शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

गोव्यात ओबीसी, एससी व एसटी लोकांचे फेरसर्वेक्षण होणार - पांडुरंग मडकईकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2018 21:06 IST

ओबीसी, मागास व अनुसूचित जमातींच्या लोकांचे फेरसर्वेक्षण केले जाणार असून येत्या महिनाभरात प्रत्यक्ष प्रक्रि या सुरु होईल. समाजकल्याणमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी ही माहिती दिली. तब्बल पंधरा वर्षांनंतर हे सर्वेक्षण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 पणजी - ओबीसी, मागास व अनुसूचित जमातींच्या लोकांचे फेरसर्वेक्षण केले जाणार असून येत्या महिनाभरात प्रत्यक्ष प्रक्रि या सुरु होईल. समाजकल्याणमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी ही माहिती दिली. तब्बल पंधरा वर्षांनंतर हे सर्वेक्षण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. खात्याकडे ओबीसी, मागास तसेच अनुसुचित जमातींच्या लोकांची निश्चित संख्या किती आहे याचा तपशील उपलब्ध नाही त्यामुळे वेगवेगळे दावे या समाजांकडून केले जातात. शिक्षण, नोकºयांमधील राखीवतेबाबतही प्रश्न उपस्थित केले जातात.

या पार्श्वभूमीवर खात्याच्या फिल्ड पर्यवेक्षकांची मदत घेऊन आता खात्यातर्फेच हे सर्वेक्षण हाती घेण्याचे ठरले आहे. या कामासाठी गरज भासल्यास एमबीए करणाºया विद्यार्थ्यांचीही मदत घेतली जाईल. 

गावडा, कुणबी, वेळीप आदी अनुसूचित जमातींची लोकसंख्या १२ टक्के असल्याचे सांगण्यात येते परंतु या समाजाचा असा दावा आहे की ती १५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. ओबीसी २७ टक्के तर मागासवर्गीयांची संख्या २ टक्के असल्याचा दावा यापूर्वी झालेल्या जनगणनेच्या आधारावर केला जातो परंतु प्रत्यक्षात या समाजांचेही आपली संख्या जास्त असल्याचे म्हणणे आहे. 

 आदिवासी कल्याण खात्यातर्फेही सर्वेक्षण 

‘उटा’चे नेते तथा अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष प्रकाश शंकर वेळीप म्हणाले की, समाजकल्याण खाते जर व्यापक सर्वेक्षण करीत असेल तर ती चांगली गोष्ट आहे. आदिवासी कल्याण खात्यानेही अनुसूचित जमातींच्या लोकांचे सर्वेक्षण हाती घेतले आहे. ‘जिपार्ड’च्या सहकार्याने हे काम होणार आहे. सुमारे ३५ हजार आदिवासी कुटुंबे असल्याची माहिती त्यांनी दिली. 

टॅग्स :goaगोवाGovernmentसरकार