शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मोदी यांच्या कृत्रिम फुग्यातील हवा लोकांनी काढून घेतली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 19:26 IST

गोव्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांची प्रतिक्रिया  

पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृत्रिम फुग्यातील हवा लोकांनी काढून घेतली, अशी शब्दात तीन राज्यांमध्ये भाजपच्या झालेल्या पानीपतावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी प्रतिक्रिया दिली. 

चोडणकर म्हणतात की, ‘भाजप आणि त्यांच्या नेत्यांच्या खोटाडरडेपणाला जनतेने चोख उत्तर दिले. हे मतदान स्वातंत्र्य, लोकशाही आणि निधर्मी तत्त्वांसाठी आणि बहुसांस्कृतिक भारतासाठी झालेले आहे. समावेशक भारताची ओळख जनतेला कायम ठेवायची असून आगामी लोकसभा निवडणुकीकरिता भारतीय राजकीय व्यवस्थेसाठी नवी दिशा लोकांनी घालून दिली आहे.’

मोदी यांच्या लोकशाही संस्था नष्ट करण्याच्या तसेच फुटीच्या राजकारणाच्या नीतीला कंटाळून लोकांनी हा कौल दिला आहे. काँग्रेसच्या या विजयाचे श्रेय पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी आखलेले धोरण तसेच भ्रष्टाचाराविरुध्द उघडलेल्या आघाडीलाही जाते.

 ‘गोव्याच्या राजकारणावरही दूरगामी परिणाम’  या निकालांचा गोव्याच्या राजकारणावरही दूरगामी परिणाम होणार असल्याचे चोडणकर यांनी म्हटले आहे. राज्यात भाजपसोबत सत्तेत सामील असलेल्या गोवा फॉरवर्ड तसेच अन्य घटक पक्षाला हा धडा आहे. या पक्षाच्या नेत्यांनी राहुल गांधी यांच्यावर विधानसभेत तसेच सभागृहाबाहेरही टीका केली होती, असे चोडणकर म्हणतात. मांद्रे आणि शिरोडा मतदारसंघातील आगामी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला किंमत मोजावी लागेल कारण गेल्या विधानसभा निवडणुकीत लोकांनी काँग्रेसला दिलेला कौल भाजने हिरावून घेतला. गेले नऊ महिने राज्यात प्रशासन नाही. सत्तेचा गैरवापर करु नये तसेच लोकांनाही गृहित धरु नये हा धडा या निकालांमधून भाजपने घ्यावा, असा सल्लाही चोडणकर यानी दिला आहे.  

पणजीत काँग्रेसचा विजयोत्सवराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या घवघवीत यशानिमित्त प्रदेश काँग्रेसने फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला. सायंकाळी ५ च्या सुमारास येथील काँग्रेस भवनासमोर प्रदेश समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जमले व त्यांनी ‘काँग्रेस झिंदाबाद’, राहुल गांधी यांचा विजय असो’ अशा जोरदार घोषणा दिल्या. प्रदेश प्रवक्ते ऊर्फान मुल्ला, संकल्प आमोणकर तसेच जनार्दन भांडारी व अन्य पदाधिकारी तसेच कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते. तत्पूर्वी पत्रकार परिषदेत ऊर्फान मुल्ला प्रदेश काँग्रेसतर्फे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांचे अभिनंदन करताना म्हणाले की, ‘ परिवर्तनाच्या लाटेत भाजप वाहून गेला आहे. भाजप सत्तेसाठी हपापलेला होता व काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न पहात होता परंतु लोकांनीच त्यांना त्यांची जागा दाखवली. 

टॅग्स :goaगोवाRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूक