शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

अधिकार नाही, निधी नाही हे तुणतुणे नको!; मुख्यमंत्र्यांनी टोचले जि. पं. सदस्यांचे कान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 13:37 IST

उत्तर जिल्हा विकास आराखड्याचे अनावरण मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते काल झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : जिल्हा पंचायत सदस्यांना काम करण्यासाठी भरपूर वाव आहे. आम्हाला अधिकार नाही, निधी नाही असे तुणतुणे वाजवू नका. केंद्राकडे योजना पाठवून निधी मिळवा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी झेडपींना केले.

उत्तर जिल्हा विकास आराखड्याचे अनावरण मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते काल झाले. यावेळी पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, पंचायत सचिव मिनिन डिसोझा, उत्तर जिल्हा पंचायत अध्यक्ष सिध्देश श्रीपाद नाईक, अजय गावडे याप्रसंगी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीची बैठक येत्या पंधरा दिवसांत होईल व या बैठकीत वरील आराखडा ठेवला जाईल. गोशाला चालवा, भटक्या गुरांची जबाबदारी घ्या. सरकार जिल्हा पंचायतींना निधी देण्यासाठी तयार आहे. उगाच अधिकार नसल्याचे सांगून जबाबदारी झटकू नका. योजनांचा अभ्यास करा, त्यांचा पाठपुरावा घ्या, असेही ते म्हणाले.

गोव्यात ग्रामपंचायत आणि जिल्हा पंचायत अशी द्विस्तर पद्धत आहे. तालुका पंचायती येथे नाहीत. जिल्हा पंचायतींनी करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. जिपाई संस्था पंच, सरपंच, झेडपी, आमदार यांना सातत्याने प्रशिक्षण देत आहे. झेडपींनी याचा लाभ घेऊन योग्य नियोजन करावे. जिल्हा नियोजन झाले तरच राज्याचे नियोजन चांगल्या प्रकारे होईल व विकास होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

एखाद्या गावात काय हवे हे गावातील लोक प्रतिनिधींना जास्त माहिती असते. केंद्राच्या अनेक योजना आहेत. पण त्याचा लाभ घेतला जात नाही. तीन कार्यकाळ झाले. आतापर्यंत किती योजना केंद्र सरकारकडे योजना पाठवल्या? असा सवालही मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला.

- पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीवर जिल्हा पंचायतींचाही हक्क आहे, आम्ही निधी देऊ. भटक्या गुरांवर आम्ही बिगर शासयकीय संघटनांना निधी देतोच. तोच जिल्हा पंचयातींना देऊ, त्यांनी गुरांचे व्यवस्थापन करावे.

- जिल्हा पंचायत भवनासाठी जागा शोधा, सरकारी जागा दाखवा, आम्ही देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. पुढील सहा महिन्यांत कोनशिला बसवून घ्या, जो निधी लागेल तो देईन. काम करण्याची तयारी ठेवा, असे मुख्यमंत्री म्हणाले.

विकासकामांसाठी निधी मिळवण्यासाठी आणखी प्रयत्न करु

आराखडा तयार करण्यासाठी गेली महिनाभर आम्ही उत्तरेतील पंच, सरपंच, सेल्फ हेल्प ग्रुप, शेतकरी, शिक्षण तज्ज्ञ यांची मते मागवली आणि त्यानुसार आराखड्यात काही प्रकल्प सुचवले. २००० साली गोव्यात जि. पं. स्थापन झाल्या. त्यानंतर प्रथमच अशा प्रकारे विकास आराखडा तयार झालेला आहे. हे ऐतिहासिक काम असून आम्ही केंद्राकडूनही यापुढे विकासकामांसाठी निधी मिळवण्यासाठी आणखी प्रयत्न करु. - सिध्देश नाईक, अध्यक्ष, उत्तर जिल्हा पंचायत

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत