळानंतर गोव्यात पुन्हा सुरू झाले आहेत. गोव्यात सुट्टी घालविण्यासाठी आलेले वसईतील हे पर्यटक एकाच परिवारातील होते. ते अत्यंत सभ्य, प्रामाणिक आणि भले माणूस होते, असे ज्या ठिकाणी हे पर्यटक थांबले होते त्या गेस्ट हाऊसच्या मालक मारिया आणि ज्या हॉटेलमध्ये ते नाश्ता घेण्यासाठी गेले होते तेथील कर्मचारीही सांगतात. गोव्यातील माणसे फार चांगली आहेत. पुन्हा गोव्यात येण्यासाठी फार आवडेल, असे सांगून ही मंडळी परतीच्या वाटेला निघाली होती; परंतु त्यानंतर जे काही घडले त्यामुळे उभ्या जन्मात पुन्हा गोव्यात येण्याचे धाडस ते करणार नाहीत. तसा संदेशही त्यांनी सोशल मीडियावर टाकला आहे.