शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

'उत्तर भारतीय पर्यटकांना गोव्यात हरियाणा करायचा आहे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2018 13:04 IST

गोव्यात येणा-या भारतीय पर्यटकांमध्ये गलिच्छ लोकांची संख्या जास्त आहे असं नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई बोलले आहेत

पणजी : गोवा राज्य एकाबाजूने लाखो पर्यटकांनी गोव्यात यावे म्हणून आवाहन करत पर्यटनाच्या जाहिरातीवर प्रचंड खर्च करत आहे. मात्र गोव्याचे मंत्री विजय सरदेसाई यांच्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. गोव्यात उत्तर भारतीय पर्यटक नवा हरियाणा तयार करू पाहत आहेत, अशा शब्दांत नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी उत्तर भारतीय पर्यटकांप्रती असलेली नकारात्मक भावना व्यक्त केली आहे.

गोव्यात ज्यादा पैसा खर्च करू शकतील असे श्रीमंत पर्यटक यायला हवेत अशी भावना अनेक लोकप्रतिनिधी तसेच टूर अॅण्ड ट्रॅव्हल संघटनाही व्यक्त करत असते. मात्र गरीब व उत्तर भारतीय पर्यटक नको अशी भूमिका कुणी मंत्री घेत नसतात. प्रथमच मंत्री सरदेसाई यांनी मात्र उत्तर भारतीय पर्यटकांना अप्रत्यक्षरित्या आरोपीच्या पिंज-यात उभे केले आहे. पृथ्वीच्या तळातील मळ गोव्यात येत असतो असेही विधान मंत्री सरदेसाई यांनी करून काही विशिष्ट अशा गटातील पर्यटकांकडे अंगुलीनिर्देश केला आहे. मंत्री सरदेसाई यांची ही भूमिका देशी पर्यटकांमध्ये मोठय़ा चर्चेचा विषय बनू शकते.

सोळा लाख लोकसंख्येच्या गोव्याला वार्षिक सरासरी साठ लाख पर्यटक भेट देतात. पर्यटकांचे हे प्रमाण वाढायला हवे, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना वाटते. नवा आंतरराष्ट्रीय विमानतळ मोपा येथे उभा राहिल्यानंतर पर्यटकांचे प्रमाण खूपच वाढेल असा विश्वास सरकारकडून वारंवार व्यक्त केला जात आहे. येत्या पाच ते सहा वर्षात गोव्याची वार्षिक पर्यटक संख्या एक कोटींर्पयत पोहचेल असेही यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

मंत्री सरदेसाई यांनी मात्र बिझनेस फेस्टमध्ये बोलताना उत्तर भारतीय पर्यटक जास्त संख्येने गोव्यात नको, असा संदेश दिला आहे. रस्त्याच्या बाजूला फुटपाथवर किंवा मोकळी जागा मिळेल तिथे उघडय़ावर स्वयंपाक करणो, कुठेही मग उरलेले अन्न किंवा अन्य खाद्य पदार्थ फेकून देणे, कचरा फेकून देणे, बेशिस्त वागणे अशा कारणास्तव कदाचित मंत्री सरदेसाई हे उत्तर भारतीय पर्यटकांना दोष देत असतील असे मानले जात आहे. मात्र समाजाच्या कोणत्याही थरातील भारतीय आणि विदेशी पर्यटकालाही कुठेही फिरण्याचा अधिकार असल्याने केवळ उत्तर भारतीयच पर्यटकांना निवडून काढून दोष देणे हे गोव्याविषयी चुकीचा संदेश पाठविणारे ठरू शकते, अशी चर्चा गोव्यात सुरू झाली आहे. गोव्यात उत्तर भारतीय पर्यटक हरियाणा तयार करू पाहत आहे असेही मंत्री सरदेसाई यांनी म्हटल्याने हा विषय वादाचाही ठरू शकतो.

टॅग्स :goaगोवा