शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
5
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
6
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
7
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
8
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
9
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
10
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
11
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
12
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
13
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
14
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
15
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
16
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
17
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
18
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
19
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
20
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक

मनोहर पर्रीकरांनी सन्मानाने मुख्यमंत्रीपद सोडावे, राष्ट्रवादीची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 19:54 IST

मनोहर पर्रीकर यांनी सन्मानाने मुख्यमंत्रीपद सोडावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जुङो फिलिप डिसोझा यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केली.

पणजी : मनोहर पर्रीकर यांनी सन्मानाने मुख्यमंत्रीपद सोडावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जुङो फिलिप डिसोझा यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केली. तसेच लोकसभा निवडणुकीवेळी उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपला उमेदवार उभा करील, असेही त्यांनी जाहीर केले.

सतिश नारायणी यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा अध्यक्षपदी नियुक्ती झाली असल्याचे जुङो फिलिप यांनी स्पष्ट केले. यापुढे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शाखेच्याही अध्यक्ष नियुक्त केल्या जातील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम आम्ही वाढवणार असून मांद्रे व शिरोडातील पोटनिवडणुकीवेळीही उमेदवार उभे करण्याचा विचार आहे  व त्यासाठी कार्यकत्र्यानी काम सुरू केले आहे. लोकसभा निवडणुकीवेळी तर उत्तर गोव्याची जागा यापूर्वीही राष्ट्रवादीने लढवलेली आहे. महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती आहे. गोव्यातही युती असल्याचे आम्ही मानतो. काँग्रेसने उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी सोडावा, असे जुङो फिलिप डिसोझा म्हणाले.

पर्रीकर यांच्याविषयी बोलताना जुङो फिलिप म्हणाले, की पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळात 2000 साली मी काम केले आहे. त्यांच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्न नाही पण सध्या लोकांचे सगळेच प्रश्न रेंगाळत पडले आहेत. प्रशासन होरपळत आहे व जनतेचेही हाल सुरू आहेत. र्पीकर आजारी असल्याने कामाला न्यायच देऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी सन्मानाने मुख्यमंत्री पदापासून दूर व्हावे व दुस:या कोणत्याही नेत्याकडे पद सोपवावे, असे जुङो फिलिप म्हणाले.

धारगळमध्ये लोकांवर अन्याय  

दरम्यान, धारगळमध्ये गरीब शेतक-यांची 6 लाख चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा आयुष मंत्रलयाने कवडीमोल दराने ताब्यात घेतली. प्रत्यक्षात 8 लाख चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा मंत्रलयाने प्राप्त केली. त्यापैकी दोन लाख चौरस मीटर एवढीच वापरली जाईल. केवळ पंचवीस रुपये प्रति चौरस मीटर दराने ही जागा ताब्यात घेतली गेली आहे. धारगळच्या लोकांवर सरकारने अन्याय केला. केवळ अकरा लाख रुपयांची भरपाई दिली व शिरोडय़ात मात्र 1 लाख 80 हजार चौरस मीटरच्या जागेसाठी सुभाष शिरोडकर यांना सरकारने 70 कोटींची भरपाई दिली, असे उपाध्यक्ष संजय बर्डे म्हणाले. धारगळच्या लोकांनी जर भाजपमध्ये उडय़ा टाकल्या असत्या, तर त्या लोकांना शिरोडकरांप्रमाणोच र्पीकर सरकार जास्त भरपाई देणार होते. र्पीकर यांनी घरी झोपून राज्याचा कारभार चालवू नये, असे बर्डे म्हणाले.यावेळी अविनाश भोसले, अनिल जोलापुरे, सतिश नारायणी, राजन साटेलकर उपस्थित होते.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा