शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगासाठी दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या आर्थिक सहाय्यामध्ये वाढ करण्याबाबत सूचना

By समीर नाईक | Updated: June 23, 2024 15:51 IST

समाज कल्याण संचालनालयाने २००२ साली राज्यामध्ये दयानंद सामाजिक सुरक्षा योजना सुरू केली होती. २०१३ साली या योजनेत सुधारणा करण्यात आली होती

पणजी: गोवा राज्य दिव्यांगजन आयोगाचे आयुक्त गुरुप्रसाद आर. पावसकर यांनी समाज कल्याण संचालनालयास जारी केलेल्या महत्वपूर्ण निर्देशामध्ये दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेमध्ये तातडीने सुधारणा करण्याची गरज व्यक्त केली आहे. दिव्यांग मुलांच्या पालकांकडून गत अनेक वर्षांत निर्वाह निधीमध्ये काही वाढ झाली नसल्याचे वास्तव मांडत या निधीमध्ये वाढ करण्यासाठी केलेल्या मागणीची दखल घेत अशी सूचना केली आहे.

समाज कल्याण संचालनालयाने २००२ साली राज्यामध्ये दयानंद सामाजिक सुरक्षा योजना सुरू केली होती. २०१३ साली या योजनेत सुधारणा करण्यात आली होती. त्यानुसार या योजनेअंतर्गत पुढीलप्रमाणे लाभ दिले जातात, ९०% पेक्षा कमी दिव्यंगत्व असलेल्या व्यक्तीसाठी २००० रू प्रति महिना तर, ९० टक्के पेक्षा कमी दिव्यंगत्व असलेल्या मुलांसाठी २५०० रु प्रति महिना आणि ९० टक्के पेक्षा जास्त दिव्यंगत्व असलेल्या व्यक्तींसाठी दरमहा ३५०० रू असा निर्वाह निधी दिला जातो. महागाईमुळे राहणीमानाचा खर्च वाढला असून निश्चित पेन्शन रकमेचे वास्तवमूल्य कमी झाले असल्याचे निदर्शनास आले आहे, असे राज्य दिव्यांगजन आयोगातर्फे जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.

निवारा, आरोग्य आणि अन् अशा मूलभूत गरजा अधिक महाग झाल्या असल्याने, दिव्यांग व्यक्तींना जीवनामानाचा योग्य स्तर राखणे कठीण झाले असल्याचे वास्तव राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाने २०जून २०२४ रोजी जारी केलेल्या आपल्या आदेशपत्रात मांडले आहे.याव्यतिरिक्त, दिव्यांग व्यक्तींना अनेकदा वैद्यकीय आणि आरोग्यसुरक्षेसाठी अधिकचा खर्च करावा लागत असून असा खर्च सार्वजनिक आरोग्य प्रणालींद्वारे देण्यात येणाऱ्या लाभामध्ये पूर्णतः समाविष्ट नाही, असेही नमूद करण्यात आले आहे.

निर्वाह निधीमध्ये वाढ करणे ही सामाजिक न्याय आणि समानतेची बाब आहे. दिव्यांग व्यक्तींना पुरेसे आर्थिक साहाय्य मिळेल याची सुनिश्चितता करणे ही बाब न्याय्य आणि सर्वसमावेशकतेच्या तत्त्वांशी सुसंगत आहे. स्वतंत्र जीवन जगणे, आर्थिक विकासामध्ये अधिक सक्रियपणे सहभागी होणे आणि आर्थिक समावेशकतेमध्ये आपले योगदान देणे यासाठी निर्वाह निधीमधील वाढ ही दिव्यांग व्यक्तींना सक्षम करते. त्यामुळे, समृद्ध समाज घडवण्यासाठी दिव्यांग व्यक्तींसाठी निर्वाह निधी वाढवणे ही बाब नैतिक आवश्यकतेबरोबच वास्तववादी उपाययोजना ठरणार आहे. असे दिव्यांगजन आयोगाचे आयुक्त गुरूप्रसाद पावसकर यांनी यावेळी सांगितले.