शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
९ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची बातमी अन्... विजयच्या रॅलीत ३६ जणांचा मृत्यू, पाण्याच्या बाटल्या फेकत होता अभिनेता
3
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
4
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
5
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
6
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
7
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
8
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
9
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
10
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
11
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
12
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
13
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
14
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
15
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
16
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
17
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
18
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
19
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
20
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद

गोव्यातही वाढत आहे स्वादुपिंडाचा कर्करोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2018 20:30 IST

पणजी: देशात स्वादुपिंडाचा कर्करोग वाढत असल्याचे आढळून आले आहे. हे केवळ देशातील चित्र नव्हे तर गोव्यातही अलिकडच्या काळात स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे रुग्ण अधिकाधिक आढळू लागल्याचे दिसून येत आहे. गोव्याच्या कॅन्सर रजिस्ट्रीत कर्करुग्णांची संख्या १२०० एवढी दाखविली आहे. परंतु गुपचूप उपचार घेणारे, गोव्याबाहेर जाऊन उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्येचा अंदाज घेतला तर ती दीड ...

पणजी: देशात स्वादुपिंडाचा कर्करोग वाढत असल्याचे आढळून आले आहे. हे केवळ देशातील चित्र नव्हे तर गोव्यातही अलिकडच्या काळात स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे रुग्ण अधिकाधिक आढळू लागल्याचे दिसून येत आहे. गोव्याच्या कॅन्सर रजिस्ट्रीत कर्करुग्णांची संख्या १२०० एवढी दाखविली आहे. परंतु गुपचूप उपचार घेणारे, गोव्याबाहेर जाऊन उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्येचा अंदाज घेतला तर ती दीड हजार होईल. त्यातील अध्यार्हून अधिक रुग्ण हे गोमेकॉत उपचार घेत आहेत. त्यात सर्वाधिक म्हणजे २०० हून अधिक रुग्ण हे स्तनाच्या कर्करोगाचे रुग्ण आहेतच,  परंतु आतड्याचा कर्करोग १०० हून अधिक जणांना झालेला आढळून आला आहे. तोंडाचे व गळ्याचे १५० ते २०० रुग्ण  आहेत तर बाकीचे इतर प्रकारचे रुग्ण आहेत. अर्थात ही रजिस्ट्री ५ वर्षांपूर्वीची आहे त्यामुळे नवीन आकडे काय आहेत याची अद्याप माहिती उपलब्ध झालेली नाही.गोव्यात विविध ठिकाणी काम करणाºया कर्करोगतज्ज्ञांच्या अंदाजाप्रमाणे अलिकडील काळात या संख्येत फार फरक पडला आहे. कारण स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे रुग्णही मोठ्या प्रमाणावर अढळू लागले असल्याची माहिती कर्करोग तज्ज्ञ डॉ शेखर साळकर यांनी दिली. या रोगाची लक्षणे लवकर कळत नाहीत हीच मोठी समस्या आहे. स्वादुपिंडाचा कर्करोगाची ह्यहेड, बॉडी, टेल अशा तीन प्रकारात वर्गवारी केली जाते. हेड, बॉडी, टेल. या पैकी पहिला हेड ह्या प्रकाराची लक्षणे लवकर दिसतात. अशा प्रकारात रुग्णाला सुरूवातीला कावीळ होते. बाकी दोन प्रकारात मात्र लक्षणे लवकर दिसत नाहीत. त्यामुळे नियमीत चाचण्या हीच त्यावर खबरदारी आहे असे डॉ साळकर यांनी सांगितले. मधुमेह हा इतर अनेक रोगांना आमंत्रण देण्यास कारणीभूत जसा ठरतो तसा कर्करोगाच्या बाबतीतही तो घातकच ठरतो. परंतु अचानक वजन वाढणे तेवढेच धोकादायक मानले जाते.गोमेकॉत कर्करोग तज्ज्ञ नसल्यामुळे प्रत्येक विभागाचे तज्ज्ञ डॉक्टरच कर्क रोगाची प्रकरणे हाताळतात. एका विभागाच्या तज्ज्ञाकडून मिळालेल्या माहितीनुसार अलिकडे स्वादुपिंडाचे कर्करोगी अधिक आढळून आल्याचे त्यांनी सांगितले. धूम्रपान, गुटखा चघळणे आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन ही या रोगाची मुख्य कारणे आहेत. तसेच दुषित पाणी पिल्यामुळेही हा रोग होण्याची शक्यता असल्याचेही पाहाणीतून आढळून आले आहे.

टॅग्स :cancerकर्करोग