शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

खासदारांच्या निलंबनाविरोधात विरोधी पक्षांकडून सरकारचा निषेध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2023 17:06 IST

पणजीतील आझाद मैदानावर निदर्शने.

नारायण गावस, पणजी: देशातील १४६ खासदारांना लोकसभेतून निलंबित करण्यात आल्याच्या निषेधार्थ गोवा प्रदेश काँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, आप तसेच शिवसेना या विरोधी पक्षांकडून केंद्रीय भाजप सरकारच्या कृत्याचा निषेध करण्यात आला. येथील  आझाद मैदानावर सर्व  विरोधी पक्ष एकत्र येत भाजपच्या मक्तेदारी विरोधात निदर्शने केली. तसेच भाजपला येत्या लोकसभेत धडा शिकविण्यासाठी सर्व  विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी गोवा प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते आमदार युरी आलेमाव, आमदार ॲड. कार्लुस आल्मेदा, आमदार एल्टन डिकोस्टा, आपचे समन्वयक ॲड. अमित पालेकर, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जुझे फिलीप तसेच इतर नेते उपस्थित होते.

यावेळी गोवा प्रदेश काँग्रेसचे अमित पाटकर, म्हणाले भाजपला पराभव आता दिसत आहे म्हणून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारकडे विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी काहीच नसल्याने असे खासदारांना निलंबित केले जात आहे. भाजपने कितीही हुकुमशाही केली तरी जनतेचा आवाज दाबला जाणार नाही आता इंडिया आघाडी एकत्र आली असून येणाऱ्या २०२४ च्या लोकसभेत भाजपला धडा शिकविला जाणार आहे.

भाजपकडून लोकशाहीचा खून :युरी आलेमाव : विरोधी पक्षनेते

भाजप सरकारने हुकूमशाही सुरु केली आहे. लोकांना जातीय वादावर भेदभाव करुन राजकारण केले जात आहे. हे सरकार लोकशाही मानत नाही. लोकशाहीचा खून केला जात आहे. आज सरकारविरोधात बोलले जात असल्याने राहुल गांधी यांच्या पुतळ्याचे दहन केले पण त्यांचे विचार दहन करु शकत नाही. कॉँग्रेसने देशातील सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणले आहे.  गोव्यातही भाजप सरकारकडून हुकूमशाही  केली जात आहे. जनतेला विश्वासात घेतले जात नाही. 

अमित पाटकर : आप समन्वयक

लोकशाहीच्या आधारे प्रश्न  विचारल्यावर खासदारांना बाहेर काढले जात आहे. म्हणजे विरोधकांना सरकारला विचारायचा अधिकार नाही का? येत्या २०२४ मध्ये भाजपला पराभूत होण्याची भीती वाटत आहे. विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. ही भाजपची हुकूमशाही आहे. आमचा या विरोधात आवाज सुरुच असणार आहे. हे आंदोलन देशभर सुरुच आहे.

जुझे फिलीप : राष्ट्रवादी काँग्रेस

हे सरकार विभाजन करुन राजकारण करत आहे आता आम्हाला सर्व विरोधकांना एकत्र येणे गरजेचे आहे. जर हे भाजप सरकार असेच हुकूमशाही करत असेल तर आम्ही त्यांच्या विरोधात लढा सुरुच ठेवणार आहोत. या सरकारला विरोधकांचा आवाज दाबायला दिला जाणार नाही. तसेच लोकशाही नष्ट करायला दिली जाणार नाही.

टॅग्स :goaगोवा