शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
5
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
6
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
7
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
8
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
9
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
12
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
13
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
14
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
15
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
16
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
17
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
18
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
19
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
20
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...

हॉटेल्स, कारखान्यांचे पाणी, वीज तोडू; मुख्यमंत्री कडाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2024 10:04 IST

कचरा, सांडपाण्यावरून सुनावले खडेबोल

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : गोवा राज्य 'नितळ सुंदर व आत्मनिर्भर' करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. असे असताना काही औद्योगिक कारखाने व हॉटेलवाले त्यांचा कचरा गावच्या वेशीवर आणून टाकत आहेत. हे प्रकार वाढले असून संबंधितांनी हा 'उद्योग' थांबवावा. अन्यथा सरकार कारवाई करताना त्या-त्या आस्थापनांना सील ठोकण्यास मागे पुढे पाहणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला आहे.

हरवळे पंचायत क्षेत्रात कचरा व्यवस्थापन शेड (एमआरएफ) च्या उ‌द्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर प्रदूषण महामंडळाचे अध्यक्ष महेश पाटील, अंकित यादव, के. गणेश, डॉ. सचिन तेंडुलकर, सरपंच गौरवी नाईक, अजय मळीक, आग्नेल जॉर्ज यांच्यासह पंचायतीचे सरपंच, उपसरंपच, पंच सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

गोवा सरकार राज्यातील कचरा व्यवस्थापनासाठी वेगवेगळ्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. 'नितळ गोवा, सुंदर गोवा' करणे हे प्रत्येकाचे काम आहे. त्या दृष्टीने राज्यातील प्रत्येक पंचायत, पालिकांनी कार्यरत राहावे. सुका कचरा, ओला कचरा यावर प्रक्रिया करण्यासाठी सरकारने अनेक साधने उपलब्ध केलेली आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

या प्रकल्पातून सुका कचरा गोळा करून प्रक्रिया करणे व आर्थिक उत्पन्न मिळविणे, असे दुहेरी फायदे असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे. हरवळे पंचायतीचा आदर्श राज्यातील इतर पंचायतींनीही घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. अशाप्रकारचा प्रकल्प उभारण्यात आल्याने कचरा व्यवस्थापनावर निश्चितपणे मार्ग काढणे सोपे होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आस्थापनांना तंबी

औद्योगिक व हॉटेलचा कचरा ही मोठी समस्या बनत असताना त्यावर प्रक्रिया करण्यासाठी संबंधित आस्थापनांच्या लोकांनी विशेष लक्ष द्यावे. मात्र, दुर्दैवाने काही ठिकाणी हॉटेल व कारखान्यांचा कचरा रात्रीच्यावेळी गावच्या वेशीवर आणून टाकण्याचे प्रकार घडत असल्याने या प्रकरणी सरकार अतिशय गंभीरपणे दखल घेणार आहे. संबंधितांनी हा सरकारचा इशारा समजावा, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

२० ते २२ जणांना रोजगाराची संधी

बिसलरी नॅशनल, अर्थ इंटरनॅशनल, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ, मिनरल फाउंडेशन ऑफ गोवा यांच्या सहकार्याने कचरा व्यवस्थापन करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत कचरा गोळा करण्यात येणार आहे. तसेच या माध्यमातून या भागात २० ते २२ लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत