शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

...अन्यथा परप्रांतीय नोकऱ्या बळकावतील!; मुख्यमंत्र्यांचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 11:13 IST

पीईएस महाविद्यालयात टाटा कौशल्य केंद्र

लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा: राज्यात जगभरातील पर्यटकांनी मोठ्या संख्येने यावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवरच मोठमोठे प्रकल्प, पंचतारांकित हॉटेल्स व इतर पूरक व्यवसाय गोव्यात येत आहेत. त्यामुळे आगामी काळात राज्यात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार असून, त्यासाठी मनुष्यबळाची गरज पडणार आहे. त्यामुळे गोमंतकीय तरुणांनी कौशल्यपूर्ण शिक्षण घ्यावे, अन्यथा या होणाऱ्या नोकऱ्या परप्रांतीय बळकावतील, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला.

फर्मागुडी येथील पीईएस महाविद्यालयात गुरुवारी टाटा कौशल्य केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर कृषिमंत्री रवी नाईक, नगराध्यक्ष रितेश नाईक, वेलिंग सरपंच हर्षा गावडे उपस्थित होत्या.

मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आत्मनिर्भर'च्या माध्यमातून नवभारताचे जे स्वप्न पाहिले आहे, ते साध्य करण्यासाठी कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम गरजेचे आहेत. त्यासाठीच आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करीत असताना कौशल्यपूर्ण संसाधनांना प्राधान्य देत आहोत. 

गोवा देशाची पर्यटन राजधानी बनेल

पर्यटन व आतिथ्य उद्योगक्षेत्रात जेवढ्या संधी गोव्यात आहेत, तेवढ्या संपूर्ण भारतात कुठेच नाहीत. आज ज्या पद्धतीने गोव्यात पर्यटन उद्योगात साधनसुविधांची निर्मिती होत आहे, ते पाहता आगामी काळात गोवा देशाची पर्यटन राजधानी बनेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

१५ जुलैपर्यंत १० जणांना प्रशिक्षणार्थी उपक्रमाचा लाभ

१ केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रशिक्षणार्थी कार्यक्रम पुन्हा एकदा राबवण्याचे ठरविले आहे. त्यासाठी कौशल्य विकास अॅपची निर्मिती झाली आहे. युवकांनी त्याचा लाभ घ्यायला हवा. सदर कार्यक्रमांतर्गत १५ जुलैपर्यंत २ किमान १० हजार युवकांना द सुविधांचा लाभ आम्ही देणार असून, यासाठी खासगी कंपन्यांशी करार करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या योजनांचा अंमल करणारे गोवा हे पहिले राज्य आहे. 

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत