शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
4
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
5
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
6
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
7
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
8
"सेटवर ते मस्ती करायचे पण मी...", अशोक सराफ यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा
9
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
10
आमिर खानच्या घरी पोहचले २५ आयपीएस अधिकारी, चाहते पडले चिंतेत, म्हणाले - "रेड पडली आहे का?"
11
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
12
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
13
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
14
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
15
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
16
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
17
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
18
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
19
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
20
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले

भाजप सोडल्याचा कोणताही पश्चात्ताप नाही: लक्ष्मीकांत पार्सेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2024 13:22 IST

पाच वर्षांचा एकदाच कार्यकाळ द्या, आणखी एका टर्मनंतर राजकारणात इंटरेस्ट नाही, लोबो किंवा अन्य कोणीही मांद्रेत आले, तर मला राजकीयदृष्ट्या फायदाच

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: आगामी, २०२७ च्या विधानसभा निवडणुकीवेळी मायकल लोबो किंवा अन्य कोणीही जरी मांद्रे मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी येत असेल, तरी मला राजकीयदृष्ट्या त्याचा फायदाच आहे, असे मत माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी व्यक्त केले. आमदार लोबो मांद्रेत येऊ इच्छित असल्याने भाजपने त्यांना समज द्यायला नको का, असा प्रश्न एका मुलाखतीवेळी केला असता, पार्सेकर म्हणाले की, मी आता भाजपमध्ये नाही. त्यामुळे मी यावर भाष्य करू इच्छित नाही, परंतु एक मात्र खरे की मांद्रे पूर्वीसारख्या मागास राहिलेला नाही. हा मतदारसंघ 'लुक्रेटिव्ह' बनलेला आहे. त्यामुळे मायकलच काय अनेकजण येथे येऊ इच्छितात. ते आले म्हणून काही हरकत नाही. खरेतर विद्यमान आमदाराला ते आव्हान वाटावे. नवे लोक आले तर माझ्या राजकीय भवितव्याला तो फायदाच ठरेल.

पार्सेकर म्हणाले की, मी भाजपमधून बाहेर पडलो असलो, तरी लोकसंपर्क तोडलेला नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत मला ५,८०० मते मिळालेली आहेत आणि ती अपक्ष म्हणून मी मिळवलेली आहेत. त्यामुळे माझी ताकद आहेच आणि मी पराभव झाल्याने झोपूनही राहिलेलो नाही. मतदारसंघामध्ये माझे काम चालूच आहे. शैक्षणिक संस्थेच्या व इतर माध्यमातून मी लोकसंपर्कात आहे.

या जर, तरच्या गोष्टी 

आगामी निवडणुकीत भाजपने ऑफर दिल्यास स्वगृही परतणार का?, असा प्रश्न विचारला असता, पार्सेकर म्हणाले की, भाजपमधून मी बाहेर पडलो असलो, तरी अन्य कुठल्याही पक्षात गेलेलो नाही. २०२२ ची निवडणूकसुद्धा अपक्ष म्हणूनच लढवली. या जर आणि तरच्या गोष्टी आहेत. प्रत्यक्ष वेळ येते तेव्हा पाहू. माझ्या राजकीय वाटचालीबद्दल आताच भाष्य करणे योग्य ठरणार नाही. २०२२ साली मी माझ्यावर अन्याय झाला, म्हणून नाराज होऊन पक्षातून बाहेर पडलो होतो. त्यामुळे जोपर्यंत भाजपच्या वतीने कोणी प्रस्ताव ठेवत नाही, तोपर्यंत मी या विषयावर बोलू शकणार नाही. माझी राजकीय कारकीर्द संपू नये, म्हणून पक्षातून बाहेर पडलो व अपक्ष म्हणून निवडणूक लढवली.

पाच वर्षांचा एक कार्यकाळ द्या, नंतर मला 'इंटरेस्ट' नाही

पार्सेकर म्हणाले की, मी मुख्यमंत्री असताना मांदेत अनेक प्रकल्प आणले. काही प्रकल्पांचे काम चालू होते, तर काही प्रस्तावित होते. गेल्या दोन कार्यकाळात मी आमदार नाही. त्यामुळे हे प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे पाच वर्षांचा एक तरी कार्यकाळ पुढे मला मिळावा. मी जी विकासकामे योजलेली आहेत ती पूर्ण करू द्यावीत. त्यानंतर मला निवडणुकीत वगैरे विशेष इंटरेस्ट नाही.'

वायफळ खर्च होतोय...

राज्याच्या डोक्यावर ३० हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. या आर्थिक स्थितीबद्दल तुम्हाला काय वाटते?, असे विचारले असता पार्सेकर म्हणाले की, गोवा लहान राज्य आहे. पण, नको तिथे आर्थिक कपात करून इतर ठिकाणी वायफळ खर्च केला जात आहे. शिक्षणासाठी हवी तेवढी तरतूद केली जात नाही. अनेक शाळांमध्ये शिक्षकांची नियमित पदे भरलेली नाहीत. माझ्यासारख्यांची कामे होतात, परंतु अनेक शाळांमध्ये शिक्षकांची नियमित पदे भरली जात नाहीत, हे दुर्दैव आहे.

कारकीर्द संपली असती 

पार्सेकर म्हणाले की, भाजपने तिकीट नाकारल्यानंतर पक्ष सोडण्याचा मी जो निर्णय घेतला, त्याबद्दल आजही मला पश्चाताप नाही. कारण त्यावेळी तिकीट नाकारताना मला 'तुम्ही निवडून येऊ शकणार नाहीत, म्हणून तिकीट देत नाही, असे सांगण्यात आले होते. तेव्हा जर मी पक्षातून बाहेर पडलो नसतो, तर माझ्या राजकीय कारकीर्दीचा तो पूर्णविराम ठरला असता. त्यामुळे त्या निर्णयाबद्दल आजही मला खेद नाही.

अशा गोष्टींपासून दूर 

पर्रीकरांच्यावेळच्या आणि आताच्या नेतृत्वातील फरक सांगताना पार्सेकर म्हणाले की, पर्रीकर यांच्या हाताखाली काम करण्याची संधी मला मिळाली. आर्थिक शिस्त तसेच राजकीय शिस्त त्यांच्या कारकिर्दीत होती. आता निवडणूक आली की पार्ष्या, टुर्नामेंट यावर मोठ्या प्रमाणात उधळपट्टी करणारे नेते आहेत. पर्रीकरांनी आम्हाला नेहमी सांगितले की, असे करू नका. त्यामुळे मी अशा गोष्टींपासून दूर राहिलो.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण