शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
4
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
5
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
6
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
7
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
8
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
9
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
10
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
11
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
12
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
13
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
14
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
15
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
16
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
17
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
18
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
19
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
20
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगासाठी दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या आर्थिक सहाय्यामध्ये वाढ करण्याबाबत सूचना

By समीर नाईक | Updated: June 23, 2024 15:51 IST

समाज कल्याण संचालनालयाने २००२ साली राज्यामध्ये दयानंद सामाजिक सुरक्षा योजना सुरू केली होती. २०१३ साली या योजनेत सुधारणा करण्यात आली होती

पणजी: गोवा राज्य दिव्यांगजन आयोगाचे आयुक्त गुरुप्रसाद आर. पावसकर यांनी समाज कल्याण संचालनालयास जारी केलेल्या महत्वपूर्ण निर्देशामध्ये दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेमध्ये तातडीने सुधारणा करण्याची गरज व्यक्त केली आहे. दिव्यांग मुलांच्या पालकांकडून गत अनेक वर्षांत निर्वाह निधीमध्ये काही वाढ झाली नसल्याचे वास्तव मांडत या निधीमध्ये वाढ करण्यासाठी केलेल्या मागणीची दखल घेत अशी सूचना केली आहे.

समाज कल्याण संचालनालयाने २००२ साली राज्यामध्ये दयानंद सामाजिक सुरक्षा योजना सुरू केली होती. २०१३ साली या योजनेत सुधारणा करण्यात आली होती. त्यानुसार या योजनेअंतर्गत पुढीलप्रमाणे लाभ दिले जातात, ९०% पेक्षा कमी दिव्यंगत्व असलेल्या व्यक्तीसाठी २००० रू प्रति महिना तर, ९० टक्के पेक्षा कमी दिव्यंगत्व असलेल्या मुलांसाठी २५०० रु प्रति महिना आणि ९० टक्के पेक्षा जास्त दिव्यंगत्व असलेल्या व्यक्तींसाठी दरमहा ३५०० रू असा निर्वाह निधी दिला जातो. महागाईमुळे राहणीमानाचा खर्च वाढला असून निश्चित पेन्शन रकमेचे वास्तवमूल्य कमी झाले असल्याचे निदर्शनास आले आहे, असे राज्य दिव्यांगजन आयोगातर्फे जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.

निवारा, आरोग्य आणि अन् अशा मूलभूत गरजा अधिक महाग झाल्या असल्याने, दिव्यांग व्यक्तींना जीवनामानाचा योग्य स्तर राखणे कठीण झाले असल्याचे वास्तव राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाने २०जून २०२४ रोजी जारी केलेल्या आपल्या आदेशपत्रात मांडले आहे.याव्यतिरिक्त, दिव्यांग व्यक्तींना अनेकदा वैद्यकीय आणि आरोग्यसुरक्षेसाठी अधिकचा खर्च करावा लागत असून असा खर्च सार्वजनिक आरोग्य प्रणालींद्वारे देण्यात येणाऱ्या लाभामध्ये पूर्णतः समाविष्ट नाही, असेही नमूद करण्यात आले आहे.

निर्वाह निधीमध्ये वाढ करणे ही सामाजिक न्याय आणि समानतेची बाब आहे. दिव्यांग व्यक्तींना पुरेसे आर्थिक साहाय्य मिळेल याची सुनिश्चितता करणे ही बाब न्याय्य आणि सर्वसमावेशकतेच्या तत्त्वांशी सुसंगत आहे. स्वतंत्र जीवन जगणे, आर्थिक विकासामध्ये अधिक सक्रियपणे सहभागी होणे आणि आर्थिक समावेशकतेमध्ये आपले योगदान देणे यासाठी निर्वाह निधीमधील वाढ ही दिव्यांग व्यक्तींना सक्षम करते. त्यामुळे, समृद्ध समाज घडवण्यासाठी दिव्यांग व्यक्तींसाठी निर्वाह निधी वाढवणे ही बाब नैतिक आवश्यकतेबरोबच वास्तववादी उपाययोजना ठरणार आहे. असे दिव्यांगजन आयोगाचे आयुक्त गुरूप्रसाद पावसकर यांनी यावेळी सांगितले.