शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

अधिकार नाही, निधी नाही हे तुणतुणे नको!; मुख्यमंत्र्यांनी टोचले जि. पं. सदस्यांचे कान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 13:37 IST

उत्तर जिल्हा विकास आराखड्याचे अनावरण मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते काल झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : जिल्हा पंचायत सदस्यांना काम करण्यासाठी भरपूर वाव आहे. आम्हाला अधिकार नाही, निधी नाही असे तुणतुणे वाजवू नका. केंद्राकडे योजना पाठवून निधी मिळवा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी झेडपींना केले.

उत्तर जिल्हा विकास आराखड्याचे अनावरण मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते काल झाले. यावेळी पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, पंचायत सचिव मिनिन डिसोझा, उत्तर जिल्हा पंचायत अध्यक्ष सिध्देश श्रीपाद नाईक, अजय गावडे याप्रसंगी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीची बैठक येत्या पंधरा दिवसांत होईल व या बैठकीत वरील आराखडा ठेवला जाईल. गोशाला चालवा, भटक्या गुरांची जबाबदारी घ्या. सरकार जिल्हा पंचायतींना निधी देण्यासाठी तयार आहे. उगाच अधिकार नसल्याचे सांगून जबाबदारी झटकू नका. योजनांचा अभ्यास करा, त्यांचा पाठपुरावा घ्या, असेही ते म्हणाले.

गोव्यात ग्रामपंचायत आणि जिल्हा पंचायत अशी द्विस्तर पद्धत आहे. तालुका पंचायती येथे नाहीत. जिल्हा पंचायतींनी करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. जिपाई संस्था पंच, सरपंच, झेडपी, आमदार यांना सातत्याने प्रशिक्षण देत आहे. झेडपींनी याचा लाभ घेऊन योग्य नियोजन करावे. जिल्हा नियोजन झाले तरच राज्याचे नियोजन चांगल्या प्रकारे होईल व विकास होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

एखाद्या गावात काय हवे हे गावातील लोक प्रतिनिधींना जास्त माहिती असते. केंद्राच्या अनेक योजना आहेत. पण त्याचा लाभ घेतला जात नाही. तीन कार्यकाळ झाले. आतापर्यंत किती योजना केंद्र सरकारकडे योजना पाठवल्या? असा सवालही मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला.

- पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीवर जिल्हा पंचायतींचाही हक्क आहे, आम्ही निधी देऊ. भटक्या गुरांवर आम्ही बिगर शासयकीय संघटनांना निधी देतोच. तोच जिल्हा पंचयातींना देऊ, त्यांनी गुरांचे व्यवस्थापन करावे.

- जिल्हा पंचायत भवनासाठी जागा शोधा, सरकारी जागा दाखवा, आम्ही देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. पुढील सहा महिन्यांत कोनशिला बसवून घ्या, जो निधी लागेल तो देईन. काम करण्याची तयारी ठेवा, असे मुख्यमंत्री म्हणाले.

विकासकामांसाठी निधी मिळवण्यासाठी आणखी प्रयत्न करु

आराखडा तयार करण्यासाठी गेली महिनाभर आम्ही उत्तरेतील पंच, सरपंच, सेल्फ हेल्प ग्रुप, शेतकरी, शिक्षण तज्ज्ञ यांची मते मागवली आणि त्यानुसार आराखड्यात काही प्रकल्प सुचवले. २००० साली गोव्यात जि. पं. स्थापन झाल्या. त्यानंतर प्रथमच अशा प्रकारे विकास आराखडा तयार झालेला आहे. हे ऐतिहासिक काम असून आम्ही केंद्राकडूनही यापुढे विकासकामांसाठी निधी मिळवण्यासाठी आणखी प्रयत्न करु. - सिध्देश नाईक, अध्यक्ष, उत्तर जिल्हा पंचायत

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत