शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

आता मराठी व्होटबँक तयार करावीच लागेल; सुभाष वेलिंगकर यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 08:07 IST

मराठी राजभाषा समितीच्यावतीने फोंडा प्रखंड मेळावा, भाषाप्रेमींची मोठी उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : मागील चाळीस वर्षे आम्ही मराठीसाठी लढा देत आहोत. राष्ट्रपतींपर्यंत निवेदने देऊन झालीत. आता लढाई आरपारची करायची आहे. यापुढे संख्या बोलेल, असे वातावरण निर्माण करूया. मराठी व्होटबँक (मतपेटी) निर्माण करून राजकर्त्यांवर दबाव आणूया. तुम्ही ज्या पक्षाचे कार्यकर्ते असाल त्या पक्षाला ठणकावून सांगा, जो पक्ष मराठीचा उद्धार करेल, त्यालाच तुमचे मत मिळेल, असे आवाहन सुभाष वेलिंगकर यांनी केले.

मराठी राजभाषा समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या फोंडा प्रखंड मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गो. रा. ढवळीकर, शाणूदास सावंत, गोविंद देव, दिवाकर शिक्रे, जयंत मिरींगकर, शशांक उपाध्ये, पणजीचे माजी महापौर अशोक नाईक, उदय डांगी, विद्या नाईक, दिव्यामावजेकर उपस्थित होते.

वेलिंगकर पुढे म्हणाले की, आमच्या आंदोलनाला नवी धार द्यावी लागेल. यापुढे तालुका समिती स्थापन करून चळवळ व्यापक करण्यात येईल. ऑगस्टपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करूया. जातीपातीच्या पलीकडे जाऊन विचार करताना युवाशक्ती व नारी शक्ती संघटित करूया. मराठीची अवहेलना करणारा पक्ष सत्तेवर राहणार नाही, हा निर्धार करूया. राजकारण्यांना धडा शिकवण्यासाठी आमच्याकडे फक्त दोन वर्षे आहेत. ऐन निवडणुकीच्या वेळी राजकर्त्यांना खिंडीत पकडण्याचे काम करूया. यावेळी बोलताना गो. रा. ढवळीकर म्हणाले, की मराठी भाषेची प्रगती होत आहे म्हणूनच राज्यात मराठी वर्तमानपत्रांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

वाचनालयामधून मराठी पुस्तके अधिक वाचली जात आहेत. यावरून मराठी हीच गोव्याची राजभाषा व्हायला हवी हे सिद्ध होते. आज तरुणांची दिशाभूल करण्याचे प्रकार होत आहेत. तरुणांना भाषेसंबंधी वस्तूस्थिती समजावून सांगायला हवी. आज गोव्यात ड्रग्ज, कॅसिनो, अनाचार वाढत चालला आहे. हे सर्व मराठी भाषा डावलली गेल्यामुळे होत आहे. कारण मराठीमुळे इथली संस्कृती टिकून होती. संस्कृतीचा -हास झाल्यास भावी पिढी बरबाद होईल. एकेकाळी गोव्याला दक्षिण काशी म्हटले जायचे. आज परिस्थिती बदलत चालली आहे. म्हणूनच भावी पिढी सुसंस्कृत राहावी, म्हणून हा आमचा लढा चालू आहे. आज जे लोक कोंकणीचा उदो उदो करत आहेत व मराठीचा द्वेष करत आहे, त्यांच्याच पूर्वजांनी अनेक वर्षांपूर्वी मराठीत उच्च दर्जाचे साहित्य निर्माण करून ठेवले आहे.

मराठी शाळा बंदीचा संस्कृतीवर परिणाम

वेलिंगकर पुढे म्हणाले की, राजकारण्यांच्या चुकीच्या धोरणामुळेच मराठीचा -हास होत आहेत. परिणामी मराठी शाळा बंद पडत चालल्या आहेत. याचा थेट परिणाम संस्कृतीवर होत आहे. पिग, पेग, व प्रॉस ही संस्कृती गोव्यात उदयास येत आहे. हे सर्व अडवायचे असल्यास मराठी भाषेशिवाय पर्याय नाही.

पं. नेहरू जबाबदार?

आजच्या मराठीच्या हासाला तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू व तत्कालीन केंद्र सरकार जबाबदार आहे. त्यांनीच कोंकणी संस्कृती, कोंकणी भाषेला संरक्षण देऊ असे जाहीर केले होते. कोंकणी भाषेला साहित्य अकादमीची मान्यता मिळाली, हाही सर्वात मोठा घोटाळा आहे, असे गो. रा. ढवळीकर यावेळी बोलताना म्हणाले. जयंत मिरींगकर यांनी प्रास्ताविक केले. 

टॅग्स :goaगोवाmarathiमराठी