शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगनं बाजी पलटली; २८ आमदार असताना भाजपानं ३२ मते कशी मिळवली?
2
'मोदीज मिशन' पुस्तकातील काही भाग शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा; एकनाथ शिंदेंची मागणी
3
जम्मू-काश्मीर राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर; नॅशनल कॉन्फरन्स 3, तर भाजपचा 1 जागेवर विजय
4
चीनचं धक्कादायक कारस्थान उघड, पँगाँग सरोवराजवळ उभारतोय एअर डिफेन्स कॉम्प्लेक्स
5
मोबाईल चार्जरमध्ये लपवलं १५० ग्रॅम सोनं, तेच ठरलं जीवघेणे; युवकाच्या हत्येचा अखेर उलगडा
6
लालबागमधील हल्लेखोर प्रियकरापाठोपाठ ‘त्या’ मुलीचाही मृत्यू, किरकोळ कारणातून गेले दोन जीव  
7
सोन्या-चांदीचे दर कोसळले! सोनं 2,000, तर चांदी 4,000 रुपये स्वस्त; कारण काय..?
8
Maruti CNG Cars: पेट्रोलच्या वाढत्या किमतींनी हैराण झालात? मारुतीच्या 'या' ५ सीएनजी कार वाचवतील तुमचे पैसे!
9
"कोणत्याही देशाच्या दबावाखाली व्यापार करार करणार नाही", पीयूष गोयल यांचे अमेरिकेला खडेबोल
10
IND vs AUS: कोहलीनं फॉर्म परत मिळवण्यासाठी काय करावं? मोहम्मद कैफचा मोलाचा सल्ला! म्हणाला...
11
दहावी पास झालेल्यांसाठी सरकारी नोकरीची संधी! ३९१ कॉन्स्टेबल जीडी पदांची भरती निघाली
12
‘मोबाईल सर्व्हेलन्स’च्या मुद्द्यावरून बावनकुळेंची सारवासारव, व्हॉट्सअप ग्रुप्सबाबत बोलल्याचा दावा
13
१ लाख व्हॉट्सअप ग्रुप, भाजपाची 'वॉर रूम'; कशी चालते यंत्रणा? बावनकुळेंनी सगळेच सांगितले
14
धडाकेबाज PSI 'बदने'वर बलात्काराचा आरोप! तस्करांना पकडणारा अधिकारी महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर फरार
15
डॉक्टर अवघड शस्त्रक्रिया करत होते. ती ऑपरेशन टेबलवर सनई वाजवत होती, व्हिडीओ व्हायरल
16
"मला न्याय हवाय, पती-मुलाला लोखंडी रॉडने मारहाण..."; भाजपा महिला नेत्याचा रस्त्यावर ठिय्या
17
'All is not well with the UN', संयुक्त राष्ट्र संघाबाबत जयशंकर यांचे मोठे वक्तव्य...
18
Crocodile Torture: वसाहतीत घुसलेल्या मगरीसोबत तरुणांचं अमानुष कृत्य, आरोपींचा शोध सुरू!
19
भारतीय पुरुषांच्या 'स्पर्म क्वालिटी'ने अभ्यासक अवाक्; रिपोर्टमधून 'जगावेगळं'च चित्र समोर
20
आशियाई हवाई हद्दीत अचानक उडताना दिसली रशियाची आण्विक फायटर जेट्स, नेमकं प्रकरण काय?

'स्वयंपूर्ण गोवा' उपक्रमाचा इतर राज्यांनी आदर्श घ्यावा! केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2024 12:58 IST

राज्यातील शेतकऱ्यांशी ऑनलाइन साधला संवाद, कृषी व ग्रामीण विकास मंत्रालय गोव्यासोबत काम करण्यास उत्सुक

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेला 'स्वयंपूर्ण गोवा' हा स्तुत्य असा उपक्रम असून केवळ गोवाच नव्हे तर देशाला देखील दिशा दाखवत आहे. अन्य राज्यांनीही याच धर्तीवर स्वयंपूर्ण होण्याचा विचार करावा, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत 'आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा' अंतर्गत कृषी व ग्रामीण विकास योजनांच्या लाभार्थ्यांशी साधलेल्या ऑनलाइन परिसंवादावेळी ते बोलत होते. केंद्र सरकार गोव्याला सहकार्य करत आले आहे. यापुढेही असेच सहकार्य राहील. गोवा हे लहान राज्य असले तरी त्यांनी कृषी नव्हे तर अन्य क्षेत्रातही मोठा विकास साधला असून ते कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हेसुद्धा 'स्वयंपूर्ण गोवा' संकल्पनेचे कौतुक करीत आहेत. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली वैभवशाली भारत निर्माण होत आहे. २०४७ पर्यंत विकसित भारत बनवण्याचे ध्येय पंतप्रधानांनी समोर ठेवले असून त्यांनी केवळ ही घोषणाच केली नसून त्याचा रोडमॅपही तयार केला आहे. केंद्र सरकारचे कृषी व ग्रामीण विकास मंत्रालय नेहमीच गोव्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे. आमच्या विविध योजनांच्या माध्यमातून नेहमीच सहयोग असेल, असे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, खाजन शेतीचे व्यवस्थापन करणे, कृषी पर्यटनाला चालना देणे आदी विविध उपक्रम गोवा सरकारने राबवले आहेत. हे खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे. कृषी कार्ड अंतर्गत शेतकऱ्यांना शेती करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. आता केंद्रातून 'लखपती दिदी या योजनेला गती दिली जाईल, असे चौहान यांनी सांगितले. कृषी व ग्रामीण विकास मंत्रालय नेहमीच गोव्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे. आमच्या विविध योजनांच्या माध्यमातून नेहमीच सहयोग असेल, असे त्यांनी सांगितले.

'कौशल्य विकास'चा लाभ होतोय : मुख्यमंत्री

भाजप सरकारने गोव्यातील तरुणांना सक्षम करण्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. हा उपक्रम तरुणांना एका वर्षाच्या कार्यक्रमात नाव नोंदणी करण्याची संधी देतो. यामुळे त्यांना कामाचा अनुभव मिळण्याबरोबरच प्रमाणपत्रही मिळते. सरकारी किंवा कॉर्पोरेट नोकऱ्यांसाठी अर्ज करताना या प्रमाणपत्राचा फायदा होईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

सेंद्रीय शेतीला प्राधान्य द्या

शेतीमध्ये पिकणाऱ्या फळे, भाज्यांवर रसायनिक फवारणीमुळे जमीन धोक्यात येत आहेच. शिवाय लोकांचे आरोग्यही संकटात सापडले आहे. रासायनिक खतांमुळे कॅन्सर सारखा आजार पसरत आहे. यामुळे केंद्र सरकारने आता सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्याचे ठरवले आहे. या अंतर्गत गोमुत्र, गोबर यासारख्या नैसर्गिक गोष्टींचा वापर शेतीसाठी करता येईल, असे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान सांगितले. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीfarmingशेती