शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

...तरच देशाचे महासत्तेत रुपांतर; मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे प्रतिपादन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 12:28 IST

साखळीत 'एक शाम सैनिक के नाम' कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : देशाच्या सीमारेषेवर स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन संपूर्ण जनतेचे रक्षण करणाऱ्या सैन्यदलातील जवानांचे समर्पण हे सर्वात मोठे कार्य आहे. आज प्रत्येक देशवासीयाने, विशेषतः केंद्र व राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी निष्ठेने काम केल्यास भारत देशाचे जागतिक महासत्तेत रूपांतर सहज शक्य आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

साखळी रवींद्र भवनात अखिल गोवा माजी सैनिक कल्याण संघटनेतर्फे कारगिल विजय दिवस व ऑपरेशन सिंदूर विजयनिमित्त 'एक शाम सैनिक के नाम' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने मुख्यमंत्री बोलत होते.

वीर चक्र सेसा मेडल ब्रिगेडियर बी. एम. करियप्पा, सेना मेडल ब्रिगेडियर अनिल परेरा, संघटनेचे अध्यक्ष भालचंद्र आमोणकर, उपेंद्र पै रायकर, सचिव रामदास महाले, खजिनदार कृष्णा माजिक आदींची उपस्थिती होती.

देशातील इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यातील खूप कमी प्रमाणात युवक सैन्यात आतापर्यंत भरती झालेले आहेत. परंतु, सैन्यदलात जाऊनच देशसेवा करण्यापेक्षा आपण समाजात चांगले काम केल्यास त्याचा लाभ राज्याच्या विकासात होईल.

तीच जवानांना मानवंदना

केंद्र किंवा राज्य सरकारातील कर्मचाऱ्यांनी शंभर टक्के आपले योगदान दिल्यास सैन्यातील जवानांच्या समर्पणाला आपल्या कार्यातील निष्ठेने आम्ही सर्वांनी दिलेली मानवंदना ठरेल. तेव्हाच हा देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित भारत म्हणून पुढे येईल, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. यावेळी ब्रिगेडियर बी. एम. करियप्पा यांनी कारगिल युद्धातील विविध थरारक किस्से कथन केले. या युद्धात भारतीय सैनिकांना कशाप्रकारे आपल्या प्राणांची बाजी देत देशाला यश मिळवून दिले याची सविस्तर माहिती सांगितली. तसेच बिग्रेडियर जॉन परेरा यांनी सैन्यदलातील भविष्याबाबत विद्यार्थी व युवांना मार्गदर्शन केले. मुख्यमंत्री व इतर मान्यवरांच्या हस्ते सैन्य दलात, तसेच इतर सामाजिक कार्यात योगदान दिलेल्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते समई प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतKargil Vijay Diwasकारगिल विजय दिन