शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
5
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
6
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
7
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
8
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
9
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
10
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
11
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
12
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
13
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
14
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
15
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
16
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
17
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
18
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
19
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
20
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा

पणजी : पत्रादेवी-बांबोळी महामार्ग चौपदरीकरण, कामाचा येत्या तीन महिन्यात होणार प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2017 12:53 IST

पत्रादेवी ते बांबोळी या ४२.९ कि.मी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे सुमारे २,२३७ कोटी रुपये खर्चाचे काम येत्या तीन महिन्यात सुरु होणार आहे.

पणजी : पत्रादेवी ते बांबोळी या ४२.९ कि.मी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे सुमारे २,२३७ कोटी रुपये खर्चाचे काम येत्या तीन महिन्यात सुरु होणार आहे. एम्. व्यंकट राव इन्फ्रा प्रा. लि, आणि नवयुग इंजिनीयरिंग कंपनीला त्यासाठीचे कंत्राट बहाल करण्यात येणार आहे. बांबोळी ते पोळे या दक्षिण गोव्यातील उर्वरित चौपदरीकरणाचे पॅकेज अद्याप निश्चित व्हायचे आहे.पत्रादेवी ते बांबोळी चौपदरीकरणाचे काम पत्रादेवी ते करासवाडा आणि करासवाडा ते बांबोळी असे दोन टप्प्यात होणार आहे. पत्रादेवी ते करासवाडा महामार्गाचे काम कमी बोली लावल्याने एमव्हीआर कंपनीला तर करासवाडा ते बांबोळी महामार्गाचे काम नवयुग कंपनीकडे सोपविण्यात येणार आहे. दोन्ही कंपन्यांना लवकरच वर्क आॅर्डर दिली जाईल, असे बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर यांनी सांगितले. वर्क आॅर्डर बहाल केल्यानंतर प्रत्यक्ष काम तीन महिन्यात सुरु होईल आणि तीन वर्षात ते पूर्ण होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. बांबोळी ते पोळे महामार्गाचे पॅकेज अजून निश्चित झालेले नाही.केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाची पनवेल ते कन्याकुमारी राष्ट्रीय महामार्ग १७ च्या चौपदरकरणाची ही योजना आहे. गोव्यात पत्रादेवी ते पोळे राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणात जास्त घरे जाणार नाहीत याची दक्षता घेण्यात आलेली आहे. पर्वरी येथे महामार्गाच्या दुतर्फा मोठी वस्ती असल्याने या भागात दोन ते तीन किलोमिटर लांबीचे इलेव्हेटेड स्ट्रक्चर येईल, असे पार्सेकर यांनी स्पष्ट केले.या चौपदरीकरणानंतर गोव्यातील एका टोकापासून दुसºया टोकापर्यंतचा प्रवास अल्प वेळेत होणार आहे.

 

टॅग्स :goaगोवा