शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

मोदी यांच्या कृत्रिम फुग्यातील हवा लोकांनी काढून घेतली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 19:26 IST

गोव्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांची प्रतिक्रिया  

पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृत्रिम फुग्यातील हवा लोकांनी काढून घेतली, अशी शब्दात तीन राज्यांमध्ये भाजपच्या झालेल्या पानीपतावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी प्रतिक्रिया दिली. 

चोडणकर म्हणतात की, ‘भाजप आणि त्यांच्या नेत्यांच्या खोटाडरडेपणाला जनतेने चोख उत्तर दिले. हे मतदान स्वातंत्र्य, लोकशाही आणि निधर्मी तत्त्वांसाठी आणि बहुसांस्कृतिक भारतासाठी झालेले आहे. समावेशक भारताची ओळख जनतेला कायम ठेवायची असून आगामी लोकसभा निवडणुकीकरिता भारतीय राजकीय व्यवस्थेसाठी नवी दिशा लोकांनी घालून दिली आहे.’

मोदी यांच्या लोकशाही संस्था नष्ट करण्याच्या तसेच फुटीच्या राजकारणाच्या नीतीला कंटाळून लोकांनी हा कौल दिला आहे. काँग्रेसच्या या विजयाचे श्रेय पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी आखलेले धोरण तसेच भ्रष्टाचाराविरुध्द उघडलेल्या आघाडीलाही जाते.

 ‘गोव्याच्या राजकारणावरही दूरगामी परिणाम’  या निकालांचा गोव्याच्या राजकारणावरही दूरगामी परिणाम होणार असल्याचे चोडणकर यांनी म्हटले आहे. राज्यात भाजपसोबत सत्तेत सामील असलेल्या गोवा फॉरवर्ड तसेच अन्य घटक पक्षाला हा धडा आहे. या पक्षाच्या नेत्यांनी राहुल गांधी यांच्यावर विधानसभेत तसेच सभागृहाबाहेरही टीका केली होती, असे चोडणकर म्हणतात. मांद्रे आणि शिरोडा मतदारसंघातील आगामी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला किंमत मोजावी लागेल कारण गेल्या विधानसभा निवडणुकीत लोकांनी काँग्रेसला दिलेला कौल भाजने हिरावून घेतला. गेले नऊ महिने राज्यात प्रशासन नाही. सत्तेचा गैरवापर करु नये तसेच लोकांनाही गृहित धरु नये हा धडा या निकालांमधून भाजपने घ्यावा, असा सल्लाही चोडणकर यानी दिला आहे.  

पणजीत काँग्रेसचा विजयोत्सवराजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या घवघवीत यशानिमित्त प्रदेश काँग्रेसने फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला. सायंकाळी ५ च्या सुमारास येथील काँग्रेस भवनासमोर प्रदेश समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जमले व त्यांनी ‘काँग्रेस झिंदाबाद’, राहुल गांधी यांचा विजय असो’ अशा जोरदार घोषणा दिल्या. प्रदेश प्रवक्ते ऊर्फान मुल्ला, संकल्प आमोणकर तसेच जनार्दन भांडारी व अन्य पदाधिकारी तसेच कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते. तत्पूर्वी पत्रकार परिषदेत ऊर्फान मुल्ला प्रदेश काँग्रेसतर्फे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांचे अभिनंदन करताना म्हणाले की, ‘ परिवर्तनाच्या लाटेत भाजप वाहून गेला आहे. भाजप सत्तेसाठी हपापलेला होता व काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न पहात होता परंतु लोकांनीच त्यांना त्यांची जागा दाखवली. 

टॅग्स :goaगोवाRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूक