शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

मोदी सरकारला दरवर्षी आमचे रिपोर्ट कार्ड सादर, मुख्यमंत्र्यांकडून माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 21:36 IST

वृत्त वाहिनीला मुलाखत देताना मुख्यमंत्र्यांनी हे भाष्य केले. प्रत्येक मंत्र्याचे रिपोर्ट कार्ड तयार होत असते. दर वर्षी केंद्र सरकार प्रत्येक भाजप सरकारकडून रिपोर्ट कार्ड घेत असते असे मुख्यमंत्री म्हणाले.

ठळक मुद्देदहा हजार नोकऱ्या देणे गरजेचे आहे कारण प्रशासनाची ती गरज आहे. अनेक पदे रिकामी आहेत. येत्या डिसेंबर व जानेवारीपर्यंत आणखी अनेकजण सेवेतून निवृत्त होतील, तोपर्यंत दहा हजार व्यक्तींना नोकऱ्या मिळालेल्या असतील असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

पणजी : केंद्रातील मोदी सरकार दरवर्षी आमचे रिपोर्ट कार्ड घेत असते. यापुढे माझ्या सरकारचा तीन वर्षांचा कालावधी पूर्ण होईल तेव्हा देखील रिपोर्ट कार्ड सादर होणार आहे. प्रत्येक राज्यातील भाजप सरकारकडून केंद्र सरकार रिपोर्ट कार्ड घेतेच, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी येथे सांगितले. 

वृत्त वाहिनीला मुलाखत देताना मुख्यमंत्र्यांनी हे भाष्य केले. प्रत्येक मंत्र्याचे रिपोर्ट कार्ड तयार होत असते. दर वर्षी केंद्र सरकार प्रत्येक भाजप सरकारकडून रिपोर्ट कार्ड घेत असते असे मुख्यमंत्री म्हणाले. पुढील विधानसभा निवडणुकीसाठी मला भाजपने आपला चेहरा म्हणून जाहीर केले याविषयी मला आनंद वाटतो. भाजपची मते वाढण्यास ते मदतरुप ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

दहा हजार नोकऱ्या शक्य दहा हजार नोकऱ्या देणे गरजेचे आहे कारण प्रशासनाची ती गरज आहे. अनेक पदे रिकामी आहेत. येत्या डिसेंबर व जानेवारीपर्यंत आणखी अनेकजण सेवेतून निवृत्त होतील, तोपर्यंत दहा हजार व्यक्तींना नोकऱ्या मिळालेल्या असतील असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. नोकर भरतीमुळे सरकारी तिजोरीवर थोडा भार पडेल पण यापुढे स्थिती सुधारणार आहे असे ते म्हणाले. स्वयंपूर्ण गोवा निश्चितच शक्य आहे. राज्यात भाज्यांचे, फुलांचे व दुधाचे उत्पादन वाढत आहे. मी आमदार झालो तेव्हापासून गोवा राज्य स्वयंपूर्ण व्हावे असा विचार करतोय. सरकारच्या सर्व योजना सामान्य लोकांपर्यंत पोहचायला हव्या. राज्यात १९ हजार विशेष व्यक्ती आहेत. अडिच हजार व्यक्तींपर्यंत आम्ही मोफत उपकरणे पोहचवली. पुढील वर्षभरात सर्व १९ हजार विशेष व्यक्तींपर्यंत साहित्य पोहचेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

केंद्र सरकारने जे तीनशे कोटी रुपये दिले, त्यापैकी प्रत्येकी एक कोटी रुपये पालिकांनाही दिले जातील. पंचायतींना एकूण १०० कोटी दिले जातील. गोव्यातील सामान्य माणसालाही मदत करण्याचा विचार आहे. गोवा मुक्तीची साठ वर्षे साजरी करताना स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान केला जाईल. स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकांचे नूतनीकरण करण्यासाठी खर्चाचे आराखडे तयार होऊ लागले आहेत. गोवा मुक्तीच्या इतिहासाबाबत वस्तूसंग्रहालय देखील साकारणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतNarendra Modiनरेंद्र मोदी