शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
4
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
5
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
6
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
7
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
8
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
11
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
12
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
13
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
14
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
15
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
16
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
17
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
18
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
19
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
20
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?

गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 14:27 IST

गोव्यात पुढील महिन्यात होणाऱ्या 48 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झाली असून, त्यास चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.

पणजी - गोव्यात पुढील महिन्यात होणाऱ्या 48 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झाली असून, त्यास चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. 20 ते 28 नोव्हेंबर या दरम्यान हा चित्रपट महोत्सव होणार आहे. यंदा फिल्म इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश असल्याने देशभरातून या महोत्सवात विद्यार्थ्यांचा समावेश होईल, असं दिसतं आहे. गोवा मनोरंजन सोसायटीच्या (ईएसजी) आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने हा चित्रपट महोत्सव होत आहे. मनोरंजन संस्था आणि आयनॉक्स यांच्या करारानुसार त्यांच्या थिएटरमध्ये चालणारा या महोत्सवाचे पुढील वर्ष 2018 शेवटचे असणार आहे. 2019 मध्ये 50 वा चित्रपट महोत्सव दोनापावल येथे राज्य सरकारच्या नव्या संकुलात होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनी केली आहे. या मल्टीप्लेक्स कॉम्प्लेक्समध्ये हॉटेलसह सर्व सुविधी असणार आहेत.

गतवर्षी 2016 मध्ये 47 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सात हजारांच्या आसपास प्रतिनिधी नोंदणी झाली होती. यावर्षी प्रतिनिधी नोंदणी नऊ हजारांर्पयत जाईल, असा विश्वास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना वाटतो आहे. 

यावर्षी काही चित्रपटांना झालेली गर्दी पाहता आणि थिएटरमधील आसनक्षमता पाहता आयोजकांना रात्री उशिराचा खास शो दाखवावा लागला होता. यंदा जर प्रतिनिधींची संख्या वाढणार असेल, तर पुन्हा हाच कित्ता गिरवावा लागण्याची शक्यता आहे. ज्या चित्रपटांना गर्दी होते, त्यांना अधिक आसन क्षमतेची थिएटर उपलब्ध करून देणो गरजेचे आहे. यंदा नियोजनासाठी स्थायी व आढावा समितीची नेमणूक केल्याने हा प्रश्न सोडविण्यावर भर दिला जाईल, असे वाटते. महोत्सवात काही प्रतिनिधी तिकीट काढूनही चित्रपटांना येत नाहीत, अशा प्रतिनिधीने तीनवेळा जर आपले तिकीट वाया घालविले, तर त्यांच्यावरही कारवाई करण्याची किंवा प्रसंगी त्याचे प्रतिनिधीत्व बाद ठरविण्यावरही समिती विचार करीत आहे. 

दोन्ही समितीवर जबाबदारीस्थायी समितीमध्ये जहातू बरुआ, पियुष पांडे, नागेश कुकूनूर, रॉय कपूर, प्रसून जोशी, नीना गुप्ता, अजित सरकार, आनंद गांधी यांचा समावेश आहे. त्यामुळे या समितीवर दरवर्षी चित्रपटाच्या शोवेळी प्रतिनिधींना प्रवेश न मिळाल्याने होणाऱ्या गोंधळावर काही उपाय योजण्याची जबाबदारी आहे. आढावा समितीमध्ये विवेक अग्निहोत्री, अनिरुद्ध रॉय, ऋषिता भट, पल्लवी जोशी, खालीद महमूद, भास्कर हजारिका, सैबल चटर्जी, भावना सोमय्या यांचा समावेश आहे. या समिती महोत्सवाच्या आयोजनाचा आढावा घेऊन केंद्र सरकारला अहवाल सादर करणार आहेत.