शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

विरोधी आमदारांनी सोडले सभागृह; अधिवेशन एकच दिवसाचे ठेवल्याने निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2025 13:10 IST

विधानसभेचे कामकाज केवळ एक दिवसाचे ठेवल्याने निषेध करीत विरोधी आमदारांनी राज्यपालांच्या अभिभाषणावेळी सभागृहात गोंधळ माजवला.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: विधानसभेचे कामकाज केवळ एक दिवसाचे ठेवल्याने निषेध करीत विरोधी आमदारांनी राज्यपालांच्या अभिभाषणावेळी सभागृहात गोंधळ माजवला. या गदारोळात राज्यपालांनी अभिभाषण चालूच ठेवले. नंतर सहा विरोधी आमदारांनी सभात्याग केला. गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई मात्र निषेधाचा फलक घेऊन राज्यपालांचे अभिभाषण संपेपर्यंत सभागृहातच उभे राहिले.

नवीन वर्षातील अधिवेशनाचा गुरुवारी पहिला दिवस असल्याने राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई अभिभाषणासाठी उभे राहिले असता विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी 'एक दिवसाचे अधिवेशन म्हणजे लोकशाहीची थट्टा असल्याचा आरोप करत अभिभाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, ढासळलेली कायदा सुव्यवस्था तसेच अन्य महत्वाचे विषय आम्हाला मांडायचे आहेत. मात्र केवळ एक दिवसाचे अधिवेशन ठेवून थट्टा चालवली आहे. केरळमध्ये सरकारने वर्षभरात पन्नास दिवस अधिवेशन घेतले. सहा महिन्यांनी गोव्यात अधिवेशन होत आहे व तेही एक दिवसाचे होय. लोकशाही पायदळी तुडवण्याचा हा प्रकार आहे. यावेळी आमदार विजय सरदेसाई, वेंझी व्हिएगश, क्रूझ सिल्वा यांनी राज्यपाल अभिभाषणास उभे राहिले असता निषेध नोंदवून घोषणा दिल्या. निषेध म्हणून विरोधी आमदार दंडाला काळ्या फिती बांधून व काळे कपडे परिधान करून सभागृहात आले होते. गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई काळे कपडे परिधान करून नोकरीकांड, जमीन हडप व अन्य कथित घोटाळ्यांबाबत निषेधाचा फलक घेऊन आले होते.

कामकाज सल्लागार समितीचा अहवाल विरोधकांनी मान्य केला नाही. या अहवालाला आक्षेप घेण्यात आला. विधानसभेचे अधिवेशन केवळ एक दिवसाचे ठेवण्याबाबत विरोधी आमदारांनी आक्षेप घेणारी पत्रे लिहिली होती. परंतु त्याचा उल्लेख अहवालात केला नाही, हे निदर्शनास आणून देण्यात आले. सभापतींनी नंतर आवाजी मतदानाने तो संमत करून घेतला.

सभापती रमेश तवडकर यांनी गोंधळ माजवणाऱ्या विरोधी आमदारांना सभागृहातून बाहेर काढीन, असा इशारा दिला. त्यानंतर विजय वगळता सर्व विरोधी आमदारांनी सभात्याग केला. यात वीरेश बोरकर यांचाही समावेश होता.

सरदेसाई म्हणाले की, सावंत सरकारला विरोधकांना सामोरे जायचे नाहीय. केवळ घटनात्मक तरतुदीची पूर्तता म्हणून एक दिवसाचे अधिवेशन बोलावले आहे. या सरकारला कोणत्याही विषयावर सभागृहात चर्चा करायची नाहीय. घटनेची ही निव्वळ थट्टा होय.

आपचे आमदार वेंझी व्हिएगश म्हणाले की, एक दिवसाचे अधिवेशन ठेवून या सरकारला लोकांचा विश्वास व सब का साथ मिळणार नाही.

मुख्यमंत्र्यांकडून नाराजी

या घटनेची दखल घेऊन मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, गोवा विधानसभा अधिवेशनाच्या इतिहासात असा प्रकार प्रथमच घडला असावा. आमदारांनी प्रथेचे पालन करुन सभागृहाचे पावित्र्य जपायला हवे. राज्यपालांचे अभिभाषण संपल्यानंतर ते परत जात असताना मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेत्याने त्यांच्यासोबत बाहेर जाऊन त्यांना निरोप देण्याची प्रथा आहे. परंतु विरोधी पक्षनेते युरी आलेमाव हे काल राज्यपालांसोबत गेले नाहीत. अधिवेशन एक दिवसाचेच ठेवल्याने निषेध म्हणून त्यांनी सभात्यागही केला होता. तर सभापती रमेश तवडकर यांनी गोंधळ माजवणाऱ्या विरोधी आमदारांना सभागृहातून बाहेर काढीन, असा इशारा दिला.

 

टॅग्स :goaगोवाvidhan sabhaविधानसभाPoliticsराजकारण