शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 14:27 IST

गोव्यात पुढील महिन्यात होणाऱ्या 48 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झाली असून, त्यास चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.

पणजी - गोव्यात पुढील महिन्यात होणाऱ्या 48 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झाली असून, त्यास चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. 20 ते 28 नोव्हेंबर या दरम्यान हा चित्रपट महोत्सव होणार आहे. यंदा फिल्म इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश असल्याने देशभरातून या महोत्सवात विद्यार्थ्यांचा समावेश होईल, असं दिसतं आहे. गोवा मनोरंजन सोसायटीच्या (ईएसजी) आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने हा चित्रपट महोत्सव होत आहे. मनोरंजन संस्था आणि आयनॉक्स यांच्या करारानुसार त्यांच्या थिएटरमध्ये चालणारा या महोत्सवाचे पुढील वर्ष 2018 शेवटचे असणार आहे. 2019 मध्ये 50 वा चित्रपट महोत्सव दोनापावल येथे राज्य सरकारच्या नव्या संकुलात होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनी केली आहे. या मल्टीप्लेक्स कॉम्प्लेक्समध्ये हॉटेलसह सर्व सुविधी असणार आहेत.

गतवर्षी 2016 मध्ये 47 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सात हजारांच्या आसपास प्रतिनिधी नोंदणी झाली होती. यावर्षी प्रतिनिधी नोंदणी नऊ हजारांर्पयत जाईल, असा विश्वास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना वाटतो आहे. 

यावर्षी काही चित्रपटांना झालेली गर्दी पाहता आणि थिएटरमधील आसनक्षमता पाहता आयोजकांना रात्री उशिराचा खास शो दाखवावा लागला होता. यंदा जर प्रतिनिधींची संख्या वाढणार असेल, तर पुन्हा हाच कित्ता गिरवावा लागण्याची शक्यता आहे. ज्या चित्रपटांना गर्दी होते, त्यांना अधिक आसन क्षमतेची थिएटर उपलब्ध करून देणो गरजेचे आहे. यंदा नियोजनासाठी स्थायी व आढावा समितीची नेमणूक केल्याने हा प्रश्न सोडविण्यावर भर दिला जाईल, असे वाटते. महोत्सवात काही प्रतिनिधी तिकीट काढूनही चित्रपटांना येत नाहीत, अशा प्रतिनिधीने तीनवेळा जर आपले तिकीट वाया घालविले, तर त्यांच्यावरही कारवाई करण्याची किंवा प्रसंगी त्याचे प्रतिनिधीत्व बाद ठरविण्यावरही समिती विचार करीत आहे. 

दोन्ही समितीवर जबाबदारीस्थायी समितीमध्ये जहातू बरुआ, पियुष पांडे, नागेश कुकूनूर, रॉय कपूर, प्रसून जोशी, नीना गुप्ता, अजित सरकार, आनंद गांधी यांचा समावेश आहे. त्यामुळे या समितीवर दरवर्षी चित्रपटाच्या शोवेळी प्रतिनिधींना प्रवेश न मिळाल्याने होणाऱ्या गोंधळावर काही उपाय योजण्याची जबाबदारी आहे. आढावा समितीमध्ये विवेक अग्निहोत्री, अनिरुद्ध रॉय, ऋषिता भट, पल्लवी जोशी, खालीद महमूद, भास्कर हजारिका, सैबल चटर्जी, भावना सोमय्या यांचा समावेश आहे. या समिती महोत्सवाच्या आयोजनाचा आढावा घेऊन केंद्र सरकारला अहवाल सादर करणार आहेत.