शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

सरकारवर आरोप करणे हाच विरोधकांचा अजेंडा: मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2024 08:39 IST

दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सुशासन दिन कार्यक्रमात ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : सरकारवर आरोप करून विरोधक आपला राजकीय अजेंडा पुढे नेत आहेत. आमचे सरकार हे लोकाभिमुख असून, जनतेच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सुशासन दिन कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमाला पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा, मडगावचे आमदार दिगंबर कामत, दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस उपस्थित होत्या. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, ती काहीजण स्वतःला एनजीओ म्हणत सरकारविरोधात व्हिडीओ जारी करतात व ते सोशल मीडियावर प्रसिद्ध करतात. सोशल मीडियाचा ते गैरवापर करतात.

वानरमारी समाजाच्या विकासाच्या दृष्टीनेही सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. या समाजातील मुले शिकावित, आपल्या पायावर उभी राहवीत, त्यांना वीज, पाणी आदी मूलभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रयत्न केले जात असून, त्यादिशेने त्यांना जन्मदाखला जारी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यांचे डॉक्युमेंटेशन केले जात आहे. भविष्यात वानरमारे समाजातील मुले चांगले शिक्षण घेऊन मोठ्या पदावरही पोहोचतील. त्यांना मुख्य प्रवाहात आणले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

९२८ तक्रारींचे निराकरण 

दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाने सुशासन सप्ताहादरम्यान जनतेच्या ९२८ तक्रारींचे निराकरण केले. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी राज्य आणि केंद्रीय आपत्ती निवारण योजनांतर्गत प्राप्त झालेल्या ५६८ दाव्यांसाठी २ कोटी ७७ लाख ६० हजार ५८९ रुपयांच्या मंजुरी आदेशांचे वितरण केले. माजी जिल्हाधिकारी एन. डी. अग्रवाल यांचा सत्कार झाला. ही कार्यशाळा विलंबित जन्म नोंदणीशी संबंधित आदेशांचे वितरण करण्यासाठीही महत्त्वाची ठरली. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत