शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
3
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
4
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
5
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
6
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
7
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
8
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
9
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
10
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
11
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
12
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
13
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
14
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
15
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
16
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
17
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
18
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
19
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
20
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक

...तर 'कामधेनू' योजना बंद करणार; मुख्यमंत्र्यांचा पशूपालकांना इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2024 08:41 IST

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नाणूस-वाळपई येथील जय श्री राम गोसंवर्धन केंद्राच्या गोशाळेला भेट दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क, वाळपई: भटक्या गुरांमुळे होणाऱ्या अपघातांची गंभीर दखल आता सरकारने घेतली आहे. या गुरांच्या त्रासामुळे सरकार आता गुरे ताब्यात घेणार नाही तर कामधेनू योजनेचा लाभच बंद करणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल नाणूस-वाळपई येथील जय श्री राम गोसंवर्धन केंद्राच्या गोशाळेला भेट दिली. यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत माजी उपसभापती नरहरी हळदणकरही उपस्थित होते. कामधेनू योजनेत गेल्या वर्षी बदल करण्यात आले आहेत. मात्र या योजनेअंतर्गत घेतलेली गुरे रस्त्यावर फिरताना आढळतात. त्यामुळे लाभार्थ्यांना होणारा फायदा बंद करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. तसेच रस्त्यावर फिरणारे गुरे पशुसंवर्ध खात्यातर्फे जप्त केली जातील, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

गोशाळेतील ४६० गुरांपैकी बहुतांशी भटकी गुरे असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना मिळाली. तसेच अपघातात जखमी झालेली गुरे व कत्तलखान्यातून सुटका केलेली गुरेही गोशाळेत असल्याचे निदर्शनास आले. सर्व यावेळी मुख्यमंत्र्यांनी पशूपालन करणाऱ्यांना गुरे रस्त्यावर सोडू नका, असे आवाहन केले आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गोपूजाही करण्यात आली.

दूध न देणारी जनावरे रस्त्यावर

गोसंवर्धन केंद्राचे अध्यक्ष हनुमंत परब म्हणाले की, भटकी जनावरे व्यवस्थापन योजनेनुसार सरकार दररोज १५० रुपये प्रति जनावराचा आहार खर्च देत आहे. ही योजना २०१३ मध्ये अधिसूचित करण्यात आली असली तरी ही ती २०१८ पासून लागू करण्यात आली आहे. अनेक वेळा मालक जनावराने दूध देणे बंद केल्यानंतर त्यांना सोडून देते. मात्र या प्राण्यांमुळे वाहनचालकांना धोका निर्माण होतो आणि अपघातही होत असतात. 

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत