शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

परिमल राय गोव्याचे नवे मुख्य सचिव,धर्मेंद्र शर्मांची दिल्लीला बदली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 13:56 IST

गोव्याचे मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा यांची नवी दिल्लीला बदली झाली असून आयएएस अधिकारी परिमल राय यांना गोव्यात मुख्य सचिवपदी पाठवण्यात आले आहे.

पणजी : गोव्याचे मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा यांची नवी दिल्लीला बदली झाली असून आयएएस अधिकारी परिमल राय यांना गोव्यात मुख्य सचिवपदी पाठवण्यात आले आहे. राय यांनी यापूर्वी गोव्याच्या प्रशासनात प्रधान सचिव म्हणून काम केले आहे. परिमल राय हे १९८५ बॅचचे अ‍ॅग्मू केडरचे आयएएस अधिकारी आहेत. संघप्रदेश प्रशासकांचे सल्लागार म्हणून त्यांनी काम केले आहे. ३१ डिसेंबर २0१६ रोजी आर. के. श्रीवास्तव हे सेवानिवृत्त झाल्यानंतर धर्मेंद्र शर्मा यांच्याकडे मुख्य सचिवपदाचा ताबा देण्यात आला होता. त्याआधी शर्मा हे बांधकाम खात्याचे तसेच वाहतूक, दक्षता आणि माहिती तंत्रज्ञान खात्याचे प्रधान सचिव म्हणून काम पहात होते. परिमल राय यांना गोवा नवीन नाही. येथे बराच काळ काम करुन तीन वर्षांपूर्वी त्यांची दिल्लीला बदली झाली होती. 

राय यांनी संघप्रदेश प्रशासकांचे सल्लागार म्हणून चांगली कामगिरी बजावली आहे. ते अनुभवी व ज्येष्ठ अधिकारी आहेत. गोवाही आधी संघप्रदेश होता. राय यांच्या या अनुभवाचा फायदा गोव्याला मिळणार आहे. संघप्रदेश प्रशासकाला धोरणात्मक निर्णय तसेच दैनंदिन प्रशासनाबाबत महत्त्वाचे मार्गदर्शन करण्याचे काम केंद्रीय गृह मंत्रालयाने नेमलेला सल्लागार अधिकारी करीत असतो. प्रशासकाचे सर्व वित्तीय अधिकारही या पदावरील अधिका-याला असतात. दरम्यान, कार्मिक खात्याच्या अधिकाºयाशी संपर्क साधला असता शर्मा यांना गोव्याच्या सेवेतून मोकळीक देण्यासंबंधीची फाइल सरकारला पाठवली जाईल, असे सांगण्यात आले.  

टॅग्स :goaगोवा