शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

पाण्याची पळवा-पळवी महाराष्ट्र-कर्नाटकाची

By admin | Updated: June 2, 2014 00:55 IST

कुरघोडी : गोवा सरकारकडून गंभीर दखल

डिचोली : महाराष्ट्राने विर्डी धरणातून वाळवंटीचा-मणेरी सासोली येथे नव्याने योजना आखून कोलवाळ नदीचा तर कर्नाटकाने म्हादईचा गळा घोटण्यासाठी कळसा कालव्याची योजना आखली़ त्यामुळे गोव्याच्या सौंदर्याचा मुकूटमणी असलेल्या दूधसागराला मिळणार्‍या नद्यांवर धरण प्रकल्प उभारण्याचा डाव आखल्याने शेजारधर्माशी प्रतारणा करत महाराष्ट्र व कर्नाटकाने गोव्याला पाण्याच्या बाबतीत वेठीस धरलेले आहे. पाण्याच्या अस्तित्वाची ही लढाई समर्थपणे लढण्याची गोवा सरकारने तयारी दर्शविलेली आहे. मात्र, गोवा सरकारने गाफील न राहता केंद्र सरकारशी चर्चा करून आंतरराज्य नदीच्या पाणी वाटपाबाबतचे हे तंटे सोडविण्यासाठी प्रयत्न करून गोव्याचे हित जपण्यास प्राधान्य द्यावे, अशी मागणी आहे. पाण्यासाठी भविष्यात अनेक लढाया अपेक्षित असल्या तरी मागील सरकारच्या बेजबाबदारपणामुळे गोव्याला म्हादईसाठी संघर्ष करावा लागतो आहे. भाजपा सत्तेवर आल्यानंतर पर्रीकर सरकारने लक्ष घालताना गोव्याला दिलासा देणारी कामगिरी केली आहे. गोव्याचे हित जपण्यासाठी केंद्रात सर्व ते प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली. अनेक बेकायदा गोष्टींवरून गोव्यावर पाणी संकट आणण्याचा प्रयत्न झालेला असताना काँग्रेस राजवटीत कर्नाटकाला पाणी वळवण्यास परवानगी देण्याची कृती अयोग्य होती, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी पाण्याच्या प्रश्नाबाबत निश्चितपणे सकारात्मक दृष्टिकोन ठेवतील. नदी जोडण्याचे अभियान वाजपयींच्या कारकिर्दीत सुरू झाले़ आता त्याला नव्याने सुरुवात होणार आहे. त्यामुळे पाण्यासाठीचे राज्या-राज्यातील तंटे सोडवण्यासाठी निश्चितपणे ठोस कृती योजना आखली जाईल, असा विश्वास मंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केला. पर्यावरणवादी कार्यकर्ते राजेंद्र केरकर यांनी गोव्याला पाण्याच्या प्रश्नी दोन्ही शेजारी राज्यांकडून मन:स्ताप सहन करावा लागत असून याबाबत गोव्याचे हित जपण्यासाठी सर्वप्रकारे राज्य व केंद्र सरकारने प्रयत्न करणे हितावह ठरणार असल्याचे सांगितले. कोलवाळ नदीचे पाणी वळवण्यासाठी महाराष्ट्राने २१८ कोटींची योजना आखलेली असताना गोवा सरकराने याची गंभीर दखल घेतली असून सोमवारी जलसंसाधन खात्यातर्फे अहवाल तयार करून तो राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर गोवा सरकारतर्फे महाराष्ट्राला पत्र लिहून महाराष्ट्राची मणेरी येथील नेमकी योजना काय आहे याबाबत सविस्तर तपशील मागविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी याप्रश्नी गंभीरपणे लक्ष घालणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. डिसेंबर २०१३ मध्ये म्हादाई पाणी वाटप लवादाचे त्रिसदस्यीय मंडळ विर्डी येथे आले असताना गोवा सरकारतर्फे जलसंसाधन खात्याचे मुख्य अभियंता संदीप नाडकर्णी यांनी निवृत्त न्यायाधीश पांचाळ व इतरांसमोर गोव्याची बाजू भक्कमपणे मांडली होती व महाराष्ट्र सरकार कोणताही परवाना न घेता धरणाचे काम चालवत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. दरम्यान, गोवा सरकारच्या भूमिकेकडे सर्वांच्या नजरा आहेत़ (प्रतिनिधी)