शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
4
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
5
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
6
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
7
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
8
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
9
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
10
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
11
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
12
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
13
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
14
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
15
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
16
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
17
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
18
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
19
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
20
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर

पर्रीकरांनी जनतेची सहानुभूती गमावली : कुतिन्हो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 20:18 IST

मोर्चामध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातीलही अधिकारी होते व सभापतींच्याही कार्यालयात काम करणारे अधिकारी होते, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.

पणजी : काँग्रेस कार्यकर्त्यांवर झालेला हल्ला हा राज्य सरकार पुरस्कृत आहे. कारण मोर्चामध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातीलही अधिकारी होते व सभापतींच्याही कार्यालयात काम करणारे अधिकारी होते, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. गृह खाते झोपलेले असून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी जनतेची सहानुभूती गमावली आहे, अशी टीका काँग्रेसच्या महिला शाखेच्या अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत केली.

पर्रीकर यांना पूर्वीही लोकांची सहानुभूती नव्हती व आता तरी मुळीच राहिलेली नाही, असे कुतिन्हो म्हणाल्या. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी महिलांवर हात टाकला. आमच्यावर हल्ला केला. अशा प्रकारच्या गुंडगिरीला प्रोत्साहन देण्यासाठी भाजपने सतिश धोंड यांना पुन्हा गोव्यात आणले आहे. आपण भाजपच्या कृतीचा निषेध करते, असे कुतिन्हो म्हणाल्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर हे अशिक्षित खासदार असून तेही काँग्रेस कार्यकर्त्यांवरील हल्ल्यावेळी पुढे होते, असे कुतिन्हो म्हणाल्या. 

लोकशाहीत गुद्दे चालत नाहीत, मुद्दे असावे लागतात. मुद्दे संपल्याने भाजप गुद्दय़ांवर आला. आम्ही देखील कमी नाही पण आम्ही असला हिंसक मार्ग स्वीकारणार नाही, आम्ही मुद्दे मांडू, असे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे म्हणाले. 

राहुल गांधींकडून कौतुक लोकशाही भाजपला निराश करत आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी गोव्यातील घटनेबाबत सोशल मिडियावरून व्यक्त केली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांवर नियोजितपणे भाजपने हल्ला केला. भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. भ्याड हल्ला करण्यासाठी जे आले होते, त्यांचे बॉस दिल्लीत बसतात. काँग्रेसचे कार्यकर्ते घाबरत नाहीत हे त्यांनी लक्षात ठेवावे, असे गांधी यांनी म्हटले आहे. गोव्यातील महिला काँग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांच्या नेतृत्वाखाली महिला काँग्रेस कार्यकत्र्यानी जी गांधीगिरी केली, त्याविषयी अभिमान वाटतो. अशा प्रसंगातच खरे कोण ते कळून येत असते, असे राहुल गांधी यांनी नमूद केले आहे. 

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकरRahul Gandhiराहुल गांधी