शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

...तर 'कामधेनू' योजना बंद करणार; मुख्यमंत्र्यांचा पशूपालकांना इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2024 08:41 IST

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नाणूस-वाळपई येथील जय श्री राम गोसंवर्धन केंद्राच्या गोशाळेला भेट दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क, वाळपई: भटक्या गुरांमुळे होणाऱ्या अपघातांची गंभीर दखल आता सरकारने घेतली आहे. या गुरांच्या त्रासामुळे सरकार आता गुरे ताब्यात घेणार नाही तर कामधेनू योजनेचा लाभच बंद करणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल नाणूस-वाळपई येथील जय श्री राम गोसंवर्धन केंद्राच्या गोशाळेला भेट दिली. यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत माजी उपसभापती नरहरी हळदणकरही उपस्थित होते. कामधेनू योजनेत गेल्या वर्षी बदल करण्यात आले आहेत. मात्र या योजनेअंतर्गत घेतलेली गुरे रस्त्यावर फिरताना आढळतात. त्यामुळे लाभार्थ्यांना होणारा फायदा बंद करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. तसेच रस्त्यावर फिरणारे गुरे पशुसंवर्ध खात्यातर्फे जप्त केली जातील, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

गोशाळेतील ४६० गुरांपैकी बहुतांशी भटकी गुरे असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना मिळाली. तसेच अपघातात जखमी झालेली गुरे व कत्तलखान्यातून सुटका केलेली गुरेही गोशाळेत असल्याचे निदर्शनास आले. सर्व यावेळी मुख्यमंत्र्यांनी पशूपालन करणाऱ्यांना गुरे रस्त्यावर सोडू नका, असे आवाहन केले आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गोपूजाही करण्यात आली.

दूध न देणारी जनावरे रस्त्यावर

गोसंवर्धन केंद्राचे अध्यक्ष हनुमंत परब म्हणाले की, भटकी जनावरे व्यवस्थापन योजनेनुसार सरकार दररोज १५० रुपये प्रति जनावराचा आहार खर्च देत आहे. ही योजना २०१३ मध्ये अधिसूचित करण्यात आली असली तरी ही ती २०१८ पासून लागू करण्यात आली आहे. अनेक वेळा मालक जनावराने दूध देणे बंद केल्यानंतर त्यांना सोडून देते. मात्र या प्राण्यांमुळे वाहनचालकांना धोका निर्माण होतो आणि अपघातही होत असतात. 

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत