शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

अन्यथा गोव्याचे वीजमंत्री काब्रालही करणार जंतरमंतरवर निदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 18:48 IST

मडगाव - गोव्यातील खाण अवलंबितांचा ताप आता स्थानिक आमदारांना सहन करावा लागत असून, बुधवारी त्याचा प्रत्यय कुडचडेचे आमदार असलेले ...

मडगाव - गोव्यातील खाण अवलंबितांचा ताप आता स्थानिक आमदारांना सहन करावा लागत असून, बुधवारी त्याचा प्रत्यय कुडचडेचे आमदार असलेले वीजमंत्री निलेश काब्राल यांना आला. यावेळी खाण अवलंबितांशी बोलताना खाण प्रश्र्नावर बोलणी करण्यासाठी आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे वेळ मागितली आहे. प्रधानमंत्र्यांनी जर आपल्याला भेट नाकारली तर खाण अवलंबितांबरोबर आपणही दिल्लीच्या जंतरमंतरवर निदर्शने करायला बसण्यास मागे-पुढे पहाणार नाही, असे ते म्हणाले.खाण अवलंबितांच्या प्रतिनिधींनी बुधवारी काब्राल यांची कुडचडे येथे भेट घेतली. यावेळी बोलताना काब्राल म्हणाले, गोव्यात खाणींचा लिलाव केल्यास नवीन कंपन्या या खाणीत काम करणाऱ्या 70 हजार कामगारांना सामावून घेऊ शकणार नाहीत. त्यामुळे गोव्यातील खाणी संदर्भात वेगळा कायदा हाच त्यावर उपाय आहे. केंद्र सरकारच्या कायदा खात्याने सध्याच्या खाण कायद्यात सरकारने बदल करु नये असा सल्ला दिला आहे. हा सल्ला बाजूला सारुन आता प्रधानमंत्र्यांनी स्वत:च्या अधिकारात निर्णय घेण्याची गरज आहे. हे पटवून देण्यासाठीच आपण व सभापती प्रमोद सावंत यांनी प्रधानमंत्र्यांची भेट मागितली आहे. ही अपॉयन्टमेंट जर मिळाली नाही तर लोकांबरोबर दिल्लीत जाऊन निदर्शनाच्या मार्गे भेट घेऊ, असा इशारा त्यांनी दिला. भाजपाने आपल्यावर पक्षविरोधी कृती केल्याच्या आरोपाखाली त्यानंतर कारवाई केली तरी आपल्याला पर्वा नाही असे ते म्हणाले.काब्राल यांनी यावेळी अ‍ॅडव्होकेट जनरल कडूनही हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. वास्तविक गोव्यात अजुनही 24 खाणी अशा आहेत ज्या 2020 र्पयत चालू शकतात. निदान त्या खाणी तरी चालू ठेवाव्यात अशी मागणी आपण केली होती. मात्र सरकारकडून या मागणीलाही प्रतिसाद मिळालेला नाही. आमचे एजी कदाचित वरुन निर्णय घेत असावेत असा टोमणाही त्यांनी मारला.गोव्यात एकूण 523 खाणी आहेत त्यापैकी 123 खाणी चालू होत्या. त्यातील 88 खाणींचे लिज परवान्यांचे नुतनीकरण झाले होते. निदान या खाणींबाबत तरी केंद्र सरकारने वेगळा निर्णय घ्यायला पाहिजे. इतर खाणींचा लिलाव केला तर हरकत नाही. पण 88 खाणी आहे त्या लिज धारकांद्वारेच त्या चालविल्या पाहिजेत अशी मागणी आपण प्रधानमंत्र्यांकडे करणार असे ते म्हणाले.

टॅग्स :goaगोवाGovernmentसरकार