शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

'उत्तर भारतीय पर्यटकांना गोव्यात हरियाणा करायचा आहे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2018 13:04 IST

गोव्यात येणा-या भारतीय पर्यटकांमध्ये गलिच्छ लोकांची संख्या जास्त आहे असं नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई बोलले आहेत

पणजी : गोवा राज्य एकाबाजूने लाखो पर्यटकांनी गोव्यात यावे म्हणून आवाहन करत पर्यटनाच्या जाहिरातीवर प्रचंड खर्च करत आहे. मात्र गोव्याचे मंत्री विजय सरदेसाई यांच्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. गोव्यात उत्तर भारतीय पर्यटक नवा हरियाणा तयार करू पाहत आहेत, अशा शब्दांत नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी उत्तर भारतीय पर्यटकांप्रती असलेली नकारात्मक भावना व्यक्त केली आहे.

गोव्यात ज्यादा पैसा खर्च करू शकतील असे श्रीमंत पर्यटक यायला हवेत अशी भावना अनेक लोकप्रतिनिधी तसेच टूर अॅण्ड ट्रॅव्हल संघटनाही व्यक्त करत असते. मात्र गरीब व उत्तर भारतीय पर्यटक नको अशी भूमिका कुणी मंत्री घेत नसतात. प्रथमच मंत्री सरदेसाई यांनी मात्र उत्तर भारतीय पर्यटकांना अप्रत्यक्षरित्या आरोपीच्या पिंज-यात उभे केले आहे. पृथ्वीच्या तळातील मळ गोव्यात येत असतो असेही विधान मंत्री सरदेसाई यांनी करून काही विशिष्ट अशा गटातील पर्यटकांकडे अंगुलीनिर्देश केला आहे. मंत्री सरदेसाई यांची ही भूमिका देशी पर्यटकांमध्ये मोठय़ा चर्चेचा विषय बनू शकते.

सोळा लाख लोकसंख्येच्या गोव्याला वार्षिक सरासरी साठ लाख पर्यटक भेट देतात. पर्यटकांचे हे प्रमाण वाढायला हवे, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना वाटते. नवा आंतरराष्ट्रीय विमानतळ मोपा येथे उभा राहिल्यानंतर पर्यटकांचे प्रमाण खूपच वाढेल असा विश्वास सरकारकडून वारंवार व्यक्त केला जात आहे. येत्या पाच ते सहा वर्षात गोव्याची वार्षिक पर्यटक संख्या एक कोटींर्पयत पोहचेल असेही यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

मंत्री सरदेसाई यांनी मात्र बिझनेस फेस्टमध्ये बोलताना उत्तर भारतीय पर्यटक जास्त संख्येने गोव्यात नको, असा संदेश दिला आहे. रस्त्याच्या बाजूला फुटपाथवर किंवा मोकळी जागा मिळेल तिथे उघडय़ावर स्वयंपाक करणो, कुठेही मग उरलेले अन्न किंवा अन्य खाद्य पदार्थ फेकून देणे, कचरा फेकून देणे, बेशिस्त वागणे अशा कारणास्तव कदाचित मंत्री सरदेसाई हे उत्तर भारतीय पर्यटकांना दोष देत असतील असे मानले जात आहे. मात्र समाजाच्या कोणत्याही थरातील भारतीय आणि विदेशी पर्यटकालाही कुठेही फिरण्याचा अधिकार असल्याने केवळ उत्तर भारतीयच पर्यटकांना निवडून काढून दोष देणे हे गोव्याविषयी चुकीचा संदेश पाठविणारे ठरू शकते, अशी चर्चा गोव्यात सुरू झाली आहे. गोव्यात उत्तर भारतीय पर्यटक हरियाणा तयार करू पाहत आहे असेही मंत्री सरदेसाई यांनी म्हटल्याने हा विषय वादाचाही ठरू शकतो.

टॅग्स :goaगोवा