शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

गोव्यात खुल्या जागा पूर्वलक्षी प्रभावाने पंचायती, नगरपालिकांच्या ताब्यात येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 13:50 IST

गृहनिर्माण सोसायट्यांमधील खुल्या जागा पूर्वलक्षी प्रभावाने स्थानिक स्वराज संस्थांकडे याव्यात यासाठी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कायदा आणण्याचा सरकारचा विचार आहे.

पणजी : गृहनिर्माण सोसायट्यांमधील खुल्या जागा पूर्वलक्षी प्रभावाने स्थानिक स्वराज संस्थांकडे याव्यात यासाठी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कायदा आणण्याचा सरकारचा विचार आहे. नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी याबाबत विधानसभेत सूतोवाच केले आहे. अधिक माहितीसाठी सरदेसाई यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, निवासी इमारती किंवा घरे बांधताना गृहनिर्माण सोसायट्या खुल्या जागा ठेवतात. या जागा मनोरंजनाचे कार्यक्रम किंवा तत्सम गोष्टींसाठी असतात. परंतु अनेकदा या खुल्या जमिनींचा गैरवापर केला जातो. या जमिनींचे बेकायदा रुपांतर केले जाते किंवा त्या लाटल्या जातात. असे प्रकार घडू नयेत यासाठी सध्याच्या कायद्यात अधिवास दाखला देण्याच्या वेळेलाच या जागा पंचायती किंवा पालिकांकडे सुपूर्द करण्याची तरतूद आहे. परंतु जुन्या सोसायट्यांमधील जागांच्याबाबतीत अशी कोणतीही तरतूद नाही. या खुल्या जमिनी स्थानिक स्वराज संस्थांच्या ताब्यात याव्यात यासाठी पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणारा कायदा आणण्याशिवाय पर्याय नाही.

जमिनीची उपविभागणी करताना खुल्या जागा ठेवणे बंधनकारक आहे. सरदेसाई पुढे म्हणाले की, विधानसभेतील बहुतांश आमदारांचीही या खुल्या जागा पंचायती, पालिकांकडे याव्यात अशी भावना आहे. पूर्वलक्षी प्रभावाने कायदा लागू झाला तरच या जमिनी स्थानिक स्वराज संस्थांच्या ताब्यात येऊ शकतील. शहरांमध्ये तसेच किनारपट्टी भागात जमिनींचे दर सध्या प्रचंड वाढलेले आहेत. त्यामुळे खुल्या जागा बेकायदा रुपांतरे करुन लाटण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडतात.

 गोवा बचाव अभियानच्या निमंत्रक साबिना मार्टिन्स यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, ‘या विधेयकात नेमक्या कोणत्या तरतुदी केल्या जाणार हे सरकारने स्पष्ट केल्यानंतरच मी त्यावर भाष्य करु शकेन.’ दरम्यान, राजधानी पणजीसारख्या शहरात पार्किंगची मोठी समस्या निर्माण झालेली आहे. खुल्या जागा राहिलेल्याच नाहीत त्यामुळे मध्यंतरी उत्तर गोवा नियोजन व विकास प्राधिकरणाने शहरातील सांतइनेज, नेवगीनगर, मिरामार भागात १९६0 पूर्वीच्याही जुन्या इमारती आहेत आणि ज्या मोडकळीस आलेल्या आहेत. त्या पाडून नव्या बांधण्याची रहिवाशांची तयारी असेल तर सध्या जो चटई निर्देशांक (एफएआर)आहे तो वाढवून देण्याची तयारी दर्शविली होती परंतुी त्यासाठी एक अट घातली होती ती अशी आहे की, जेथे तळमजल्यावर पार्किंग व्यवस्था करणे शक्य नाही तेथे नव्या इमारतीत पहिला व दुसरा मजला पार्किंगसाठी ठेवणे बंधनकारक आहे. या सर्व गोष्टींचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी नगर नियोजन कायद्यात दुरुस्तीचा प्रस्ताव सरकारसमोर ठेवण्यात आला आहे. 

 

टॅग्स :goaगोवा