शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
5
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
6
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
7
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
8
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
9
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
10
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
11
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
12
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
13
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
14
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
15
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
16
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
17
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
20
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल

नो टेन्शन! माध्यमिक परीक्षा होणार सुलभ

By admin | Updated: February 20, 2015 01:32 IST

परीक्षा म्हटली की, तणाव येतोच. पालकांच्या अपेक्षा, शिक्षकांची आग्रही भूमिका आणि गुणांचे लक्ष्य गाठण्याची अदृश्य

वासुदेव पागी ल्ल पणजी परीक्षा म्हटली की, तणाव येतोच. पालकांच्या अपेक्षा, शिक्षकांची आग्रही भूमिका आणि गुणांचे लक्ष्य गाठण्याची अदृश्य भीती परीक्षेच्या वेळी एकत्रित होते आणि विद्यार्थी दबावाखाली येतात. मात्र, आता ही स्थिती बदलण्याचा निर्धार गोवा शालान्त मंडळाने केला आहे. मानसिक तणाव आणि घोकमपट्टीला फाटा देणाऱ्या सुलभ प्रश्नपत्रिका काढण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून नववीच्या प्रश्नपत्रिका या पद्धतीने काढण्यात येणार आहेत. परीक्षा सोपी करणे याचा अर्थ परीक्षेचा दर्जा कमी करणे, असा होत नाही. परीक्षेचा दर्जा राखून किंबहुना तो वाढवून या प्रश्नपत्रिकेत बदल करण्यात येणार आहेत, असे शालान्त मंडळाचे अध्यक्ष जे. आर. रिबेलो यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ताणवविरहित परीक्षेचा विषय सध्या प्रस्ताव स्वरूपात असला, तरी तो मंडळाच्या विचाराधीन आहे. येत्या शैक्षणिक वर्षांत त्याची अंमलबजावणी सुरू केली जाईल. सुरुवातीला नववीच्या वर्गासाठी त्याची अंमलबजावणी होणार आहे आणि नंतर नववीची तुकडी दहावीत गेल्यानंतर दहावी इयत्तेतही ती चालू राहणार आहे. म्हणजेच संपूर्ण माध्यमिक शिक्षण हे ताणरहीत बनविण्यात येणार आहे. शालान्त मंडळाने मागील दोन वर्षांत अनेक क्रांतिकारी निर्णय घेऊन त्याची यशस्वी अंमलबजावणीही करून दाखविली आहे. त्यात परीक्षेचे अर्ज आॅनलाईन सादर करणे, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष हॉल तिकीट बनविणे, कागदोपत्री निकाल छापणे बंद करणे. कठीण विषयांची सक्ती काढून त्या जागी सोप्या विषयांची सक्ती करणे आणि इतर निर्णयांचा समावेश आहे. मंडळाचे काही प्रस्ताव सरकारने मंजुरी न दिल्यामुळे अडून आहेत.