शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
3
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
4
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
5
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
6
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
7
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
8
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
9
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
10
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
11
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
12
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
13
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
14
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
15
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
16
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
17
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
18
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
19
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
20
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे

...तर बार्देश उत्तर भारतीयांच्या हाती जाणार: आमदार विजय सरदेसाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 13:13 IST

म्हापशात गोवा फॉरवर्डच्या जनता दरबारात नागरिकांच्या विविध समस्या

लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : उत्तर भारतीयांची दादागिरी होत असून, बार्देश भागात त्यांचे वर्चस्व सुरू आहे. गोव्यात गोवेकर अल्पसंख्याक होऊ लागले आहेत. त्याला सरकार जबाबदार असल्याचा आरोप आमदार तथा गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी केला. तसेच सरकारातील पारदर्शकता संपुष्टात आली असून, भविष्यात बार्देश तालुक्यावर उत्तर भारतीय आपले वर्चस्व गाजविणार असल्याचे सरदेसाई म्हणाले.

सोमवारी म्हापशात गोवा फॉरवर्डचा जनता दरबार पार पडला. यावेळी आमदार विजय सरदेसाई बोलत होते. माजी आमदार किरण कांदोळकर, महासचिव दुर्गादास कामत, उत्तर गोवा जिल्हा महासचिव संतोष सावंत, दीपक कळंगुटकर आदी पक्षातील नेते यावेळी उपस्थित होते. विविध ज्वलंत प्रश्न म्हापशात गोवा फॉरवर्डच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात स्थानिकांनी उपस्थित केले.

अनेक सरकारी कार्यालये खासगी जागेतून चालवली जातात तर दुसऱ्या बाजूने सरकारकडून जागा लिज करारावर देण्यात आल्या आहेत. सरकारच्या मानव संसाधन मंडळाकडून नोकर भरतीच्या नावावर बेरोजगारांची फसवणूक केली जात असल्याचे देवीदास पणजीकर यांनी निदर्शनाला आणून दिले. किरण कांदोळकर, अॅड. महेश राणे यांनीही आवाज उठवला.

पोलिस बदलीला राजकीय आशीर्वाद

एकाच स्थानकावर तीन वर्षांहून अधिक काळ सेवेत असलेल्या पोलिसांच्या बदल्या करण्याचे सत्र सरकारकडून हाती घेण्यात आले होते. मात्र, अनेकांच्या अद्यापही राजकीय आशीर्वादामुळे बदल्या करण्यात आल्या नाहीत. तसेच काहींनी तर त्याच स्थानकावर कार्यान्वित असलेल्या वाहतूक विभागात बदली करवून घेतल्याचे हणजूण येथील एका महिलेने निदर्शनाला आणले.

बार्देश, पेडणेतून निवडणूक

बार्देश तसेच पेडणे तालुक्यातून निवडणूक लढविण्याच्या मुद्द्यावर थेट उत्तर न देता लोकांनी मांडलेले मुद्दे सोडविण्यास आपण यशस्वी ठरल्यास लोक भविष्यात सहकार्य करतील, असे सरदेसाई म्हणाले. लोकांचे प्रश्न न सोडविल्यास ते जवळ करणार नसल्याची माहिती त्यांनी दिली. लोकांची कामे केल्यास लोक त्याची परतफेड करतील. लोकांनी मांडलेले प्रश्न, त्यांचे मुद्दे आपण ऐकून घेतले असून, उपस्थित प्रश्न विधानसभेत विविध माध्यमातून मांडले जाणार आहेत. तसेच जे प्रश्न सरकारकडून सोडविले जाऊ शकतात ते राजकारण बाजूला सारून त्या पद्धतीने सोडविण्याचा प्रयत्न करणार. म्हापसा पालिकेकडून लागू करण्यात आलेली कर प्रणाली भाडेकरूंकडून भाड्यासह घरपट्टी वसूल करण्याचा प्रकार म्हणजे पालिकेचा संस्थात्मक भ्रष्टाचार असल्याचा आरोपही आमदार सरदेसाई यांनी केला. 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण