शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

गोव्यात रेशनवर मिळणार कांदा; साडेतीन लाख रेशन कार्डधारकांना होणार लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2020 19:48 IST

नागरी पुरवठामंत्री गोविंद गावडे यांच्याशी लोकमतने केलेला वार्तालाप...

पणजी : बाजारात कांदा महागल्याने गोव्याच्या नागरी पुरवठा खात्याने रेशनकार्डवर ३४.५0 पैसे किलो दराने कार्डामागे तीन किलो देण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर नागरी पुरवठामंत्री गोविंद गावडे यांच्याशी केलेला वार्तालाप...

प्रश्न : बाजारात कांदा शंभर रुपये किलोवर पोहोचल्याने नागरी पुरवठा खात्याला स्वस्त धान्य दुकानांमधून रेशनवर तो पुरवावा लागला आहे. ही यंत्रणा तुम्ही कशी उभी केली?

उत्तर : जनतेला स्वस्त धान्य दुकानांमधून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करताना वेगवेगळे उपक्रम याआधीही खात्याने हाती घेतले आहेत. कांदा १00 रुपये किलोवर पोहोचल्याने सरकार आता तो आयात करून रेशनवर प्रति किलो ३४.५० रुपये सवलतीच्या दराने देणार आहे. कार्डामध्ये तीन किलो कांदा देण्याचे आम्ही ठरविले होते. नाशिकच्या 'नाफेड' एजन्सीकडून १0४५ मेट्रिक टन कांदा मागविला असून १00 टनांहून अधिक कांदा गोव्यात दाखलही झालेला आहे. पुढील एक-दोन दिवसात राज्यातील सर्व ४५४ रेशन दुकानांमध्ये वितरण सुरू होईल. सुरवातीला रेशन कार्डावर एक किलो कांदा दिला जाईल आणि उर्वरित दोन किलो कांदे नोव्हेंबरपर्यंत दिले जातील. साधारणपणे साडेतीन लाख रेशन कार्डधारकांना याचा लाभ होईल.

प्रश्न : लॉकडाऊनच्या काळात गोरगरीब जनतेला रेशन मिळावे यासाठीही नागरी पुरवठा खात्याने महत्त्वाची भूमिका बजावली. खात्याच्या कामाचा कामाचा व्याप वाढला. ही सर्व परिस्थिती कशी हाताळली सांगू शकाल काय?

उत्तर : रेशनवर धान्य पुरवठा करण्यापासून काळाबाजार रोखणे, सांठेबाजी करणाºयांवर अंकुश ठेवणे, अशी सर्वच कामगिरी खात्याच्या अधिकाºयांना पार पाडावी लागली. लॉकडाऊनच्या काळात तब्बल ४५00 मेट्रिक टन अतिरिक्त तांदूळ आणि ११00 मेट्रिक टन अतिरिक्त गहू भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामातून मंजूर करून आणला आणि रेशनवर तो वितरीतही केला. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत गेल्या धान्य वितरण केले. अंत्योदया व पीएचई कार्डधारकांसाठी पाच किलो अतिरिक्त तांदूळ मोफत पुरविले. लॉकडाउनच्या काळात रेशनवर तूरडाळही वितरीत केली. खात्याचे कर्मचारी, अधिकारी यांनी दिवसरात्र काम केले.

प्रश्न : महामारीच्या काळात धान्याचा काळाबाजार देशभर मोठ्या प्रमाणात झाला. गोव्यात तुम्ही कोणते उपाय योजना केल्या?

उत्तर :  गोदामांमधील माल बाहेर न काढता धान्याची साठेबाजी तसेच काळाबाजार करणाºयांविरुध्द कडक मोहीम उघडली. गोदामांना आकस्मिक भेटी देऊन माल बाहेर काढायला करायला लावले आणि वितरित करण्यास भाग पाडण्यात आले. लॉकडाऊनच्या काळात केंद्राकडून जादा कोटा संमत करुन आणलाच शिवाय काही ठिकाणी घरपोच धान्य देण्याची व्यवस्थाही केली. लॉकडाऊनमध्ये पंचायत सदस्य, एनजीओंनीही खात्याला चांगले सहकार्य केले.

प्रश्न : स्वस्त धान्य दुकानांमध्ये बायोमेट्रिक पद्धत तसेच इंटरनेटच्या समस्येमुळे पिओएस यंत्रे कटकटीची ठरली आहेत त्यावर काय उपाययोजना केलेल्या आहेत?

उत्तर : कोरोना व्हायरसमुळे बायोमेट्रिक पद्धत काही दिवस बंद होती. ज्या ग्रामीण भागांमध्ये इंटरनेटची सेवा नाही तेथे पीओएस मशिन तसेच बायोमेट्रिकच्या बाबतीत सवलत देण्यात आलेली आहे. हा विषय केंद्राच्या अखत्यारित येतो त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्देशांचे पालन करावे लागते.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत