शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
3
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
4
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
5
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
6
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
7
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
8
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
9
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
10
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
11
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
12
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
13
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
14
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
15
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
16
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
17
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
18
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
19
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
20
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत सचिवांनी काढला ग्रामसभेतून पळ; सरपंचांचा आरोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2023 16:49 IST

विद्यमान सचिव शनिवारी कामावर आल्या. शनिवारी पंचायत मंडळाची बैठक होती

म्हापसा : ग्राम पंचायतीच्या सचिवांनी पंचायत मंडळाला विश्वासात न घेता आणि ठराव मंजूर न करता एका व्यक्तीला परवाना दिला. आपले बिंग ग्रामसभेत उघड होईल म्हणून सचिवांनी ग्रासभेतून काढता पाय घेतला, असा ाआरोप वेर्ला-काणका पंचायतीच्या सरपंच आरती च्यारी यांनी पत्रकारांशी बोलताना केला. याप्रश्नी पंचायतीची ग्रामसभा स्थगित ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित व्यक्तीच्या बांधकामाची पाहणी करुन नंतर त्यावर योग्य तो निर्णय घेण्याचे पंचायत मंडळाने ठरवले होते. पण सतत रजेवर जाणारे सचिव एका दिवसासाठी कामावर हजर झाल्या. दुसऱ्या दिवशी सचिव पुन्हा रजेवर गेल्या. याच काळात तो परवाना देण्यात आला असावा, असा आरोप सरपंचांनी व्यक्त केला. सचिव सभा अर्धवट सोडून गेल्याने आणि निरीक्षक नसल्याने वेर्ला-काणका पंचायतीची रविवारी बोलावलेली ग्रामसभा स्थगित करणे नागरिकांचा दबाव वाढल्यानंतर सरपंचांना भाग पडले. 

सरपंच आरती च्यारी यांच्या अध्यक्षतेखाली पंचायतीच्या कार्यालयात पंचायतीची ग्रामसभा बोलावण्यात आली होती. यावेळी नागरिकांनी निरीक्षक नसल्याने तसेच पूर्णवेळ सचिव उपलब्ध नसल्याने नाराजी व्यक्त केली. पोलिस बंदोबस्तात ग्रामसभा सुरू होती. यावे‌ळी कार्यालयात काही वेळ तणावाचे वातावरण तयार झाले. पोलिसांच्या उपस्थितीबाबत काहींनी नाराजी व्यक्त केली. सचिवांच्या पंचायत सदस्यांना विश्वासान न घेता काम करण्याच्या कार्यपद्धतीचे, मनमानी कारभाराचा परिणाम पंचायतीवर होत आहेत. त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेऊन नव्या पूर्णवेळ सचिवांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी केली जाईल. ग्रामसभेला निरीक्षक उपस्थित होणार नाहीत, याची माहिती अखेरच्या क्षणी पंचायतीला देण्यात आली होती, असे काही पंच सदस्यांनी सांगितले.

सरपंच आरती च्यारी यांनी सांगितले की, पंचायतीला पूर्ण वेळ सचिव नसल्याने अडचणींचा सामना करावा लागतो. विद्यमान सचिवांची नेमणूक २५ सप्टेंबर रोजी करण्यात आली आहे. पण त्या सेवेत नियमीत हजर राहात नाहीत. महिनाभरातील बरेच दिवस त्या रजेवर असतात. रजेवरून पुन्हा सेवेत आल्यावर आपली कामे पूर्ण करुन पुन्हा रजेवर जातात. त्याचा परिणाम लोकांच्या कामावर परिणाम होतो. 

विद्यमान सचिव शनिवारी कामावर आल्या. शनिवारी पंचायत मंडळाची बैठक होती. पण सभेत चर्चा करण्यास त्यांच्याजवळ वेळ नव्हता. त्यामुळे मंडळाची बैठक होऊ शकली नाही. त्याचदरम्यान सचिवांनी मंडळाला विश्वासात न घेता पोलिस स्थानकात पत्र पाठवून ग्रामसभेसाठी पोलिस संरक्षणाची मागणी केली. सचिवांमुळे ग्रामसभेला पोलिस मागविण्याचा हा पहिलाच प्रसंग होता, असेही च्यारी म्हणाल्या. सभेला निरीक्षकही नसल्याने सभा रद्द करणे भाग पडले असं सरपंच च्यारी म्हणाल्या. 

माझी मानसिक छळवणूक : सचिवांचा आरोप 

दरम्यान, ग्रामसभेत बांधकाम प्रकरणाच्या मुद्यावरून लोक नाहक आमच्यावर आरोप करीत असल्याने, माझी मानसिक छळवणूक करीत असल्याने ग्रामसभा चालविण्यात होण्यास अडथळा निर्माण झाला. त्यामुळे आणि निरीक्षकांअभावी बैठक स्थगित करीत आहे असे सांगून सचिव निकीता परब या सभेतून उठून गेल्या.