शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

तीन दिवस अधिवेशन ही थट्टाच; विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत विरोधी आमदारांकडून नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 08:38 IST

सभापती रमेश तवडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आपचे आमदार वेंझी व्हिएगश व इतर उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत विरोधी आमदारांकडून तीन दिवसांच्या अल्पकालीन अधिवेशनाबाबत तसेच विधानसभेत दिली जाणारी आश्वासने पाळली जात नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. तीन दिवसांचे अधिवेशन ही थट्टा असल्याची टीका आपचे आमदार वेंझी व्हिएगश यांनी केली. सरकारी विधेयके ४८ तास आधी मिळायला हवीत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

सभापती रमेश तवडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आपचे आमदार वेंझी व्हिएगश व इतर उपस्थित होते. सरकारविरोधी पक्षाच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास घाबरते म्हणूनच अल्पकाळाचे अधिवेशन ठेवले जाते, असा आरोप विरोधी गटातील आमदार करीत आहेत.

विधेयके ४८ तास आधी द्या : वेंझी

वेंझी म्हणाले की, केवळ तीन दिवसांचे अधिवेशन ही निव्वळ थट्टा आहे. आम्हाला कोणतेच विषय मांडायला मिळणार नाही. आजची बैठक हे केवळ सोपस्कार होते. विरोधी आमदारांना बोलायला पुरेसा वेळ मिळायला हवा तसेच सरकारी विधेयके ४८ तास आधी मिळायला हवीत.

आश्वासन समितीने अहवाल सादर करावा

सभागृहाचा अर्धा अधिक वेळ पूर्वी चर्चा केलेल्या प्रश्नांवरच वाया घालवला जातो. या प्रश्नांवर यापूर्वीही आश्वासने दिलेली असतात; परंतु पाळली जात नाहीत. विधानसभेत किती आश्वासने दिली व किती पूर्ण झाली याचा अहवाल सरकारने किंवा आश्वासन समितीने येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर करायला हवा. सरकारी विधेयके किमान ३६ तास आधी सादर करून नंतरच संमतीसाठी आणली जावीत. सध्या २४ तास आधी सादर करून ती घाईगडबडीत संमत करून घेतली जातात. त्यामुळे आमदारांना विधेयकांवर अभ्यास करण्यासाठी वेळ मिळत नाही.

सरदेसाईंकडून सभापतींना पत्र

गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई आजारी असल्याने बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. परंतु, त्यांनी सभापतींना पत्र लिहून अल्पकाळाचे अधिवेशन ठेवल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ज्या पद्धतीने विधानसभेचे कामकाज घेतले जाते, त्याबद्दल निषेध केला. त्यांनी पत्रात असे म्हटले आहे की, विरोधी आमदार लक्षवेधी सूचनेवर बोलताना किंवा प्रश्नोत्तराच्या तासाला अथवा शून्य प्रहराला बोलताना सरकारकडून आश्वासने दिली जातात; परंतु ती केवळ कागदावरच राहतात. प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही. 

टॅग्स :goaगोवाvidhan sabhaविधानसभा