शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

...तर 'कामधेनू' योजना बंद करणार; मुख्यमंत्र्यांचा पशूपालकांना इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2024 08:41 IST

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नाणूस-वाळपई येथील जय श्री राम गोसंवर्धन केंद्राच्या गोशाळेला भेट दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क, वाळपई: भटक्या गुरांमुळे होणाऱ्या अपघातांची गंभीर दखल आता सरकारने घेतली आहे. या गुरांच्या त्रासामुळे सरकार आता गुरे ताब्यात घेणार नाही तर कामधेनू योजनेचा लाभच बंद करणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल नाणूस-वाळपई येथील जय श्री राम गोसंवर्धन केंद्राच्या गोशाळेला भेट दिली. यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत माजी उपसभापती नरहरी हळदणकरही उपस्थित होते. कामधेनू योजनेत गेल्या वर्षी बदल करण्यात आले आहेत. मात्र या योजनेअंतर्गत घेतलेली गुरे रस्त्यावर फिरताना आढळतात. त्यामुळे लाभार्थ्यांना होणारा फायदा बंद करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. तसेच रस्त्यावर फिरणारे गुरे पशुसंवर्ध खात्यातर्फे जप्त केली जातील, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

गोशाळेतील ४६० गुरांपैकी बहुतांशी भटकी गुरे असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना मिळाली. तसेच अपघातात जखमी झालेली गुरे व कत्तलखान्यातून सुटका केलेली गुरेही गोशाळेत असल्याचे निदर्शनास आले. सर्व यावेळी मुख्यमंत्र्यांनी पशूपालन करणाऱ्यांना गुरे रस्त्यावर सोडू नका, असे आवाहन केले आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गोपूजाही करण्यात आली.

दूध न देणारी जनावरे रस्त्यावर

गोसंवर्धन केंद्राचे अध्यक्ष हनुमंत परब म्हणाले की, भटकी जनावरे व्यवस्थापन योजनेनुसार सरकार दररोज १५० रुपये प्रति जनावराचा आहार खर्च देत आहे. ही योजना २०१३ मध्ये अधिसूचित करण्यात आली असली तरी ही ती २०१८ पासून लागू करण्यात आली आहे. अनेक वेळा मालक जनावराने दूध देणे बंद केल्यानंतर त्यांना सोडून देते. मात्र या प्राण्यांमुळे वाहनचालकांना धोका निर्माण होतो आणि अपघातही होत असतात. 

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत