शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

तीन दिवस अधिवेशन ही थट्टाच; विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत विरोधी आमदारांकडून नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 08:38 IST

सभापती रमेश तवडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आपचे आमदार वेंझी व्हिएगश व इतर उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत विरोधी आमदारांकडून तीन दिवसांच्या अल्पकालीन अधिवेशनाबाबत तसेच विधानसभेत दिली जाणारी आश्वासने पाळली जात नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. तीन दिवसांचे अधिवेशन ही थट्टा असल्याची टीका आपचे आमदार वेंझी व्हिएगश यांनी केली. सरकारी विधेयके ४८ तास आधी मिळायला हवीत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

सभापती रमेश तवडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आपचे आमदार वेंझी व्हिएगश व इतर उपस्थित होते. सरकारविरोधी पक्षाच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास घाबरते म्हणूनच अल्पकाळाचे अधिवेशन ठेवले जाते, असा आरोप विरोधी गटातील आमदार करीत आहेत.

विधेयके ४८ तास आधी द्या : वेंझी

वेंझी म्हणाले की, केवळ तीन दिवसांचे अधिवेशन ही निव्वळ थट्टा आहे. आम्हाला कोणतेच विषय मांडायला मिळणार नाही. आजची बैठक हे केवळ सोपस्कार होते. विरोधी आमदारांना बोलायला पुरेसा वेळ मिळायला हवा तसेच सरकारी विधेयके ४८ तास आधी मिळायला हवीत.

आश्वासन समितीने अहवाल सादर करावा

सभागृहाचा अर्धा अधिक वेळ पूर्वी चर्चा केलेल्या प्रश्नांवरच वाया घालवला जातो. या प्रश्नांवर यापूर्वीही आश्वासने दिलेली असतात; परंतु पाळली जात नाहीत. विधानसभेत किती आश्वासने दिली व किती पूर्ण झाली याचा अहवाल सरकारने किंवा आश्वासन समितीने येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर करायला हवा. सरकारी विधेयके किमान ३६ तास आधी सादर करून नंतरच संमतीसाठी आणली जावीत. सध्या २४ तास आधी सादर करून ती घाईगडबडीत संमत करून घेतली जातात. त्यामुळे आमदारांना विधेयकांवर अभ्यास करण्यासाठी वेळ मिळत नाही.

सरदेसाईंकडून सभापतींना पत्र

गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई आजारी असल्याने बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. परंतु, त्यांनी सभापतींना पत्र लिहून अल्पकाळाचे अधिवेशन ठेवल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ज्या पद्धतीने विधानसभेचे कामकाज घेतले जाते, त्याबद्दल निषेध केला. त्यांनी पत्रात असे म्हटले आहे की, विरोधी आमदार लक्षवेधी सूचनेवर बोलताना किंवा प्रश्नोत्तराच्या तासाला अथवा शून्य प्रहराला बोलताना सरकारकडून आश्वासने दिली जातात; परंतु ती केवळ कागदावरच राहतात. प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही. 

टॅग्स :goaगोवाvidhan sabhaविधानसभा