शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पॅनकार्ड क्लबचे गोव्यातील कार्यालय गायब, कार्यालय स्थलांतर झाल्याचा कांगावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2017 21:07 IST

पणजी : आलिशान हॉटेल, रिसॉर्टचे प्रलोभन दाखवून सामान्यांच्या पैसे लुटणा-या पॅनकार्ड क्लबचे गौडबंगाल पुढे आले आहे.

- विलास ओहाळपणजी : आलिशान हॉटेल, रिसॉर्टचे प्रलोभन दाखवून सामान्यांच्या पैसे लुटणा-या पॅनकार्ड क्लबचे गौडबंगाल पुढे आले आहे. सात हजार 35 कोटी रुपयांचा घोटाळा असलेल्या या पॅनकार्ड क्लबचे गोव्यातील राजधानीतील कार्यालय चार-पाच महिन्यांपूर्वीच बंद झालेल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, या कार्यालयाला कारवाईची कुणकुण लागल्यानेच येथून पलायन केले असावे, असा अंदाज आहे.मुंबई शेअर बाजारात प्रविष्ट असलेल्या पॅनारॉमिक समूहाची उपकंपनी असलेल्या पॅनकार्ड क्लबमध्ये देशभरातील 50 लाख गुंतवणूकदारांचा पैसा त्यात गुंतलेला आहे. या कंपनीच्या मुसक्या मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) आवळत सहा संचालकांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे सात हजार 35 कोटी रुपयांचा घोटाळा पुढे आला आहे. देशभरातील प्रमुख शहरांतून मोठ-मोठय़ा उद्योजक, अधिकारी वर्गाला या क्लबने आपले सावज बनविले आहे. गोव्यातही अनेक मासे या क्लबच्या गळाला लागले असणार आहेत.गोव्यातील किती गुंतवणूकदारांनी आपला पैसा या क्लबमध्ये गुंतविलेला आहे, हे अद्याप कळाले नाही. संकेतस्थळावर गोव्यातील पणजीमध्ये पॅनकार्ड क्लबचे 18 जून रस्त्यावरील सपना रेजन्सीमध्ये बॅरोन शोरूमच्या वर, बी-4, दुसरा मजल्यावर हे कार्यालय असल्याचा पत्ता आहे. या कार्यालयाचा लोकमतने शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण ते कार्यालय काही मिळाले नाही. आजूबाजूच्या कार्यालयातून माहिती घेतल्यानंतर क्लबचे कार्यालय पाच-सहा महिन्यांपूर्वी येथून दुसरीकडे स्थलांतर झाल्याचे सांगण्यात आले.सपना रेजन्सीमधील खासगी कार्यालयातील एका महिला कर्मचा-याने ते कार्यालय धेंपा हाऊसमध्ये स्थलांतर झाल्याचे सांगितले. बांदोडकर मार्गाशेजारील मार्केट परिसरातील धेंपो हाऊसमध्ये हे कार्यालय स्थलांतरित झाले आहे का? हे पाहण्यात आले. तेथेही असे काही कार्यालय आले नसल्याची खात्री झाल्यानंतर पाटो येथील धेंपो टॉवर्समध्ये हे कार्यालय स्थलांतर झाले असावे का, याचीही खात्री करण्यात आली. मात्र, तेथेसुद्धा हे कार्यालय स्थलांतरित झाले नसल्याचे समोर आले.संकेतस्थळावर पॅनकार्ड क्लबचे कार्यालय सुरू होण्याची वेळ 9.30 ते सायंकाळी 6 अशी वेळ अशी देण्यात आली आहे. त्याचबरोबर याशिवाय 0832-2231173 किंवा 2231174 असा दूरध्वनी क्रमांक दिला आहे, त्यावर संपर्क साधल्यानंतर कृपया आपला नंबर तपासून पहा असे दूरध्वनीवर किंवा मोबाईलवर सांगण्यात येते. गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याने मुंबईत लवकरच ईओडब्ल्यू कारवाई करणार याची कल्पना आल्याने येथील कार्यालयानेही राजधानीतून पळ काढला असावा, असा अंदाज आहे.