शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी आमदारांनी सोडले सभागृह; अधिवेशन एकच दिवसाचे ठेवल्याने निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2025 13:10 IST

विधानसभेचे कामकाज केवळ एक दिवसाचे ठेवल्याने निषेध करीत विरोधी आमदारांनी राज्यपालांच्या अभिभाषणावेळी सभागृहात गोंधळ माजवला.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: विधानसभेचे कामकाज केवळ एक दिवसाचे ठेवल्याने निषेध करीत विरोधी आमदारांनी राज्यपालांच्या अभिभाषणावेळी सभागृहात गोंधळ माजवला. या गदारोळात राज्यपालांनी अभिभाषण चालूच ठेवले. नंतर सहा विरोधी आमदारांनी सभात्याग केला. गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई मात्र निषेधाचा फलक घेऊन राज्यपालांचे अभिभाषण संपेपर्यंत सभागृहातच उभे राहिले.

नवीन वर्षातील अधिवेशनाचा गुरुवारी पहिला दिवस असल्याने राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई अभिभाषणासाठी उभे राहिले असता विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी 'एक दिवसाचे अधिवेशन म्हणजे लोकशाहीची थट्टा असल्याचा आरोप करत अभिभाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, ढासळलेली कायदा सुव्यवस्था तसेच अन्य महत्वाचे विषय आम्हाला मांडायचे आहेत. मात्र केवळ एक दिवसाचे अधिवेशन ठेवून थट्टा चालवली आहे. केरळमध्ये सरकारने वर्षभरात पन्नास दिवस अधिवेशन घेतले. सहा महिन्यांनी गोव्यात अधिवेशन होत आहे व तेही एक दिवसाचे होय. लोकशाही पायदळी तुडवण्याचा हा प्रकार आहे. यावेळी आमदार विजय सरदेसाई, वेंझी व्हिएगश, क्रूझ सिल्वा यांनी राज्यपाल अभिभाषणास उभे राहिले असता निषेध नोंदवून घोषणा दिल्या. निषेध म्हणून विरोधी आमदार दंडाला काळ्या फिती बांधून व काळे कपडे परिधान करून सभागृहात आले होते. गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई काळे कपडे परिधान करून नोकरीकांड, जमीन हडप व अन्य कथित घोटाळ्यांबाबत निषेधाचा फलक घेऊन आले होते.

कामकाज सल्लागार समितीचा अहवाल विरोधकांनी मान्य केला नाही. या अहवालाला आक्षेप घेण्यात आला. विधानसभेचे अधिवेशन केवळ एक दिवसाचे ठेवण्याबाबत विरोधी आमदारांनी आक्षेप घेणारी पत्रे लिहिली होती. परंतु त्याचा उल्लेख अहवालात केला नाही, हे निदर्शनास आणून देण्यात आले. सभापतींनी नंतर आवाजी मतदानाने तो संमत करून घेतला.

सभापती रमेश तवडकर यांनी गोंधळ माजवणाऱ्या विरोधी आमदारांना सभागृहातून बाहेर काढीन, असा इशारा दिला. त्यानंतर विजय वगळता सर्व विरोधी आमदारांनी सभात्याग केला. यात वीरेश बोरकर यांचाही समावेश होता.

सरदेसाई म्हणाले की, सावंत सरकारला विरोधकांना सामोरे जायचे नाहीय. केवळ घटनात्मक तरतुदीची पूर्तता म्हणून एक दिवसाचे अधिवेशन बोलावले आहे. या सरकारला कोणत्याही विषयावर सभागृहात चर्चा करायची नाहीय. घटनेची ही निव्वळ थट्टा होय.

आपचे आमदार वेंझी व्हिएगश म्हणाले की, एक दिवसाचे अधिवेशन ठेवून या सरकारला लोकांचा विश्वास व सब का साथ मिळणार नाही.

मुख्यमंत्र्यांकडून नाराजी

या घटनेची दखल घेऊन मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, गोवा विधानसभा अधिवेशनाच्या इतिहासात असा प्रकार प्रथमच घडला असावा. आमदारांनी प्रथेचे पालन करुन सभागृहाचे पावित्र्य जपायला हवे. राज्यपालांचे अभिभाषण संपल्यानंतर ते परत जात असताना मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेत्याने त्यांच्यासोबत बाहेर जाऊन त्यांना निरोप देण्याची प्रथा आहे. परंतु विरोधी पक्षनेते युरी आलेमाव हे काल राज्यपालांसोबत गेले नाहीत. अधिवेशन एक दिवसाचेच ठेवल्याने निषेध म्हणून त्यांनी सभात्यागही केला होता. तर सभापती रमेश तवडकर यांनी गोंधळ माजवणाऱ्या विरोधी आमदारांना सभागृहातून बाहेर काढीन, असा इशारा दिला.

 

टॅग्स :goaगोवाvidhan sabhaविधानसभाPoliticsराजकारण