शहरं
Join us  
Trending Stories
1
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
2
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
3
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
4
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
5
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
6
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
7
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
8
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
9
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
10
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
11
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
12
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
13
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
14
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
15
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
16
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
17
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
18
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
19
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
20
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!

गोव्यातही वाढत आहे स्वादुपिंडाचा कर्करोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2018 20:30 IST

पणजी: देशात स्वादुपिंडाचा कर्करोग वाढत असल्याचे आढळून आले आहे. हे केवळ देशातील चित्र नव्हे तर गोव्यातही अलिकडच्या काळात स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे रुग्ण अधिकाधिक आढळू लागल्याचे दिसून येत आहे. गोव्याच्या कॅन्सर रजिस्ट्रीत कर्करुग्णांची संख्या १२०० एवढी दाखविली आहे. परंतु गुपचूप उपचार घेणारे, गोव्याबाहेर जाऊन उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्येचा अंदाज घेतला तर ती दीड ...

पणजी: देशात स्वादुपिंडाचा कर्करोग वाढत असल्याचे आढळून आले आहे. हे केवळ देशातील चित्र नव्हे तर गोव्यातही अलिकडच्या काळात स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे रुग्ण अधिकाधिक आढळू लागल्याचे दिसून येत आहे. गोव्याच्या कॅन्सर रजिस्ट्रीत कर्करुग्णांची संख्या १२०० एवढी दाखविली आहे. परंतु गुपचूप उपचार घेणारे, गोव्याबाहेर जाऊन उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्येचा अंदाज घेतला तर ती दीड हजार होईल. त्यातील अध्यार्हून अधिक रुग्ण हे गोमेकॉत उपचार घेत आहेत. त्यात सर्वाधिक म्हणजे २०० हून अधिक रुग्ण हे स्तनाच्या कर्करोगाचे रुग्ण आहेतच,  परंतु आतड्याचा कर्करोग १०० हून अधिक जणांना झालेला आढळून आला आहे. तोंडाचे व गळ्याचे १५० ते २०० रुग्ण  आहेत तर बाकीचे इतर प्रकारचे रुग्ण आहेत. अर्थात ही रजिस्ट्री ५ वर्षांपूर्वीची आहे त्यामुळे नवीन आकडे काय आहेत याची अद्याप माहिती उपलब्ध झालेली नाही.गोव्यात विविध ठिकाणी काम करणाºया कर्करोगतज्ज्ञांच्या अंदाजाप्रमाणे अलिकडील काळात या संख्येत फार फरक पडला आहे. कारण स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे रुग्णही मोठ्या प्रमाणावर अढळू लागले असल्याची माहिती कर्करोग तज्ज्ञ डॉ शेखर साळकर यांनी दिली. या रोगाची लक्षणे लवकर कळत नाहीत हीच मोठी समस्या आहे. स्वादुपिंडाचा कर्करोगाची ह्यहेड, बॉडी, टेल अशा तीन प्रकारात वर्गवारी केली जाते. हेड, बॉडी, टेल. या पैकी पहिला हेड ह्या प्रकाराची लक्षणे लवकर दिसतात. अशा प्रकारात रुग्णाला सुरूवातीला कावीळ होते. बाकी दोन प्रकारात मात्र लक्षणे लवकर दिसत नाहीत. त्यामुळे नियमीत चाचण्या हीच त्यावर खबरदारी आहे असे डॉ साळकर यांनी सांगितले. मधुमेह हा इतर अनेक रोगांना आमंत्रण देण्यास कारणीभूत जसा ठरतो तसा कर्करोगाच्या बाबतीतही तो घातकच ठरतो. परंतु अचानक वजन वाढणे तेवढेच धोकादायक मानले जाते.गोमेकॉत कर्करोग तज्ज्ञ नसल्यामुळे प्रत्येक विभागाचे तज्ज्ञ डॉक्टरच कर्क रोगाची प्रकरणे हाताळतात. एका विभागाच्या तज्ज्ञाकडून मिळालेल्या माहितीनुसार अलिकडे स्वादुपिंडाचे कर्करोगी अधिक आढळून आल्याचे त्यांनी सांगितले. धूम्रपान, गुटखा चघळणे आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन ही या रोगाची मुख्य कारणे आहेत. तसेच दुषित पाणी पिल्यामुळेही हा रोग होण्याची शक्यता असल्याचेही पाहाणीतून आढळून आले आहे.

टॅग्स :cancerकर्करोग