शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

पर्रीकरांनी जनतेची सहानुभूती गमावली : कुतिन्हो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 20:18 IST

मोर्चामध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातीलही अधिकारी होते व सभापतींच्याही कार्यालयात काम करणारे अधिकारी होते, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.

पणजी : काँग्रेस कार्यकर्त्यांवर झालेला हल्ला हा राज्य सरकार पुरस्कृत आहे. कारण मोर्चामध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातीलही अधिकारी होते व सभापतींच्याही कार्यालयात काम करणारे अधिकारी होते, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. गृह खाते झोपलेले असून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी जनतेची सहानुभूती गमावली आहे, अशी टीका काँग्रेसच्या महिला शाखेच्या अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत केली.

पर्रीकर यांना पूर्वीही लोकांची सहानुभूती नव्हती व आता तरी मुळीच राहिलेली नाही, असे कुतिन्हो म्हणाल्या. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी महिलांवर हात टाकला. आमच्यावर हल्ला केला. अशा प्रकारच्या गुंडगिरीला प्रोत्साहन देण्यासाठी भाजपने सतिश धोंड यांना पुन्हा गोव्यात आणले आहे. आपण भाजपच्या कृतीचा निषेध करते, असे कुतिन्हो म्हणाल्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर हे अशिक्षित खासदार असून तेही काँग्रेस कार्यकर्त्यांवरील हल्ल्यावेळी पुढे होते, असे कुतिन्हो म्हणाल्या. 

लोकशाहीत गुद्दे चालत नाहीत, मुद्दे असावे लागतात. मुद्दे संपल्याने भाजप गुद्दय़ांवर आला. आम्ही देखील कमी नाही पण आम्ही असला हिंसक मार्ग स्वीकारणार नाही, आम्ही मुद्दे मांडू, असे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे म्हणाले. 

राहुल गांधींकडून कौतुक लोकशाही भाजपला निराश करत आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी गोव्यातील घटनेबाबत सोशल मिडियावरून व्यक्त केली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांवर नियोजितपणे भाजपने हल्ला केला. भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. भ्याड हल्ला करण्यासाठी जे आले होते, त्यांचे बॉस दिल्लीत बसतात. काँग्रेसचे कार्यकर्ते घाबरत नाहीत हे त्यांनी लक्षात ठेवावे, असे गांधी यांनी म्हटले आहे. गोव्यातील महिला काँग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांच्या नेतृत्वाखाली महिला काँग्रेस कार्यकत्र्यानी जी गांधीगिरी केली, त्याविषयी अभिमान वाटतो. अशा प्रसंगातच खरे कोण ते कळून येत असते, असे राहुल गांधी यांनी नमूद केले आहे. 

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकरRahul Gandhiराहुल गांधी