शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

...तर 'कामधेनू' योजना बंद करणार; मुख्यमंत्र्यांचा पशूपालकांना इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2024 08:41 IST

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नाणूस-वाळपई येथील जय श्री राम गोसंवर्धन केंद्राच्या गोशाळेला भेट दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क, वाळपई: भटक्या गुरांमुळे होणाऱ्या अपघातांची गंभीर दखल आता सरकारने घेतली आहे. या गुरांच्या त्रासामुळे सरकार आता गुरे ताब्यात घेणार नाही तर कामधेनू योजनेचा लाभच बंद करणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल नाणूस-वाळपई येथील जय श्री राम गोसंवर्धन केंद्राच्या गोशाळेला भेट दिली. यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत माजी उपसभापती नरहरी हळदणकरही उपस्थित होते. कामधेनू योजनेत गेल्या वर्षी बदल करण्यात आले आहेत. मात्र या योजनेअंतर्गत घेतलेली गुरे रस्त्यावर फिरताना आढळतात. त्यामुळे लाभार्थ्यांना होणारा फायदा बंद करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. तसेच रस्त्यावर फिरणारे गुरे पशुसंवर्ध खात्यातर्फे जप्त केली जातील, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

गोशाळेतील ४६० गुरांपैकी बहुतांशी भटकी गुरे असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना मिळाली. तसेच अपघातात जखमी झालेली गुरे व कत्तलखान्यातून सुटका केलेली गुरेही गोशाळेत असल्याचे निदर्शनास आले. सर्व यावेळी मुख्यमंत्र्यांनी पशूपालन करणाऱ्यांना गुरे रस्त्यावर सोडू नका, असे आवाहन केले आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गोपूजाही करण्यात आली.

दूध न देणारी जनावरे रस्त्यावर

गोसंवर्धन केंद्राचे अध्यक्ष हनुमंत परब म्हणाले की, भटकी जनावरे व्यवस्थापन योजनेनुसार सरकार दररोज १५० रुपये प्रति जनावराचा आहार खर्च देत आहे. ही योजना २०१३ मध्ये अधिसूचित करण्यात आली असली तरी ही ती २०१८ पासून लागू करण्यात आली आहे. अनेक वेळा मालक जनावराने दूध देणे बंद केल्यानंतर त्यांना सोडून देते. मात्र या प्राण्यांमुळे वाहनचालकांना धोका निर्माण होतो आणि अपघातही होत असतात. 

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत